शहरं
Join us  
Trending Stories
1
यावेळी महायुतीचे अन् २९ मध्ये भाजपचे स्वबळावर सरकार; अमित शाहंच्या वक्तव्याने अजित पवार, शिंदे गटात खळबळ 
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आजचा दिवस आर्थिक व व्यावसायिक दृष्टया लाभदायक
3
मविआचे जागावाटप होणार दसऱ्याला; सलग दोन दिवस बैठका
4
बदलापूर लैंगिक अत्याचार : फरार संस्था चालकांना अद्याप अटक का नाही? उच्च न्यायालयाचे एसआयटीवर ताशेरे
5
पराग शाह 500 कोटी तर मंगलप्रभात लोढा 441 कोटींचे धनी
6
विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात भाजपच्या अनेक उमेदवारांचे पर्याय लिफाफाबंद; कुठे कुठे मतदान
7
आयोगाच्या अल्टिमेटमनंतरही मुंबईतील १३० पोलिस अधिकाऱ्यांच्या बदलीस गृहविभागाचा नकार
8
मायदेशात सलग १८वा मालिका विजय; भारताने बांगलादेशला दिला व्हाइटवॉश
9
सहलीला जाताना बस पेटली; २५ विद्यार्थी, शिक्षकांचा मृत्यू
10
बनावट सुप्रीम काेर्टात सुनावणी, उद्याेजकाला घातला सात काेटींचा गंडा 
11
गुंतवणूकदार झाले तरुण; ४०% अवघे तिशीतलेच
12
कोणताही आयपीओ घेणे शहाणपणाचे ठरेल का? लिस्टिंग गेनच्या लालसेने पैसे लावणे घातक
13
इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यादरम्यानच भीषण दहशतवादी हल्ल्याने इस्राइल हादरले, ४ जणांचा मृत्यू, दोन दहशतवाद्यांचा खात्मा   
14
इराणची युद्धात उडी, शेकडो क्षेपणास्त्रांद्वारे इस्राइलवर मोठा हल्ला, तेल अवीवमध्ये खळबळ
15
२०३५ पर्यंत ईव्हींसाठी लागेल ६ ते ९ टक्के वीज
16
स्पर्धा परीक्षेत गडबड, तर 5 वर्षे कैद; 10 लाख दंड होणार
17
बंदूक साेड, घरी परत ये लाडक्या! दाेन अतिरेक्यांच्या पित्यांचे मतदानानंतर भावनिक आवाहन
18
वाराणसीच्या मंदिरांतील साईबाबांच्या मूर्ती हटवल्या
19
शरद पवारांनी केला करेक्ट कार्यक्रम; २२ लाख कार्यकर्त्यांसह पक्ष गळाला, विधानसभेला कुणाचा गेम?
20
छत्रपती शिवरायांचा जो उदात्त हेतू होता, त्याच अपेक्षेने पंतप्रधान नरेंद्र मोदींची वाटचाल- मुख्यमंत्री मोहन यादव

सहा लाख शेतकऱ्यांना नुकसानभरपाईची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 03, 2020 3:35 PM

Yawatmal News farmer दसऱ्यापूर्वी नुकसानभरपाई देण्याची घोषणा शासनाने केली होती. परंतु हा मुहूर्त टळला. आता किमान  दिवाळीपूर्वी तरी मदतीची ही रक्कम पदरी पडते काय, याकडे शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत. 

ठळक मुद्देदसऱ्याचा मुहूर्त टळला, आता दिवाळीवर नजरा 

लोकमत न्यूज नेटवर्क

यवतमाळ : अतिवृष्टी व पुरामुळे पशिचम  विदर्भातील सहा लाख शेतकऱ्यांचे पिकांचे नुकसान झाले आहे. त्यांना दसऱ्यापूर्वी नुकसानभरपाई देण्याची घोषणा शासनाने केली होती. परंतु हा मुहूर्त टळला. आता किमान  दिवाळीपूर्वी तरी मदतीची ही रक्कम पदरी पडते काय, याकडे शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत. 

जून ते सप्टेंबर या चार महिन्यात अमरावती विभागात चार लाख ७५ हजार ९९ हेक्टरमधील सोयाबीन, कपाशी, मूग, उडीद या प्रमुख पिकाचे ३३ टक्क्यापेक्षा अधिक नुकसान झाले. सहा लाख आठ हजार ५३१ शेतकऱ्यांना त्याचा फटका बसला. कृषी व महसूल विभागाने त्याचे पंचनामे केले. त्यावरून शासनाच्या निकषानुसार शेतकऱ्यांना नुकसानभरपाई पोटी ३४० कोटी २५ लाख ५१ हजार रुपयांच्या रकमेची मागणी करण्यात आली आहे. या नुकसानीचा अहवाल अमरावतीचे विभागीय महसूल आयुक्त पीयूष सिंग यांनी २० सप्टेंबरला शासनाला सादर केला. त्यानंतर दोनच दिवसात अर्थात दसऱ्यापूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदतीची रक्कम जमा होईल, अशी घोषणा सरकारने केली होती.  प्रत्यक्षात आजतागायत ही रक्कम जमा झाली नाही. किमान आता दिवाळीपूर्वी तरी ही रक्कम मिळावी अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. शासनाने मदतीची घोषणा केली. परंतु अद्याप त्या संबंधीचा शासन आदेश जारी करण्यात आलेला नाही.

सोलापूर, उस्मानाबादमुळे जीआर रखडला ऑक्टोबर महिन्यात अतिवृष्टीने मोठे नुकसान झाले. या नुकसानीचे वेगळे सर्वेक्षण केले जात आहे. सोलापूर व उस्मानाबाद  जिल्ह्यातील नुकसानीचे अहवाल शासनाला अद्याप प्राप्त न झाल्याने मदत वाटपासंबंधीचा शासन आदेश जारी करण्यात अडचण  निर्माण झाल्याची माहिती कृषी विभागातून देण्यात आली. पूर व अतिवृष्टीमुळे नुकसान झाले्ल्या जिरायती शेतीला हेक्टरी सहा हजार ८०० रुपये, बागायती शेतीला १३ हजार ५०० रुपये तर फळबागांना हेक्टरी १८ हजारांची मदत दिली जाते.

एकाच दिवशी ६५ मिमी पावसाच्या निकषाचा फटका शासकीय यंत्रणेने केलेल्या पंचनाम्यात अवघ्या ३४० कोटींचे नुकसान दाखविले गेले असले तरी प्रत्यक्षात हे नुकसान किती तरी अधिक आहे.  अतिवृष्टीत या नुकसानीसाठी एकाच दिवशी ६५ मिमी पेक्षा अधिक पाऊस हा निकष लावला जातो. परंतु प्रत्यक्षात ६५ मिमी पेक्षा कमी पाऊस होऊनही शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र या निकषामुळे शेतकरी नुकसानभरपाईपासून वंचित राहणार आहे. त्यामुळे ६५ मिमी पेक्षा कमी पाऊस झालेल्या ठिकाणांचे पंचनामेही करण्याची मागणी होत आहे.जून ते सप्टेंबर या काळात पूर, पाऊस व अतिवृष्टीमुळे कितीही नुकसान झाले तरी शेतकऱ्याला एकच वेळा नुकसान भरपाई दिली जाते. गाव आणि शेतकरी बदलला तरच नवे नावे यादीत समाविष्ट केले जाते. शासनाकडून लवकरच मदत वाटपाचा आदेश जारी होण्याची प्रतीक्षा आहे. - सुभाष नागरे, विभागीय सहसंचालक (कृषी), अमरावती

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती