शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray : "संरक्षक जाळ्या काढून तुमचाच कडेलोट…", नरहरी झिरवळांच्या आंदोलनावर राज ठाकरेंची टीका
2
ऐतिहासिक वाढ! भारताचा परकीय चलन साठा पहिल्यांदाच 700 अब्ज डॉलर्स पार
3
छत्तीसगडच्या बस्तरमध्ये भीषण चकमक; सुरक्षा दलांनी 30 नक्षलवाद्यांचा केला खात्मा
4
आता अहमदनगर नव्हे तर 'अहिल्यानगर'! नामांतराच्या प्रस्तावाला केंद्राची मंजुरी
5
टीम इंडियाच्या माजी क्रिकेटपटूच्या आईचा पुण्यातील राहत्या घरात सापडला मृतदेह
6
इस्रायलनं नकाशात भारतासोबत असं काय केलं की लोक भडकले? ताबडतोब घेण्यात आली अ‍ॅक्शन
7
शिक्षकाचं संपूर्ण कुटुंब संपवणारा आरोपी अखेर अटकेत, समोर आली धक्कादायक माहिती
8
INDW vs NZW: भारतीय महिला संघाचा पहिला सामना; New Zealand Women सेट करणार टार्गेट
9
PAK vs ENG : आपल्याच देशात पाकिस्तानची 'कसोटी'! पण पहिल्या सामन्यापूर्वी मिळाला सुखद धक्का
10
“राज्यातील राजकारणाला जनता कंटाळली, एक सुसंस्कृत पर्याय म्हणून तिसरी आघाडी”: संभाजीराजे
11
दहशतवाद्यांचा कर्दनकाळ माजी IPS अधिकारी आता BCCI मध्ये काम करणार; मोठी जबाबदारी मिळाली!
12
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर पाकिस्तानला जाणार; SCO शिखर परिषदेत सहभागी होणार
13
काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा आजचा कोल्हापूर दौरा रद्द, कारण..
14
२२ वर्षांनी घेतला वडिलांच्या हत्येचा बदला, मुलाने खुन्याला त्याच स्टाईलनं संपवलं   
15
TRAI कडून पुन्हा कारवाई, १८ लाखांहून अधिक मोबाईल नंबर्स ब्लॉक; तुम्हीही करत आहात ही चूक?
16
कॅनडातील भीषण वास्तव; वेटरच्या नोकरीसाठी सुशिक्षित भारतीयांनी लावल्या रांगा...
17
इस्रायलची मोठी कारवाई; हिजबुल्लाह प्रमुख हाशिम सफीद्दीनचा खात्मा, आता फक्त एकच जिवंत...
18
पाकिस्तानी हिंदू विद्वानानं झाकीर नाईकला आरसा दाखवला; कट्टरपंथी मानसिकतेवर बोचरा प्रश्न विचारला अन्...
19
Women’s T20 World Cup : कोडं सुटलं; पण Harmanpreet Kaur समोर उभं राहिलं मोठं चॅलेंज
20
मच्छिमार महामंडळासाठी ५० कोटी मंजूर, राज्य सरकारचे मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय, वाचा...

सोयाबीन शेंगाविना अन् पऱ्हाटीला पाच बोंडे

By admin | Published: November 16, 2015 2:20 AM

निसर्गाच्या अवकृपेने पुन्हा शेतकरी संकटात सापडले आहे. यावर्षी सोयाबीनच्या झाडाला शेंगाच धरल्या नाही.

शेतकरी हवालदिल : निसर्गाच्या अवकृपेने बजेट बिघडले, रबी हंगामही संकटातयवतमाळ : निसर्गाच्या अवकृपेने पुन्हा शेतकरी संकटात सापडले आहे. यावर्षी सोयाबीनच्या झाडाला शेंगाच धरल्या नाही. तर आता पऱ्हाटीलाही चार ते पाचच बोंडे आहेत. त्यामुळे लावलागवडीचा खर्चही निघणार की नाही, अशी भीती शेतकऱ्यांना आहे. या परिस्थितीमुळे शेतकरी हतबल झाल्याचे दिसत आहे.जिल्ह्यात यावर्षी कोरड्या दुष्काळाचे सावट आहे. सुरुवातीपासूनच पावसाने दडी मारली. त्यानंतर शेतकऱ्यांना दुबार-तिबार पेरणी करावी लागली. अशा स्थितीत पोळ्याच्या आठवड्यात पाऊस आला. पिकांना जीवदान मिळाले. मात्र त्यानंतर पावसाने दडी मारली. अशा स्थितीत तळपत्या उन्हाने सोयाबीन करपून गेले. झाडाची पाने पिवळी पडून गळून गेली. शेंगाही भरल्या नाही. त्यामुळे सोयाबीन काढण्यापेक्षा त्यात जनावरे सोडणे शेतकऱ्यांना सोईचे झाले. त्यामुळेच सोयाबीनपासून उत्पन्नाची कोणतीही आशा शेतकऱ्यांना नाही. कपाशीचीही अशीच अवस्था आहे. लाल्या आणि इतर किडींच्या आक्रमणाने पऱ्हाटीच्या झाडावर बोंडेच धरली नाही. सध्या चार ते पाच बोंडे पऱ्हाटीला दिसत आहे. त्यामुळे कपाशीचे उत्पादनही घटण्याची शक्यता आहे.नांगरणीपासून वेचणीपर्यंत शेतकऱ्याला मोठा खर्च करावा लागतो. बी-बियाणे, मजुरांची मजुरी, अंतर मशागत, रासायनिक खते, फवारणी आदींमध्ये जवळपास एकरी पाच ते पाच हजार रुपये खर्च येतो. आजच्या स्थितीत एकरी दोन क्ंिवटलही कापूस होण्याची शक्यता नाही. त्यामुळे लागवडीचा खर्च निघते की नाही, अशी भीती शेतकऱ्यांना आहे. सध्या कपाशीचे भावही कमी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची स्थिती केविलवाणी आहे. शेतकऱ्यांपेक्षा मजुरांची स्थिती चांगली दिसत आहे. एका पाठोपाठ एक संकटाचा मारा झेलणारा शेतकरी पुरता हतबल आहे. मात्र निवडणुकीच्या रणधुमाळीत त्यांचा आवाज क्षीण झाला आहे. रबी हंगामापासून शेतकऱ्यांना आशा आहे. परंतु मशागतीसाठीच पैसे नाही. त्यातच भारनियमनाचे संकट आहे. अशा परिस्थितीत रबी पिकही शेतकऱ्यांच्या हाती लागण्याची शक्यता कमी आहे.गेल्या दहा वर्षांपासून शेतकरी विविध संकटांचा सामना करीत आहे. कधी कोरडा तर कधी ओला दुष्काळ येत आहे. अशा स्थितीत शासन मदत घोषित करते. मात्र ही मदतही सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही. सर्वच बाजूंनी त्यांची कोंडी झाली आहे. शेतकऱ्यांच्या या स्थितीला जबाबदार कोण, असा प्रश्न आता गावागावातील शेतकरी विचारत आहे. (स्थानिक प्रतिनिधी)