शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

सोयाबीनचा भाव साडेपाच हजार रुपये क्विंटलच्या दिशेने; दर ३०० रुपयांनी वधारले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 06, 2022 10:28 PM

परतीच्या पावसाने सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. एकरी उत्पादन घटल्यानंतर दरामध्येदेखील निम्याने घट झाली आहे. यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी यावर्षी चांगलेच अडचणीत आले आहे. किमान दहा हजार रुपये क्विंटलचा दर सोयाबीनला मिळेल अशी आशा शेतकऱ्यांना होती. दोन वर्षापूर्वी सोयाबीनला याच पद्धतीचा दर मिळाला होता.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : गतवर्षी साडेसात हजार रुपये क्विंटलपर्यंतचा दर साेयाबीनला मिळाला होता. यावर्षी सोयाबीन बाजारात येण्यापूर्वीच साेयाबीनचे दर घसरले. यामुळे शेतकरी चांगलेच हादरले आहेत. तेलाच्या किमती वाढल्यानेे आणि ढेपीच्या मागणीत सुधारणा झाल्याने सोयाबीनच्या दरात सुधारणा झाली आहे. सोमवारी सोयाबीनचे दर साडेपाच हजार रुपये क्विंटलपर्यंत जातील असा अंंदाज व्यापारी वर्तवित आहेत. बाजारपेठेतील सोयाबीन दराबाबत अनिश्चितता व्यक्त होत होती. याच सुमारास सोयाबीनचे दर सुधारत असल्याची बाब पुढे आली आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या. या दरात आणखी सुधारणा होईल काय याची प्रतीक्षा शेतकरी करीत आहेत.किमान गतवर्षीच्या सोयाबीन दराची रेंज मिळेल काय, याबाबत शेतकरी प्रतीक्षा करीत आहेत. सध्या बाजारात सोयाबीनला मिळणारे दर परवडणारे नाही. यातून शेतकरी सोयाबीन विक्रीसाठी नेण्यापासून थांबला आहे. आता बाजारात सोयाबीनची आवक घटली आहे. पुढील आठवड्यात बाजारपेठेत सोयाबीनची आवक वाढण्याचे संकेेत  आहेत. रब्बीची पेरणी तोंडावर आहे. सोयाबीन काढणीला मोठा पैसा खर्च झाला आहे. हातात पैसेच शिल्लक राहिले नाहीत. यातून शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीचा निर्णय घेतला आहे. अल्पावधीत हातात येणारे पीक म्हणून शेतकऱ्यांनी सोयाबीनची निवड केली होती. परतीच्या पावसाने सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. एकरी उत्पादन घटल्यानंतर दरामध्येदेखील निम्याने घट झाली आहे. यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी यावर्षी चांगलेच अडचणीत आले आहे. किमान दहा हजार रुपये क्विंटलचा दर सोयाबीनला मिळेल अशी आशा शेतकऱ्यांना होती. दोन वर्षापूर्वी सोयाबीनला याच पद्धतीचा दर मिळाला होता. परतीच्या पावसाने नुकसान झालेले असतानाही सोयाबीनच्या दरात मोठी घट झाल्याने शेतकऱ्यांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे. यातूनच सोयाबीन विकताना शेतकऱ्यांनी आखडता हात घेतला.

अडीच लाख हेक्टरवर सोयाबीनची पेरणीजिल्ह्यात यावर्षी अडीच लाख हेक्टरवर शेतकऱ्यांनी सोयाबीनची पेरणी केली आहे. गतवर्षी सोयाबीनला चांगले दर मिळाल्याने यावर्षी सोयाबीनच्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली. सोयाबीनचे मिळणारे दर पाहून शेतशिवारात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी खर्च केला होता. बाजारपेठेत सोयाबीन विक्रीला आल्यानंतर सोयाबीनचे दर घसरले. यामुळे शेतकऱ्यांना चांगलाच फटका बसला आहे. शेतमालाचे दर सुधारतील या आशेने शेतकऱ्यांनी सोयाबीनची विक्री करणे थांबविले आहे. या परिस्थितीत दरामध्ये आणखीन सुधारणा झाली तर शेतकऱ्यांचा शेतशिवारातील घाटा थोडाफार भरून निघेल.

सोयाबीन उत्पादकांची धाकधूक वाढलीदरातील चढ-उताराने शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली आहे. उत्पादन घटले आहे. याच दर घटले आहेत. यामुळे पुढे शेती करावी कशी असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे आहे.

शेतकऱ्यांनी घेतला सावध पवित्रादरातील  चढ-उतार पाहता शेतकऱ्यांनी सोयाबीनची विक्री थांबविली आहे. आवश्यकता पडेल तितकेच सोयाबीन विकले जात आहे. यामुळे बाजारपेठेत शुकशुकाट पाहायला मिळत आहे. दर वधारल्यानंतरच सोयाबीन विक्रीसाठी गर्दी होण्याची शक्यता आहे. 

 

टॅग्स :agricultureशेतीMarket Yardमार्केट यार्ड