शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
3
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
4
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
5
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
6
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
7
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
8
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
9
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
10
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
11
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
12
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
13
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
14
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
15
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
16
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
17
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
18
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
19
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
20
मायेची फुंकर! ब्रेकअप-स्ट्रेस- रागावर नियंत्रण यासाठी थेरपी देणारी उशी,अनेक दुखण्यांवर औषध

सोयाबीनला मिळतो हमी दरापेक्षा कमी भाव; शेतकरी चिंताग्रस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2024 17:10 IST

Yavatmal : खर्च अधिक आणि उत्पन्न कमी असल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका

लोकमत न्यूज नेटवर्क पुसद : सोयाबीनचा हंगाम सुरू झाला आहे. मात्र, मागील काही दिवसांपासून सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. अशातच सोयाबीनला किमान चार हजार, तर कमाल चार हजार ६०० रुपये प्रतिक्विंटल पर्यंतच भाव मिळत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहे.

शासनाचा हमीभाव कागदावरच आहे. प्रत्यक्ष भाव कमी मिळत आहे. सोयाबीन बाजारात येण्याआधी शासनाने जरी आयात शुल्कात वाढ केली, तरी मात्र प्रत्यक्षात सोयाबीन खरेदी करणारे व्यापारी जागतिक बाजारपेठ व पुढील नियोजन करूनच सोयाबीन खरेदी करीत आहेत. 

शेतकऱ्यांना शेतीच्या मशागतीपासून तर पेरणी, फवारणी आणि सोयाबीन काढणी आदी कामांसाठी खूप मोठा खर्च येतो. मात्र सोयाबीनला योग्य भाव मिळत नाही. खर्च अधिक आणि उत्पन्न कमी असल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. मागील अनेक वर्षांपासून सोयाबीनच्या दरामध्ये सातत्याने घसरणच होत आहे. शिवाय विविध कारणांमुळे सोयाबीनचा उताराही घटत आहे. 

दरवाढीच्या आशेने सोयाबीन घरात दरामध्ये वाढ होईल या आशेने काही शेतकऱ्यांनी मागील दोन वर्षांपासून सोयाबीन राखून ठेवले आहे. आता विकायला काढण्याचा प्रयत्न केला तरी चांगला भाव मिळत नाही. नाईलाजाने त्यांना मातीमोल भावाने सोयाबीनची विक्री करावी लागत आहे. शासनाच्या कृषी धोरणावर शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त केला जात आहे. सोयाबीनचा हमीभाव चार हजार ९०० रुपये प्रती क्विंटल आहे. प्रत्यक्षात यापेक्षा किती तरी कमी दराने खरेदी करावी लागत आहे. यामध्ये शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.

टॅग्स :YavatmalयवतमाळAgriculture Sectorशेती क्षेत्रfarmingशेतीFarmerशेतकरी