शहरं
Join us  
Trending Stories
1
Ratan Tata Passed Away: भारताच्या उद्योगविश्वातील रत्न निखळलं! 'पद्मविभूषण' रतन टाटा कालवश, देशाची मोठी हानी
2
Ratan Tata Passed Away : “मोठं स्वप्न पाहणं अन् दुसऱ्यासाठी दायित्वाची भावना...” PM मोदींनी या शब्दांत वाहिली टाटांना श्रद्धांजली
3
Ratan Tata News Live: ज्ञानी-दानी अन् स्वाभिमानी 'भारत रतन'; देश गहिवरला, मान्यवरांची रतन टाटांना श्रद्धांजली
4
भारताच्या 'रत्ना'ची कहाणी, टाटामध्ये असिस्टंट म्हणून सुरू केलेला प्रवास; नंतर कंपनीला बनवला आंतरराष्ट्रीय ब्रँड
5
Ratan Tata Death: गडकरींची टाटांना आदरांजली: देशाने संवेदनशील उद्योजक-समाजसेवक गमावल्याची व्यक्त केली भावना
6
Ratan Tata News : रतन टाटांना मिळालं अपार प्रेम, ३८०० कोटींच्या मालकानं कशी बनवली कोट्यवधी लोकांच्या मनात जागा
7
Ratan Tata: एका कुटुंबाचा उद्योग ते 'देशाचा विश्वास'! रतन टाटांनी असं उभारलं 'जगात भारी' व्यवसाय साम्राज्य
8
नाशिकच्या नेहरु वनोद्यानाने रतन टाटा यांना घातली होती भुरळ; राज ठाकरे यांना म्हणाले होते, हा तर इनोव्हेटिव्ह प्रोजेक्ट...!
9
Ratan Tata News: ७९ व्या वाढदिवशी टाटा पोहोचले होते संघ मुख्यालयात; नेमकं काय घडलं होतं?
10
महाराष्ट्राच्या फायद्यासाठी हरयाणाची पुनरावृत्ती करा; अजित पवार यांचं राज्यातील जनतेला आवाहन
11
OBC यादीत महाराष्ट्रातील काही जातींचा समावेश होणार; राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाची केंद्र सरकारला शिफारस
12
IND vs BAN : विक्रमी विजयासह टीम इंडियाच्या नावे झाली आणखी एक मालिका
13
महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये हरियाणाच्या निकालाची पुनरावृत्ती होणार; चंद्राबाबू नायडूंचे भाकित
14
Nitish Reddy अन् Rinku Singh ची दमदार फिफ्टी, टीम इंडियाच्या नावे झाले २ मोठे विक्रम
15
पराभव जिव्हारी, निवडणूक आयोगाच्या भेटीनंतर काँग्रेस नेते म्हणाले- 'EVM शी छेडछाड...'
16
लेडी सिंघम..!! काजोलच्या हॉट अन् डॅशिंग लूकवर चाहत्यांच्या खिळल्या नजरा, पाहा Photos
17
महाराष्ट्र जिंकणं काँग्रेससाठी सोपं नाही, हरयाणाच्या निकालामधून शिकावे लागतील हे धडे
18
‘वंचित’चा सातारा जिल्ह्यातील पहिला उमेदवार जाहीर; माणमध्ये इम्तियाज नदाफ 
19
"इतिहास माझ्या कारकीर्दीचं मूल्यमापन कसं करेल?"; CJI चंद्रचूड नक्की काय म्हणाले?
20
Shafali Verma चा मोठा पराक्रम; श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात गाठला मैलाचा पल्ला

केंद्रीय राज्यमंत्र्यांकडून कानउघाडणी

By admin | Published: January 01, 2016 3:49 AM

जिल्हास्तरीय दक्षता व सनियंत्रण समितीच्या सभेत इंदिरा गांधी विकलांग योजनेची माहिती समितीचे अध्यक्ष केंद्रीय

यवतमाळ : जिल्हास्तरीय दक्षता व सनियंत्रण समितीच्या सभेत इंदिरा गांधी विकलांग योजनेची माहिती समितीचे अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी अधिकाऱ्यांना विचारली. या अधिकाऱ्यांनी अशी योजना माहिती नसल्याचे उत्तर दिले. यावरून ना. अहीर यांनी अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली. सभेत ग्रामीण पाणीपुरवठा, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, रोजगार हमी योजना, कृषी विभागाच्या योजना यांचा सखोल आढावा घेण्यात आला. दक्षता व सनियंत्रण समितीच्या सभेत विषयानुरुप आढावा घेतला जात असताना अधिकाऱ्यांकडून चक्क खोटी माहिती दिली जात होती. भाजपा आमदारांकडून या अधिकाऱ्यांची पोलखोल करण्यात आली. बैठकीला जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. आरती फुपाटे, आमदार संजीवरेड्डी बोदकूरवार, आमदार अशोक उईके, आमदार राजेंद्र नजरधने, आमदार मदन येरावार उपस्थित होते. इंदिरा गांधी विकलांग योजना काय आहे, याची विचारणा ना.अहीर यांनी समाज कल्याण अधिकाऱ्याकडे केली. त्यांनी अशी कोणतीच योजना माहीत नसल्याचे सांगितले. जिल्ह्यात या योजनेतून केवळ २५७ अपंग, मतिमंद यांना लाभ दिला जातो. प्रत्यक्षात जिल्ह्यातील अपंग व मतिमंदाचा आकडा फार मोठा आहे. तसेच या योजनेतून सिकलसेल ग्रस्तांनाही लाभ देण्याची सोय आहे. असे असतानाही त्याचा लाभ दिला जात नाही. जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाने जिल्ह्यातील ४० टक्क्यापेक्षा अधिक अपंगत्व असलेल्यांची यादी तहसीलदारांकडे सादर करावी, सिकलसेल रुग्णांची यादी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्याने द्यावी, असे निर्देश दिले. या याद्या मिळताच इंदिरा गांधी विकलांग योजनेचा किती जणांना लाभ देता येतो त्यासाठी तहसीलदारांनी प्रयत्न करावे, असे सांगण्यात आले. अधिकारी वर्ग अपंग व मतिमंदांच्या योजना राबविण्यातही कुचराई करीत असल्याचे या बैठकीत उघड झाले. ग्रामीण पाणीपुरवठ्याच्या निधीअभावी रखडलेल्या योजना पूर्ण करण्यासाठी त्या-त्या क्षेत्रातील आमदारांनी निधी देण्याची तयारी दर्शविली. तशा योजनांची यादीच आमदारांकडे सादर करण्याचे निर्देश जीवन प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले. आर्णी येथील पाणीपुरवठा योजनेच्या कामात कंत्राटदाराने तक्रार केली. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांकडून स्थगिती देण्यात आली. याबाबत आमदार राजू तोडसाम यांनी विचारणा केली. यावर जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी सदर प्रकरणात कंत्राटदाराने मंत्र्याकडे तक्रार केली. मंत्र्यांनी केलेल्या सूचनेवरून काम थांबविण्यात आल्याचे सांगितले. या आक्षेपावर अहवाल तयार करून मंत्र्यांकडे त्वरित पाठवावा, असे निर्देश देण्यात आले. सिकलसेल रुग्णांसाठी कुठल्याही प्रकारचा निधी नसल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी के.झेड. राठोड यांनी सांगितले. (कार्यालय प्रतिनिधी)रंगरंगोटी व टाईल्ससाठी नळयोजना बंद४महागाव येथील नळ योजनेचे काम पूर्ण झाले असून ती का बंद आहे, अशी विचारणा आमदार राजेंद्र नजरधने यांनी केली. यावर जीवन प्राधिकरणच्या अधिकाऱ्याने अतिशय चिड आणणारे उत्तर दिले. रंगरंगोटी व टाईल्स बसविण्याचे काम थांबल्यामुळे योजना वर्षभरापासून बंद असल्याचे सांगितले. सुरुवातीला ही योजना सुरू असल्याचे उत्तर देत अधिकाऱ्यांनी वेळ मारुन नेण्याचा प्रयत्न केला. मात्र आमदार नजरधने यांनी तुम्ही येथे भेट दिली काय असे विचारताच त्यांनी नुकताच प्रभार आल्याचे ठेवणीतील उत्तर समितीपुढे दिले. त्यानंतर संबंधित अधिकाऱ्याला सर्वांनीच धारेवर धरले.