शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत ठाकरेंच्या युवासेनेचा जल्लोष; सिनेट निवडणुकीत पुन्हा एकदा १० पैकी १० विजयी
2
विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात घ्या; शिंदेसेना, अजित पवार गटाची मागणी
3
Today Daily Horoscope आजचे राशीभविष्य: विविध पातळ्यांवर यश, किर्ती व लाभासह धन प्राप्ती होईल
4
धक्कादायक! नांदेडमध्ये पाण्यातून दोनशेहून अधिक जणांना विषबाधा, ६ जण गंभीर
5
उद्धव युवासेनेचा अखेर सिनेटवर झेंडा; विद्यापीठाच्या निवडणुकीत अभाविपचा उडाला धुव्वा
6
अग्रलेख : फडणवीसांचा कबुलीनामा; अजित पवारांना सोबत घेतल्यानंतर ‘परिवार’ फारच अस्वस्थ
7
मतदारांची गैरसोय झाल्यास अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई; केंद्रीय निवडणूक आयोगाचा इशारा
8
बहिणींच्या पैशांवर नजर ठेवाल तर खबरदार...; फडणवीस यांचा विरोधकांना इशारा
9
मध्य रेल्वेवर उद्या ५ तासांचा मेगाब्लॉक; तिन्हा मार्गांवरील लोकल धावणार उशिरा
10
नसराल्लाह मारला गेला? हिजबुल्लाहच्या मुख्यालयावर इस्रायलचा मोठा हल्ला
11
महायुतीमधील वाद विकोपाला गेले तर बसेल फटका; मीरा-भाईंदर, ऐरोली, बेलापूर, ठाणे मतदारसंघात अंतर्गत धुसफूस
12
"मला क्लीन चिट मिळाल्यामुळेच चांदीवाल आयोगाचा अहवाल दडवला", अनिल देशमुखांचा शिंदे सरकारवर आरोप
13
सरकारची मोठी कारवाई, Aadhaar आणि PAN Card चा डेटा लीक करणाऱ्या ३ वेबसाइट्स ब्लॉक! 
14
ऋता आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करा; व्हायरल व्हिडीओवरून परांजपे यांची मागणी
15
Ujjain Mahakal Temple Wall Collapse: उज्जैनच्या महाकाल मंदिराजवळ मोठी दुर्घटना! मुसळधार पावसाने भिंत कोसळली, दोघांचा मृत्यू
16
ठाणे, वसईत २० लाखांत घर; म्हाडाच्या कोकण मंडळाचा ‘धमाका’
17
'त्या' दोन अल्पवयीन मुलींवर आणखी ७ जणांनी अत्याचार केल्याचे उघड!
18
शून्य मोजून थकाल; भारतात लॉन्च झाली Rolls-Royce ची सर्वात महागडी कार, किंमत तब्बल...
19
उद्योगपती मंदाना यांची १७० कोटींची मालमत्ता जप्त; बँक ऑफ बडोदाची फसवणूक केल्याचा ठपका
20
भारताने कलम 370 लागू करावी; संयुक्त राष्ट्राच्या मंचावर शाहबाज शरीफ यांनी गरळ ओकली

उद्घाटनापूर्वीच जलकुंभाला भगदाड

By admin | Published: December 31, 2016 1:06 AM

लोहारा परिसरातील लाखो नागरिकांची तहान भागविण्यासाठी वाघापूर-लोहारा बायपासवरील वैभवनगरात बांधण्यात आलेल्या

जीवन प्राधिकरण : ‘ट्रायल’लाच धो-धो, चहूबाजूने लागल्या धारा यवतमाळ : लोहारा परिसरातील लाखो नागरिकांची तहान भागविण्यासाठी वाघापूर-लोहारा बायपासवरील वैभवनगरात बांधण्यात आलेल्या जलकुंभाचे पितळ चाचणीतच उघडे पडले. पाणी भरताच जलकुंभाला चौफेर धारा लागल्याने लाखो लिटर पाण्याचा अपव्यय झाला. संपूर्ण परिसर जलयम झाला होता. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून मात्र याविषयी सारवासारव केली जात आहे. पाच वर्षापूर्वी मंजूर झालेल्या लोहारा वाढीव पाणीपुरवठा योजने अंतर्गत दारव्हा रोडवरील सुयोग नगरात एक आणि वैभवनगरात दुसरा जलकुंभ उभारण्यात आला. वैभवनगरातील जलकुंभ चाचणी घेण्यासाठी गुरूवारी भरण्यात आला. लाखो लिटर पाणी त्यामध्ये भरण्यात आले. वास्तविक या जलकुंभाचे बरेच काम शिल्लक आहे. तरीही चाचणीची घाई करण्यात आली. पाणी भरताच जलकुंभाच्या सर्व भागाकडून पाणी धो-धो वाहण्यास सुरूवात झाली. चार ते पाच इंचाच्या पाईपमधून वाहतात ऐवढ्या या पाण्याच्या धारा होत्या. परिसरातील नागरिकांनी हा विषय प्राधिकरणातील अधिकाऱ्यांच्या कानावर घातला. परंतु ही बाब त्यांच्या हाताबाहेर गेली होती. पाण्याचा अपव्यय होताना पाहण्याशिवाय त्यांच्याकडे उपाय नव्हता. वास्तविक नवीन बांधलेल्या जलकुंभाची चाचणी घेण्यासाठी त्यात टप्प्याटप्प्याने पाणी भरणे अपेक्षित आहे. शिवाय, आतील छपाई झाली की नाही, आऊटलेट, इनलेट, बायपास, ओव्हरफ्लो सुस्थितीत बसविला आहे की नाही याची तपासणी करणे आवश्यक आहे. मात्र वैभवनगरातील जलकुंभाची चाचणी या सर्व बाबी न तपासता करण्यात आल्याचे सांगण्यात येते. प्राधिकरणाने चाचणीसाठी इतकी घाई का केली, हा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे. (शहर वार्ताहर) फिनिशिंगपूर्वीच भरले जलकुंभ वैभवनगरातील जलकुंभातून धो-धो पाणी वाहत असल्याविषयी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे उपविभागीय अभियंता बेले यांच्याशी संपर्क केला असता, त्यांनी छपाई आणि फिनिशिंग न झाल्याने जलकुंभातून पाणी वाहत असल्याचे सांगितले. खुद्द या विभागाच्या अधिकाऱ्यानेच काम पूर्ण न झाल्याच्या बाबीला दुजोरा दिला. मात्र आता या प्रकाराविषयी साशंकता व्यक्त केली जात आहे. पाण्याचा अपव्यय होऊ नये यासाठी मजीप्रा ‘सजग’ आहे. मग वैभवनगरातील जलकुंभ भरताना विचार का केला गेला नाही असा प्रश्न उपस्थित केला.