शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

एसटी महामंडळाने दिली अस्थायी कामगारांना बढती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2018 22:24 IST

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या यवतमाळ विभागात प्रशासकीय कामांचा खेळखंडोबा सुरू आहे. आस्थापना विभागावर वरिष्ठांचे नियंत्रण नसल्याने हा प्रकार सुरू आहे.

ठळक मुद्देनियमांना तिलांजली : भविष्याची चिंता

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या यवतमाळ विभागात प्रशासकीय कामांचा खेळखंडोबा सुरू आहे. आस्थापना विभागावर वरिष्ठांचे नियंत्रण नसल्याने हा प्रकार सुरू आहे. हजारावर कामगारांना मागील अनेक वर्षापासून स्थायी करण्यात आलेले नाही. यामध्ये भविष्यात कर्मचाऱ्यांचे नुकसान होण्याची भीती आहे.एसटी महामंडळात रुजू झाल्यानंतर प्रथम वेतनवाढ देण्यापूर्वी कामगारांना स्थायी करणे आवश्यक आहे. मात्र यवतमाळ विभागात ही प्रक्रियाच मागील काही वर्षांपासून करण्यात आलेली नाही. या कर्मचाºयांना महामंडळाचे सर्व आर्थिक लाभ मिळत आहे. मात्र स्थायी करण्यात आले नसल्याने त्यांची सेवा नेमकी किती वर्ष झाली हा प्रश्न पुढील काळात निर्माण होण्याची शक्यता आहे.विशेष म्हणजे कामगारांना स्थायी करावे लागते यापासून काही कर्मचारी अनभिज्ञ आहेत. सदर प्रक्रियेची जबाबदारी सांभाळणारे कर्मचारी, पर्यवेक्षक आणि अधिकाºयांना यासाठी जबाबदार धरून कारवाई करावी तसेच जुन्या तारखेपासूनच स्थायी आदेश काढण्यात यावे, अशी मागणी या कामगारांमधून जोर धरू लागली आहे.दरम्यान एसटी कामगार सेनेचे विभागीय सचिव सुरेश कन्नाके यांनी यासंदर्भात विभाग नियंत्रकांकडे तक्रार नोंदविली आहे.खातेअंतर्गत बढतीस्थायी नसलेल्या कर्मचाऱ्यांना खाते अंतर्गत बढती देण्याची किमया यवतमाळ विभागात करण्यात आली आहे. स्थायी कर्मचाऱ्यांनाच अटी पूर्ण करत असल्यास बढती परीक्षेस परवानगी दिली जाते. यानंतरच पुढे बढती मिळते. यवतमाळात मात्र एसटी महामंडळाच्या सर्व नियमांना तिलांजली देवून अस्थायी कामगारांना बढती दिली गेली आणि दिली जात आहे.

टॅग्स :state transportराज्य परीवहन महामंडळ