शहरं
Join us  
Trending Stories
1
'शिवसेनेमुळे काँग्रेस-राष्ट्रवादीला सत्ता मिळाली', ठाकरेंचा नेता मुख्यमंत्रि‍पदाबद्दल काय बोलला?
2
धक्कादायक माहिती! 'त्या' दुर्घटनाग्रस्त हेलिकॉप्टरने सुनील तटकरे करणार होते प्रवास
3
अनंत अंबानी उद्धव ठाकरेंच्या भेटीला; 'मातोश्री'वर २ तास बैठक, काय घडलं?
4
'...ही चूक पुन्हा झाल्यास कठोर कारवाई होणार'; Suzlon Energy ला BSE, NSE चा इशारा
5
स्वत:च शिवली वर्दी, पैशांबाबत बोलला खोटं; २ लाखांत IPS झालेल्या मिथिलेशच्या कहाणीत नवा ट्विस्ट
6
गोविंदाला गोळी लागल्यानंतर रात्री उशिरा कृष्णा अभिषेकची सोशल मीडिया पोस्ट; म्हणाला, 'मामा...'
7
Video - संतापजनक! फी न भरल्याची तालिबानी शिक्षा; शाळेतून काढून टाकलं, उन्हात बसवलं अन्...
8
"PM मोदींचा फोन आला, पण 'त्या' अटींमुळे बोलले नाही"; विनेश फोगटचा खुलासा
9
नवरात्रोत्सव का साजरा करतात? नवरात्रात नेमके काय करावे? वाचा, प्राचीन लोकोत्सवाचे महात्म्य
10
युद्ध पेटलं! इराणचा इस्त्रालयवर मिसाईल हल्ला; अमेरिकन सैन्यानं दिलं चोख उत्तर
11
कथोरे, आव्हाड, केळकर यांची प्रश्नांची सरबत्ती; चौदाव्या विधानसभेत आघाडीवर; नाईक, जैन तळाशी
12
नवरात्र: भक्तांसाठी स्वामींनी घेतले गृहलक्ष्मीचे रुप; अन्नपूर्णा होऊन दर्शन दिले, खाऊही घातले
13
Navratri 2024: मंचकी निद्रा संपवून सिंहारूढ होण्यासाठी आई तुळजाभवानी झाली सज्ज!
14
अनिल अंबानींचं नशीब पालटलं, 'अच्छे दिन'ची सुरुवात? आता ₹२९३० कोटींचा फंड उभारायला मंजुरी
15
हरियाणा निवडणुकीदरम्यान राम रहीम तुरुंगातून बाहेर; २० दिवस बागपत आश्रमात राहणार
16
"२०२४ मध्ये जिंकू शकत नाही मान्य केल्यामुळे..."; अमित शाहांच्या 'त्या' विधानावर काँग्रेसचा पलटवार
17
Maharashtra Politics : '२०२९ मध्ये भाजपाचे सरकार येणार', शाहांचं विधान; अजित पवार, एकनाथ शिंदे, जयंत पाटील काय म्हणाले?
18
Iran Israel संघर्षाचा भारतीयांनाही बसणार फटका! कच्च्या तेलाच्या किंमतीचा भडका 
19
बिग बॉस ओटीटी फेम अदनान शेखने मराठी मुलीशी केलं लग्न, पत्नीने लग्नानंतर बदलला धर्म?

खरेदी सुरू करा, अन्यथा कारवाईला सामोरे जा

By admin | Published: April 11, 2017 12:05 AM

व्यापाऱ्यांनी उपस्थित केलेल्या ईलेक्ट्रॉनिक काट्याच्या वादातून येथील बाजार समितीचे व्यवहार १६ दिवसांपासून ठप्प पडले.

व्यापाऱ्यांना अल्टीमेटम : यवतमाळ बाजार समितीमध्ये १६ दिवसांपासून शेतकरी संकटात यवतमाळ : व्यापाऱ्यांनी उपस्थित केलेल्या ईलेक्ट्रॉनिक काट्याच्या वादातून येथील बाजार समितीचे व्यवहार १६ दिवसांपासून ठप्प पडले. आता पुन्हा खरेदी सुरू करण्यासाठी बाजार समितीने व्यापाऱ्यांना बुधवारपर्यंतचा अवधी दिला आहे. या कालावधीत खरेदी सुरू न झाल्यास व्यापाऱ्यांना कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.सुस्थितीत सुरू असलेल्या येथील बाजार समितीचे व्यवहार अचानक ठप्प पडल्याने शेतकऱ्यांचा नाहक बळी जात आहे. शेतमाल खरेदी होत नसल्याने आवश्यक कौटुंबिक गरजा भागविण्यासाठी शेतकऱ्यांना नाईलाजाने कमी दरात विकावा लागत आहे. आता बाजार समितीने शेतकरी हित लक्षात घेत ठोस पावले उचलण्याची तयारी सुरू केली. व्यापाऱ्यांच्या मालकीच्या ईलेक्ट्रॉनिक काट्याच्या भूमिकेला बाजार समितीने विरोध दर्शविला. वेगाने मोजणीसाठी सध्याची पद्धतीच योग्य असल्याचा दावा बाजार समितीने केला. त्यानुसार धान्य खरेदी करण्याची भूमिका बाजार समितीने घेतली आहे. या पद्धतीत कुठलाही बदल न करता व्यापाऱ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी बाजार समितीने पुढाकार घेतला. यात त्यांना बुधवारपर्यंत खरेदी सुरू करण्याचे निर्देश दिले. अन्यथा कारवाईचा बडगा उभारण्याचा इशारा दिला. बुधवारी दुपारी ४ वाजतापर्यंत बाजार समिती खरेदी सुरू होण्याची वाट बघणार आहे. त्यानंतर संचालक मंडळाची तातडीची बैठक होणार आहे. या बैठकीतील निर्णयानुसार व्यापाऱ्यांवर पुढील कारवाई केली जाणार आहे.खरेदी बंद असल्याने संचालकांची यापूर्वी बैठक झाली. मात्र ती अर्ध्यावरच संपली. तेव्हापासून हा प्रश्न रेंगाळत आहे. या प्रकरणात आता समन्वयाची गरज आहे. मात्र या समन्वयासाठी कोण पुढाकार घेणार, असा प्रश्न आहे. बाजार समिती व व्यापाऱ्यांच्या वादात शेतकरी मात्र नाहक भरडले जात आहे. (शहर वार्ताहर)बाजार समिती म्हणते, वजनकाटे का बदलायचे?व्यापाऱ्यांनी बाजार समितीला आपल्याच ईलेक्ट्रॉनिक काट्यांनी खरेदी करण्यासाठी निवेदन दिले. त्याला बाजार समितीने धुडकावून लावले. वजनमाप व्यवस्थित असताना काटे का बदलायचे, व्यापाऱ्यांचे काटे बसविण्यासाठी एवढा आग्रह का, असा बाजार समितीचा प्रश्न आहे. शेतकरी अडचणीत असताना व्यापाऱ्यांनी ही भूमिका का घेतली, असाही प्रश्न आहे. आत्तापर्यंत सेस कमी करण्यापासून तो निवासाच्या व्यवस्थेचा प्रश्न सोडविण्यात आला. असे असतानाही व्यापाऱ्यांचा त्यांच्या काट्यासाठी अट्टाहास का, असा प्रश्न बाजार समितीने उपस्थित केला आहे.काटे तुमचे, हमाल आमचे : व्यापाऱ्यांची भूमिकाईलेक्ट्रॉनिक काट्यासंदर्भात बाजार समितीला व्यापाऱ्यांनी १५ दिवसांपूर्वी निवेदन दिले. तथापि बाजार समितीच्याच ईलेक्ट्रॉनिक काट्यावर शेतमालाचे मोजमाप करण्यास व्यापारी तयार आहेत. पूर्वीप्रमाणे हे मोजमाप करावे, अशी त्यांची मागणी आहे. मात्र ईलेक्ट्रॉनिक काटे बाजार समितीचे असले, तरी हमाल मात्र व्यापाऱ्यांचे असतील, अशी मागणी आता व्यापाऱ्यांनी केली आहे. त्याबाबत बाजार समितीने निर्णय घ्यावा, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.मोजमापाची सध्याच्या प्रचलित पद्धतीची व्यापाऱ्यांनीच मागणी केली होती. यामुळे वेगाने काम सुरू झाले. ही पद्धत बरोबर आहे. आता या पद्धतीला व्यापारीच विरोध करीत असून त्यांची भूमिका चुकीची आहे.- रवींद्र ढोक सभापती, बाजार समिती, यवतमाळव्यापाऱ्यांना पूर्वीच्या पद्धतीनुसार मोजमाप हवे आहे. त्याकरिता बाजार समितीच्या ईलेक्ट्रॉनिक काट्यावरही मोजमाप चालेल. मात्र हमाल व्यापाऱ्यांचे असतील.- गोविंद भरतीया,व्यापारी, यवतमाळ