शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआच्या जागावाटपात संजय राऊतांसोबत वाद?; नाना पटोलेंनी सगळंच सांगितलं
2
ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याला अपहरण करून बेदम मारलं; धारदार शस्त्राने बोटे छाटले, वाद काय?
3
ज्योत आणायला गेलेल्या भाविकांच्या गाडीचा अपघात; दोघे ठार, सहा जण गंभीर जखमी
4
इस्रायल-इराण युद्ध एकतर्फी होणार नाही; जाणून घ्या कुणाची लष्करी ताकद किती?
5
पुणे हेलिकॉप्टर अपघातील मृतांबाबत महत्त्वाची समोर; भारतासाठी दिलं होतं मोठं योगदान
6
संपादकीय: विधानसभेचा निकाल देशाच्या राजकारणाची दिशा बदलेल, त्यांच्या बोलण्याचा अर्थ...
7
भारतीय गाढ झोपेत असताना दिसले 'रिंग ऑफ फायर', वर्षातील शेवटच्या सूर्यग्रहणाचे अमेरिकेतून फोटो आले...
8
यूएनच्या सरचिटणिसांना इस्रायलमध्ये प्रवेशबंदी; इराणला योग्य वेळी प्रत्युत्तर देण्याची इस्रायलची धमकी
9
Share Market News : गुंतवणूकदारांना शेअर बाजार पावला, या वर्षी कमावले ११०.५७ लाख कोटी; जाणून घ्या
10
इराणच्या आण्विक स्थळांवर इस्त्रायली हल्ल्याला अमेरिका समर्थन देणार नाही, बायडेन यांनी केले स्पष्ट
11
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक व व्यावसायिक दृष्टिकोनांतून आजचा दिवस लाभदायी
12
उपचारासाठी आले अन् कॅबिनमध्ये केली डॉक्टरची हत्या; पोलिसांकडून दोघांचा शोध सुरु
13
बदलापूर बलात्कार प्रकरणात मोठी कारवाई, त्या शाळेच्या दोन फरार पदाधिकाऱ्यांना अखेर अटक
14
हरयाणात भाजपची सत्ता जाते आहे, कारण..
15
नवरात्री: ‘माझ्यासाठी जे काही चांगले आहे, ते मला अवश्य मिळेल’
16
मविआतील लहान घटक पक्षांना हव्यात ४० जागा; प्रस्तावावर ७ आणि ८ ऑक्टोबरला पुन्हा चर्चा
17
अजित पवार गटाला हव्यात महायुतीतील ६५ ते ६८ जागा; अमित शाह यांच्याकडे आग्रही मागणी
18
मुलगी जर दिसायला चांगली असेल तर... अजित पवार समर्थक आमदार देवेंद्र भुयार यांचे सभेत वादग्रस्त विधान
19
स्वस्त पेट्राेल-डिझेल आता विसरा; युद्धाचे ढग; कच्च्या तेलाचे दर वाढले
20
मुंबईकर सरफराझ खानचे ऐतिहासिक नाबाद द्विशतक

अर्जुना येथे रास्ता रोको

By admin | Published: November 21, 2015 2:44 AM

वीज वितरण कंपनीच्या अनागोंदी कारभाराने आणि भारनियमनाने त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांनी शुक्रवारी सकाळी १० वाजता यवतमाळ-आर्णी मार्गावरील अर्जुना येथे रस्ता रोको

विजेचा प्रश्न : पालकमंत्र्यांच्या मध्यस्थीने आंदोलन मागेहिवरी : वीज वितरण कंपनीच्या अनागोंदी कारभाराने आणि भारनियमनाने त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांनी शुक्रवारी सकाळी १० वाजता यवतमाळ-आर्णी मार्गावरील अर्जुना येथे रस्ता रोको आंदोलन करून आपला संताप व्यक्त केला. पालकमंत्री संजय राठोड यांनी या आंदोलनात मध्यस्थी केल्याने आणि दोन दिवसात वीज पुरवठ्याचा प्रश्न निकाली काढण्याचे आश्वासन वीज वितरणच्या अधिकाऱ्यांनी दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले. या आंदोलनामुळे दीड तास वाहतूक विस्कळीत झाली होती.वाघाडी सबस्टेशन अंतर्गत मनदेव फिडरमधील कृषीपंप भारनियमनाचे वेळापत्रक बदलविण्यात आले. त्यामुळे अर्जुना, मनपूर, किन्ही, बोथबोडन, म्हसोला आदी गावात केवळ एक ते दीड तास वीज पुरवठा होत आहे. यामुळे शेतकरी संतप्त झाले. यासंदर्भात त्यांनी वीज वितरणला निवेदन देऊन रस्ता रोको करण्याचा इशारा दिला. मात्र वीज वितरणने याकडे दुर्लक्ष केले. शेवटी शुक्रवारी सकाळी परिसरातील शेकडो नागरिक अर्जुना येथे एकत्र आले आणि रस्त्यावर ठाण मांडून बसले. संतप्त नागरिक वीज वितरणच्याविरोधात घोषणा देत होते. दोनही बाजूची वाहतूक विस्कळीत झाली होती.पालकमंत्र्यांपुढे शेतकऱ्यांचे नेते अशोक पुरी यांनी पालकमंत्र्यांनी आमच्यासोबत आंदोलन करू नये, तुम्ही स्वत: सरकार आहात, शेतकऱ्यांना न्याय द्या, असे खडेबोल सुनावले. त्यामुळे वातावरण तापले होते. या आंदोलनाचे नेतृत्व पंचायत समितीचे माजी सभापती संतोष जाधव यांनी केले. यावेळी हिवरी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष विजय निवल, अनुप चव्हाण, वाटखेडचे सरपंच राहुल पारधी, अर्जुनाचे विलास सुरोशे, नितीन जाधव, रवी चव्हाण, जितेंद्र जयस्वाल, मंगेश कार, गजू पवार, रामजी राठोड, यशवंत मडावी, भैय्या श्रीवास, मनपूरचे विष्णू फुपरे, सुरेश शिरीकर यांच्यासह शेकडो शेतकरी सहभागी झाले होते. ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरीक्षक एस.एल. दोनकलवार, सहायक पोलीस निरीक्षक एस.आर. पंधरे, रवी जाधव यांनी बंदोबस्त ठेवला होता. (वार्ताहर)