शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

शाहीनबागच्या धर्तीवर यवतमाळात बेमुदत धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2020 06:00 IST

येथील छोटी गुजरी परिसरातील जुनी अंजुमन शाळा या ठिकाणी हे आंदोलन होणार आहे. १ फेब्रुवारीपासून हे आंदोलन बेमुदत काळासाठी सुरू करण्यात येत आहे. यात दुपारी १२ ते रात्री ८ वाजेपर्यंत महिला धरणे देणार आहेत. यादरम्यान महिलांना आमंत्रित करून विविध प्रकारचे उपक्रमही राबविले जाणार आहे. त्याअंतर्गत तज्ज्ञांचे मार्गदर्शन, विविध कलाकृती सादर केल्या जाणार आहे.

ठळक मुद्देआजपासून आंदोलन : शाहीनबाग आंदोलन कमिटीला विविध संघटनांचा पाठिंबा

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून सध्या देशभरात रणकंदन माजले आहे. दिल्लीत शाहीनबाग आंदोलन सुरू आहे. त्याच धर्तीवर यवतमाळातही बेमुदत धरणे आंदोलन केले जाणार आहे, अशी माहिती यवतमाळ शाहीनबाग आंदोलन कमिटीच्या वतीने शुक्रवारी पत्रकार परिषदेत देण्यात आली.येथील छोटी गुजरी परिसरातील जुनी अंजुमन शाळा या ठिकाणी हे आंदोलन होणार आहे. १ फेब्रुवारीपासून हे आंदोलन बेमुदत काळासाठी सुरू करण्यात येत आहे. यात दुपारी १२ ते रात्री ८ वाजेपर्यंत महिला धरणे देणार आहेत. यादरम्यान महिलांना आमंत्रित करून विविध प्रकारचे उपक्रमही राबविले जाणार आहे. त्याअंतर्गत तज्ज्ञांचे मार्गदर्शन, विविध कलाकृती सादर केल्या जाणार आहे. शिवाय सीएए, एनआरसी, एनपीआर आदींबाबत माहिती दिली जाणार आहे. दिल्ली येथील शाहीनबागच्या महिलांनी अत्यंत वेगळ्या पद्धतीने आंदोलनाला सुरूवात केली आहे. त्याला पाठिंबा देत देशभरात जिल्हा आणि तालुका पातळीवर जवळपास २०० ठिकाणी आंदोलन सुरू झाले आहे.यवतमाळ येथेही महिला शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणार आहे. सीएए कायदा रद्द व्हावा, एनआरसी, एनपीआर थांबवावे, जेएमयू, एएमयू, जेएनयू येथील विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याची चौकशी व्हावी, देशात निर्माण झालेली अराजकता केंद्र सरकारने लवकरात लवकर नियंत्रणात आणावी, नागरिकांच्या मनातील भीती दूर करावी आदी मागण्यांसाठी आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनात मुस्लीम, अनुसूचित जाती, जमातीच्या व इतर धर्मीय महिलांचादेखील सहभाग राहणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.शांततापूर्ण मार्गानेच आंदोलन करावेदरम्यान, दोन दिवसांपूर्वी यवतमाळात बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीने बंद पुकारण्यात आला होता. या आंदोलनावेळी शहरात आंदोलक आणि काही व्यापारी यांच्यात वाद झाला. आंदोलनात अशी घटना घडू नये, आम्ही अशा घटनांचा निषेध करतो. कार्यकर्त्यांनी शांततापूर्ण मार्गानेच आंदोलन केले पाहिजे. पण परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्याची पोलिसांचीही जबाबदारी होती, असे मत पत्रकार परिषदेत जमाते इस्लामी हिंदचे अध्यक्ष जियाउद्दीन यांनी व्यक्त केले. या पत्रकार परिषदेला जियाउद्दीन यांच्यासह मुफ्ती एजाज, अ‍ॅड. नासिर खिलजी, मौलवी शारीक मुजाहिदी, जमा खाँ, स्टुडंट इस्लामिक आॅर्गनायझेशनच्या सायमा रहमान आदी उपस्थित होते.

टॅग्स :Strikeसंप