शहरं
Join us  
Trending Stories
1
अरुण गवळीची मुलगी गीता गवळी ठाकरे गटाच्या संपर्कात; लवकरच मशाल हाती घेणार?
2
वैवाहीक बलात्कार गुन्हा नाही तर सामाजिक समस्या; सुप्रीम कोर्टात केंद्र सरकारची स्पष्टोक्ती
3
रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरला, ‘फादर ऑफ ऑल बॉम्ब’ चा वापर केल्याचा दावा! बघा धडकी भरवणारा VIDEO
4
Rohit Pawar Rohit Sharma, Viral VIDEO: रोहित पवार म्हणाले- "हमको और एक वर्ल्ड कप चाहिए", मग रोहित शर्माने काय केलं?
5
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना खूशखबर, ५ तारखेला खात्यात जमा होणार ४ हजार रुपये
6
"जरांगेंनी पाडापाडीचं राजकारण करण्यापेक्षा उमेदवारांना निवडून आणावं’’,संभाजीराजेंचा सल्ला
7
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ठाणे दौरा, शहरातील वाहतुकीमध्ये बदल
8
"आधी स्वतःची परिस्थिती पाहा..." धार्मिक स्वातंत्र्याबाबत अमेरिकेच्या टीकेवर भारताचा पलटवार
9
इराणमध्ये विषारी दारू प्यायल्यानं २६ जणांचा मृत्यू, १०० हून अधिक जण रुग्णालयात दाखल
10
"त्याचा लहान भाऊ म्हणून...", छोटा पुढारीने सूरज चव्हाणबाबतीत दिला मोठा शब्द
11
महाराष्ट्रातील क्रीडारत्नांचा सन्मान! अविनाश साबळेला शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार, प्रदीप गंधेंना 'जीवन गौरव'
12
इस्रायलचे गाझावर भीषण हवाई हल्ले; हमास प्रमुख रावी मुश्ताहा याच्यासह तीन टॉप कमांडर ठार
13
त्वेशा जैनने पटकावली दोन रौप्यपदकं! राज्य बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत केली चमकदार कामगिरी
14
"राहुल गांधींनी काँग्रेसमध्येही ड्रग्सचा धंदा सुरू केलाय का?"; अनुराग ठाकूर यांचा खोचक सवाल
15
Rohit Sharma लिलावात आल्यास RCB ने संधी सोडू नये; दिग्गजाचं मोठं विधान, हिटमॅनलाही सल्ला
16
Gunratna Sadavarte : गुणरत्न सदावर्ते विधानसभेच्या रिंगणात, आदित्य ठाकरेंविरोधात निवडणूक लढणार!
17
“अक्षय शिंदेच्या बेड्या का काढल्या, फॉरेन्सिक रिपोर्टचे काय?”; हायकोर्टाचे प्रश्नांवर प्रश्न
18
Womens T20 World Cup 2024 : ती एकटी पडली; बांगलादेश संघाची विजयी सलामी!
19
“...तर ती देवेंद्र फडणवीसांच्या कारकिर्दीतील मोठी चूक असेल”; मनोज जरांगेंचा पुन्हा इशारा
20
Womens T20 World Cup: 'ब्लॅक बेल्ट' आहे हिजाब घालून मैदानात उतरलेली ही महिला क्रिकेटर

पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखाने विदर्भातील उसावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2019 12:21 PM

विदर्भात उसाचे वाढलेले क्षेत्र पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखान्यांसाठी मोठा दिलासा देणारे आहे. तथापि आवश्यक तेवढा ऊस या भागातून जाणार नसल्याने कारखान्यांसाठी धोक्याची घंटा आहे.

ठळक मुद्देटंचाईची चिन्हे लागवड घटल्याने उद्योग संकटात

रूपेश उत्तरवार ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : पश्चिम महाराष्ट्रात उसाचे लागवड क्षेत्र ९० टक्केपर्यंत खाली आले आहे. याचा परिणाम या भागातील साखर कारखान्यावर होत आहे. मात्र विदर्भात उसाचे वाढलेले क्षेत्र पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखान्यांसाठी मोठा दिलासा देणारे आहे. तथापि आवश्यक तेवढा ऊस या भागातून जाणार नसल्याने कारखान्यांसाठी धोक्याची घंटा आहे.एकेकाळी विदर्भातील साखर कारखाने पश्चिम महाराष्ट्रातील उसाच्या भरवशावर चालत होते. आता विरोधाभासी चित्र आहे. आता कारखान्यांची गर्दी असलेल्या भागानेच ऊसाच्या लागवडीकडे पाठ फिरविली आहे. मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील ऊसाचे आज क्षेत्र ९० टक्के घटले आहे. विदर्भातील उसही पश्चिम महाराष्ट्रातील कारखान्यांची आवश्यक तेवढी गरज भागवू शकणार नाही. या कारणांमुळे ६० टक्के कारखाने बंद पडण्याचा धोका आहे.विदर्भातील ऊस लागवडीने आज औरंगाबाद विभागालाही मागे टाकले आहे. विदर्भात सहा हजार ३२७ हेक्टर क्षेत्रावर उसाची लागवड झाली आहे. औरंगाबाद विभागात ६९ हजार हेक्टर क्षेत्रात ऊस लागवडीचे नियोजन होते. प्रत्यक्षात सहा हजार हेक्टरातच लागवड थांबली. नियोजनाच्या केवळ १० टक्के क्षेत्रातच ही लागवड झाली आहे.कोल्हापूर विभागात दोन लाख ७२ हजार हेक्टर क्षेत्रावर ऊस लागवडीचे नियोजन करण्यात आले होते. प्रत्यक्षात लागवड क्षेत्र ३१ हजार हेक्टर आहे. यातही पूर परिस्थितीने ८० टक्के क्षेत्र बाधित झाले आहे. यामुळे कोल्हापुरातून कारखान्यांना ऊस मिळणार नाही. पुणे विभागात तीन लाख ७३ हजार हेक्टर क्षेत्रावर ऊसाची लागवड होते. आज प्रत्यक्षात ३५ हजार हेक्टर क्षेत्रात ऊस लावला गेला. नाशिक विभागात २५ हजार हेक्टर, तर कोकणात २८५ हेक्टरवर उसाचे पीक घेण्यात आले आहे.संपूर्ण राज्यात नऊ लाख चार हजार हेक्टरवर ऊसाची लागवड होते. यावर्षी एक लाख चार हजार हेक्टर क्षेत्रातच ऊस उभा आहे. हे क्षेत्र निर्धारित क्षेत्रापेक्षा ९० टक्क्यांने कमी आहे. दहा टक्के उसावर कारखाने चालविण्याची कसरत करावी लागणार आहे.यवतमाळ जिल्ह्यात सर्वाधिक क्षेत्रयवतमाळ जिल्ह्यात चार हजार २४२ हेक्टरवर उसाची लागवड झाली आहे. नागपुरात १५४४ हेक्टर क्षेत्रात ऊस लावण्यात आला. बुलडाणा, अकोला, वाशिम, भंडारा, गोंदिया, गडचिरोलीतही ऊस उत्पादकांची संख्या वाढली आहे.धान पट्ट्यातही ऊसउसाला अधिक पाण्याची गरज आहे. यामुळे शेतकऱ्यांनी धान उत्पादक पट्ट्यातही ऊस लागवडीचा प्रयोग करण्यास प्रारंभ केला आहे. याचे मोठे बदल पाहायला मिळत आहे. मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात मात्र पाणी टंचाईने उसाची लागवड घटली आहे.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखाने