शहरं
Join us  
Trending Stories
1
मच्छिमार महामंडळासाठी ५० कोटी मंजूर, राज्य सरकारचे मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय, वाचा...
2
"माझ्या करिअरचं फार वाटोळ केलं", पंकजा मुंडेंनी हात जोडून हसतच दिलं उत्तर
3
महायुती सरकारच्या काळात विधिमंडळ समित्याच नाहीत, 'मविआ'ने नेमल्या पण...; अहवालातून माहिती उघड
4
राजकीय पक्षांच्या मेळाव्याला पळण्यापेक्षा आपल्या हिताच्या मेळाव्यात या: मनोज जरांगे
5
INDW vs NZW : सलामीच्या सामन्यापूर्वी Team India ला सरप्राईज; स्मृती मानधनाच्या डोळ्यात पाणी
6
"हे खूपच गंभीर आणि लज्जास्पद", अमित शाह ड्रग्ज प्रकरणावरून काँग्रेसवर का भडकले?
7
काश्मिरात मोठा खेला? रिझल्टपूर्वीच NC-BJP सोबत येण्याची चर्चा; फारूक अब्दुल्ला कुणाला भेटले?
8
Ashish Shelar : "मुंबईच्या पाणी तुटवड्याला आदित्य ठाकरे जबाबदार"; आशिष शेलारांचा गंभीर आरोप
9
“जरांगेंच्या प्रकृतीची काळजी, आमचे सरकार आल्यास ५० टक्क्यांवर आरक्षण देऊ”: संजय राऊत
10
"जोरात झटका लागला, व्हिडिओ काढले...", गोळी कशी लागली?; गोविंदाने सांगितला संपूर्ण घटनाक्रम
11
टाटांनी 'या' कंपनीतून कमावला २३,०००% नफा; आता कमी केला हिस्सा, कोणती आहे कंपनी?
12
गजबच झालं! ठगांनी थेट खोटी बँकच सुरू केली, लाखो रुपये घेऊन लोकांना नोकरीही दिली, मग...
13
आदिवासी आमदारांचा आक्रमक पवित्रा; मंत्रालयातील संरक्षण जाळीवर उतरून आंदोलन, नेमकं काय घडलं?
14
VINTAGE भज्जी! हरभजनने लगावला अफलातून सिक्सर; जाग्या झाल्या जुन्या आठवणी
15
टाटा, अदानी, महिंद्रा अन्... इस्रायल-इराण युद्धामुळे 'या' 10 भारतीय कंपन्यांचे मोठे नुकसान
16
"लोकांनी सिनेमा बघायला यावं म्हणून गौतमी पाटीलला...", अमेय वाघचा मोठा खुलासा, म्हणाला- "तिच्या शोला..."
17
तिरुपती लाडू वाद: “कोट्यवधी भाविकांच्या आस्थेचा विषय, स्वतंत्र SIT तपास करणार”; SCचे निर्देश
18
“राज्यात बहि‍णींना सुरक्षेची गरज, वाढत्या महिला अत्याचाराला सरकारच जबाबदार”: नाना पटोले
19
Gold Silver Price Today : दिवाळीपूर्वी सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, खरेदीपूर्वी पाहा काय आहे नवे दर?
20
न्यूक्लिअर अ‍ॅटॅक करू...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान किम जोंगने कुणाला दिली धमकी? 10000KM दूरपर्यंत धाक-धूक वाढली!

कृष्णेच्या तीरी साखर विरघळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2019 1:06 PM

राज्यात साखरेसोबत गुळाचा तुटवडा निर्माण झाला आहे. परिणामी साखर व गुळाचे दर कडाडले आहेत.

ठळक मुद्देराज्यभरात साखरेचे दर कडाडले सण उत्सवाच्या तोंडावर महागाईचे संकट

रूपेश उत्तरवार।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कृष्णा, कोयना, पंचगंगा नदीला आलेल्या पुराने कोल्हापूर, सांगली आणि कराडला मोठा फटका बसला. या ठिकाणावरून राज्यभरात साखर आणि गुळ पोहचविला जातो. परंतु, पुरामुळे मोठ्या प्रमाणात साखर आणि गुळाचे पाणी झाले. यातून राज्यात साखरेसोबत गुळाचा तुटवडा निर्माण झाला आहे. परिणामी साखर व गुळाचे दर कडाडले आहेत.गतवर्षी साखरेचे विक्रमी उत्पादन झाले. यामुळे साखरेची निर्यात करण्यासाठी मोठ्या प्रमाणात हालचाली झाल्या. यानंतरही पुरेशा प्रमाणात निर्यात झाली नाही. अखेरीस साखरेचा कोटा राज्यातील कारखान्यामध्ये मोठ्या प्रमाणात कायम राहिला. साखर कारखान्यातील साखर ठोक विक्रेत्यांकडे जाते. त्यातून चिल्लर विक्रेते साखरेची खरेदी करतात. त्यानंतर ती इतर दुकानामध्ये पोहचते. साखर मुबलक प्रमाणात असल्याने वर्षभरापासून साखरेचे दर स्थिर होते.आणखी वर्षभर ही स्थिती कायम राहणार असल्याची शक्यता होती. मात्र कृष्णा, कोयना, पंचगंगा नदीला आलेल्या पुराने साखर आणि गुळ साठ्याचे संपूर्ण गणितच बिघडविले आहे. कोल्हापूर, सांगली आणि कराडमधील साखर आणि गुळाच्या ठोक विक्रेत्यांचे मोठे नुकसान झाले. पुराचे पाणी गोदामामध्ये शिरले. साखर आणि गुळाचे पाणी झाले. हे नुकसान इतक्या मोठ्या प्रमाणात आहे की, त्यातून तुटवड्याची स्थिती निर्माण झाली आहे.यामुळे राज्यभरात साखरेच्या किमती वाढल्या आहेत. पूर्वी ३३ ते ३४ रूपये किलो असलेली साखर ३६ रूपयांवर पोहोचली आहे. तर गुळाचे दर ३६ ते ३८ रूपये किलोवरून ४२ ते ४३ रूपये किलोवर पोहचले आहेत. पुढे हे दर आणखी वाढतील, असा अंदाज व्यापारी वर्तवित आहे. यामुळे व्यापाऱ्यांकडून साखरेचा आणि गुळाचा मोठ्या प्रमाणात उठाव वाढला आहे. गत १५ दिवसांपासून राज्यात होणारा साखरेचा पुरवठाही थांबला आहे. यातून साखरेचा आणि गुळाचा गोडवा सण उत्सवात कडू होण्याचा धोका आहे.

ऐन सण उत्सवातच झळसण उत्सवाला सुरूवात होतानाच साखर आणि गुळाचे मोठे संकट उभे झाले आहे. यामुळे येणाºया काळात पोळा, गणपती, गौरीपूजन, दसरा आणि दिवाळीच्या सणात नागरिकांना महागाईचा सामना करावा लागणार आहे. यातून सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार आहे.

ऊसाचे केवळ १० टक्के क्षेत्रयावर्षी मराठवाड्यात पाऊस पडलाच नाही. यामुळे या पट्ट्यातील ऊसाची लागवड मोठ्या प्रमाणात घटली आहे. सध्या १० टक्के क्षेत्रातच ही लागवड नोंदविली गेली आहे. ९० टक्के क्षेत्र इतर पिकाच्या लागवडीखाली आले आहे. यामुळे येणाºया काळात उत्पादनावर परिणाम होणार आहे.पूरपरिस्थितीमुळे साखरेचा कोटा घटला. परंतु यावर्षी ऊसाची लागवड न झाल्याने पुढच्या वर्षी आणखी गंभीर स्थिती निर्माण होण्याची व दर वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.- दत्तात्रय गायकवाड, उपायुक्त (साखर), पुणेपुरामुळे साखर उत्पादक जिल्ह्यात ४० टक्के साखरेचे नुकसान झाले आहे. यावेळी १९ लाख क्विंटल साखर पाठविण्यात आली. यामध्ये दोन लाख क्विंटलची तफावत आहे. यामुळे दीड वर्षांपासून स्थिर असलेली साखर क्विंटलमागे २०० रुपयांनी वाढली आहे.- रोहित सिंघानिया, साखरेचे ठोक विक्रेता, यवतमाळ

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखाने