शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
2
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
3
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
4
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
5
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
6
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
7
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
8
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
9
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
10
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
11
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
12
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
13
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
14
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
15
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
16
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
17
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
18
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
19
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
20
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!

रणरणत्या उन्हात फिरणाऱ्या कार्यकर्त्यांना सनस्ट्रोकचा धोका?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2019 22:04 IST

राजकारण तापले आहे. पण त्याहीपेक्षा सूर्य जास्त तापला आहे. भरउन्हात गावोगावी प्रचाराला फिरणाऱ्या राजकीय कार्यकर्त्यांवर सूर्य कोपला आहे. त्यामुळे पक्षश्रेष्ठींची आणि उमेदवारांची काळजी घेताना कार्यकर्त्यांनी स्वत:चीही काळजी घेण्याची गरज आहे.

ठळक मुद्देराजकारण तापले अन् सूर्याचा पाराही भडकलाय : डॉक्टर म्हणतात, निवडणुकीतील विजयापेक्षा जीव वाचणे महत्त्वाचे, पाणी भरपूर प्या, दारू-कोल्ड्रींक टाळा

अविनाश साबापुरे ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : राजकारण तापले आहे. पण त्याहीपेक्षा सूर्य जास्त तापला आहे. भरउन्हात गावोगावी प्रचाराला फिरणाऱ्या राजकीय कार्यकर्त्यांवर सूर्य कोपला आहे. त्यामुळे पक्षश्रेष्ठींची आणि उमेदवारांची काळजी घेताना कार्यकर्त्यांनी स्वत:चीही काळजी घेण्याची गरज आहे. अन्यथा सूर्याचा कोप होऊन तुम्हाला उष्माघाताचा (सनस्ट्रोक) दणका मिळण्याची शक्यता आहे.यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघाचे मतदान पहिल्याच टप्प्यात ११ एप्रिलला असल्याने प्रचाराला अत्यंत कमी दिवस मिळाले आहे. त्यामुळे उन्हाची पर्वा न करता कार्यकर्ते गावोगावी प्रचाराला फिरत आहेत. पण कोणताही विजय जीवापेक्षा मोठा नसतो.दिवसभर उन्हात फिरूनही तग धरायची असेल, तर कार्यकर्त्यांनी भरपूर पाणी प्यावे, असा सल्ला यवतमाळातील डॉक्टरांनी दिला आहे. शिवाय, शरीरातील ग्लूकोज टिकवायचे असेल तर दारू आणि कोल्ड्रींक टाळण्याची गरज आहे. एसी गाडीतून फिरतानाही जीव जपण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.दुपारी १२ ते ५ या वेळात घराबाहेर पडू नकासध्या तापमान प्रचंड आहे. अशावेळी कार्यकर्त्यांनी प्रचाराला बाहेर पडताना खूप काळजी घेतली पाहिजे. ज्यांना बीपी, हार्टअटॅक, डायबिटीज या तक्रारी आहेत, त्यांनी तर दुपारी १२ ते सायंकाळी ५ या वेळात घराबाहेर पडूच नये. पण प्रचाराला कमी दिवस असल्याने राजकीय कार्यकर्ते ऐकणार नाही. त्यामुळे त्यांनी किमान तब्येतीची काळजी घेऊनच फिरावे. सोबत भरपूर पाणी ठेवावे. तहान लागो वा न लागो, दर तासाला अर्धी बॉटल पाणी पित राहावे.- डॉ. विजय ठाकरे, यवतमाळपुढच्या आठवड्यातही उष्णतेची लाटसध्याची शहरे हिट लॅण्ड झाली आहेत. अवकाशातून शहरांचे अवलोकन केले तर संपूर्ण शहर लालबुंद दिसते. यालाच हिट लॅण्ड म्हटले जाते. पुढील आठवडाभर उष्णतेची लाट कायम राहणार आहे. त्यामुळे प्रचाराला फिरणाऱ्या कार्यकर्त्यांनी काळजी घ्यावी. राजकीय प्रचार करताना स्वत:च्या जीवाची काळजी कार्यकर्त्यांनी घेतली पाहिजे. मात्र पर्यावरणाबाबत कुठल्याही राजकीय पक्षांना सवड नाही. खरे तर पर्यावरणासाठी गांभीर्याने काम करण्याची गरज आहे.- सुरेश चोपणे, हवामान अभ्यासकहे करालतर वाचाल?1. उन्हात प्रचाराला फिरणाऱ्यांना सनस्ट्रोक होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे काळजी घेण्याची गरज आहे.2. पहाटे प्रचाराला सुरुवात करा. दुपारी १२ पर्यंत सावलीत परत या. हवे तर दुपारी ४ नंतर रात्री उशिरापर्यंत फिरा.3. कोल्ड्रींक, दारू टाळा. माठातील पाण्याच्या बॉटल सोबत ठेवा. बॉटलमध्ये एक चमचा मीठ टाकून पित राहा.4. ताक, लिंबू व मीठ टाकलेले पाणी, नारळपाणी घेतल्यास उष्माघात टळू शकेल.

टॅग्स :TemperatureतापमानLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक