शहरं
Join us  
Trending Stories
1
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
2
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
3
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
4
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?
5
मोठी बातमी! पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये तिसरी चकमक; एक जवान शहीद  
6
ED: सहारा प्रकरणात ईडीची मोठी कारवाई, १५०० कोटींपेक्षा अधिकची नवी संपत्ती जप्त; प्रकरण काय?
7
पाकिस्तान रात्रभर दहशतीत! भारत कोणत्याही क्षणी घुसू शकतो; १८ लढाऊ विमाने एलओसीवर...
8
सचिन तेंडुलकर झाला ५२ वर्षांचा! मास्टर ब्लास्टरचे 'हे' ५ रेकॉर्ड तोडणे जवळपास अशक्य
9
Pahalgam Terror Attack : बांदीपोरामध्ये लष्कर-ए-तोयबाच्या ४ दहशतवाद्यांना अटक, पूंछ-अनंतनाग आणि उधमपूरमध्ये चकमक सुरू
10
४८ तासांत पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश; सीमा हैदरचं आता काय होणार?
11
Success Story: 'आपली आजी', वय वर्ष ७४, यू-ट्युबद्वारे महिन्याला ६ लाखांची कमाई; मराठमोळ्या आजींचा कसा आहे प्रवास?
12
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
13
पहलगाम व्हॅलीचे नाव 'हिंदू व्हॅली' करा! मराठी अभिनेत्याचा सरकारला सल्ला, म्हणाला- "श्रीनगरला भारताची उपराजधानी घोषित करा"
14
FIITJEE चे मालक डीके गोयल यांच्याविरोधात ईडीची कारवाई, १० ठिकाणांवर छापेमारी
15
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
16
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
17
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
18
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानच्या तोंडचं पाणी पळालं; उपपंतप्रधान तावातावाने म्हणाले...
19
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
20
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई

तहसीलदारांच्या कारने दुचाकीला चिरडले, दोघांचा मृत्यू

By सुरेंद्र राऊत | Updated: May 5, 2024 15:52 IST

रात्री दीड वाजताची घटना : बोरी-दारव्हा मार्गावर झाला अपघात

यवतमाळ :  दारव्हा तालुक्यातील दोन तरुण दुचाकीने बोरी येथून मोबाईल टॉवर दुरूस्तीचे काम आटोपून गावी परत जात असताना तहसीलदारांच्या भरधाव कारने त्यांच्या दुचाकीला चिरडले. यात दोघांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना रविवारी रात्री दीड वाजता घडली. एकाचवेळी दाेन तरुणांचा अपघाती मृत्यू झाल्याने संपूर्ण तालुक्यात शोककळा पसरली आहे.

अंकुश देवराव भजणे (२५, रा. रामगाव रामेश्वर), श्रीकांत प्रमोद ठाकरे (२४, रा. तोरनाळा) असे मृतांची नावे आहेत. हे दोघेही मोबाईल टॉवरच्या देखभाल दुरूस्तीचे काम करत होते. शनिवारी बोरी येथे आले होते. त्यांचे काम पूर्ण झाल्यानंतर दोघेही दुचाकी क्रमांक (एमएच २९, एबी ३७०८)ने जात असताना यवतमाळकडून दारव्हा जाणाऱ्या कार क्रमांक (एमएच २९, बीव्ही ४१३७)ने दुचाकीला मागून जोरदार धडक दिली. 

भरधाव कारने दुचाकीला काही फुटांपर्यंत फरफटत नेले. यात अंकुश देवराव भजणे याचा जागीच मृत्यू झाला तर श्रीकांत ठाकरे हा अत्यवस्थ हाेता. त्याला तातडीने दारव्हा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला. या भीषण अपघाताची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी पंकज अतुलकर, दारव्हा ठाणेदार विलास कुलकर्णी यांनी घटनास्थळाला भेट दिली. 

अपघाताला कारणीभूत असलेली कार ही तहसीलदार परसराम भोसले यांच्या मालकीचे असल्याचे प्राथमिक पोलिस तपासातून पुढे आले आहे. कार कोण चालवत होते? याचा शोध घेतला जात आहे. तूर्त या प्रकरणी पोलिसांनी कारच्या अज्ञात चालकाविरोधात अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक धनंजय रत्नपारखी करत आहेत.

टॅग्स :Accidentअपघात