शहरं
Join us  
Trending Stories
1
चेंबुरमध्ये पहाटे अग्नितांडव; चाळीत लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
2
"त्यांना लाज वाटली पाहिजे", पंतप्रधान नेतन्याहू फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांवर भडकले
3
पाकिस्तानमध्ये मोठं काय घडणार? अमेरिकेने नागरिकांसाठी ॲडव्हायजरी जारी केली
4
काहीही करा, आरक्षणाच्या मर्यादेची भिंत तोडणारच! जात जनगणनाही करायला भाग पाडू: राहुल गांधी
5
अल्लू अर्जुन नाही बॉलिवूडचा हा सुपरस्टार बनला असता 'पुष्पा', जाणून घ्या का नाकारला सिनेमा
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सामाजिक क्षेत्रात मान - सन्मान; दुपार नंतर मात्र संयमित राहावे
7
लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यातून काढता येईना; किरीट सोमय्या महिलांसह पोहोचले पोलीस ठाण्यात
8
जुन्नर विधानसभेतही शरद पवार धक्का देणार! नवं कार्ड बाहेर काढणार?; बेनकेंविरोधात 'हा' उमेदवार मैदानात उतरवणार
9
नवरात्रात विनायकी चतुर्थी: ६ राशींना लाभ, सुख-समृद्धी-सौभाग्य; पाहा, साप्ताहिक राशीभविष्य
10
हरयाणात भाजपाला पराभूत करत काँग्रेसची सत्ता, तर जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेस-नॅकॉ युतीला कौल
11
मविआकडून केवळ दिशाभूल, विकासकामे रोखणाऱ्या शत्रूला निवडणुकीत रोखा: PM नरेंद्र मोदी
12
मराठी भाषेने स्वराज्यासह संस्कृतीची चेतना जागविली; पंतप्रधान मोदी यांचे कौतुकोद्गार
13
PM मोदी यांच्या हस्ते मेट्रो ३ मार्गिकेचे उद्घाटन; प्रवासात शाळकरी मुले, महिलांशी संवाद
14
दुर्गादेवी विरोधकांचा राजकीय संहार करेल; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मविआवर टीका
15
पंतप्रधानांचा ठाणे दौरा: तीन हजार अवजड वाहने रोखल्याने नाशिक-मुंबई प्रवास झाला सुसाट!
16
हरयाणामध्ये मतदारांनी कोणाला दिला सत्तेचा कौल? ६१ टक्क्यांपेक्षा जास्त मतदानाची नोंद
17
‘वैद्यकीय शिक्षण’मध्ये कंत्राटी भरती करणार; आपलाच निर्णय सरकारकडून धाब्यावर
18
सरळसेवेची ‘ती’ पदे ‘मानधना’वर भरणार; सुट्टीच्या दिवशी राज्य सरकारचा जीआर
19
नायगाव बीडीडी आता ‘डॉ. आंबेडकर संकुल’; महायुती सरकारचा मोठा निर्णय
20
भोजनातून शासकीय वस्तीगृहातील ४० मुलींना विषबाधा; वैद्यकीय महाविद्यालयात उपचार

सांगा, पाणीटंचाईवर काय उपाययोजना केल्या?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 05, 2018 9:28 PM

शहरात भीषण पाणीटंचाई आलेली असताना जिल्हाभरात पाण्याचे दुर्भिक्ष्य आहे. यवतमाळवर ‘फोकस’ ठेवताना जिल्ह्याच्या टंचाईवर जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांची नजर आहे.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांना हवे उत्तर : जिल्ह्यातील सर्व नगरपरिषदा, नगरपंचायतींचा आज आढावा

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शहरात भीषण पाणीटंचाई आलेली असताना जिल्हाभरात पाण्याचे दुर्भिक्ष्य आहे. यवतमाळवर ‘फोकस’ ठेवताना जिल्ह्याच्या टंचाईवर जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांची नजर आहे. म्हणूनच शुक्रवारी सोळाही नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या मुख्याधिकाºयांनी पाणीटंचाईवर नेमकी काय पावले उचलली, याचा आढावा घेतला जाणार आहे.गेल्या आर्थिक वर्षात नगरपरिषदांनी पूर्ण केलेल्या कामांबाबत जिल्हाधिकाºयांनी शुक्रवारी सकाळी ११ वाजता बैठक बोलावली आहे. इतर कामांसोबतच पाणीटंचाईचा प्रश्न बैठकीच्या केंद्रस्थानी राहणार असल्याने सर्व मुख्याधिकाऱ्यांनी स्वत:च उपस्थित राहिले पाहिजे, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी दिले आहेत. यवतमाळप्रमाणेच बहुतांश नगरपरिषदांमधील पाणीपुरवठ्याची भिस्त शहरालगतच्या धरणांवर आहे. पांढरकवड्याची तहान सायखेडा धरणावर, घाटंजीचा पाणीपुरवठा आता येळाबारा धरणावर भागवायचा का, अशा हालचाली सुरू आहेत. परंतु, नेमके उपाय काय करता येतील, याबाबत बैठकीत खल होणार आहे.शिवाय, नुकतेच आर्थिक वर्ष संपले आहे. गेल्या वर्षात कोणती कामे झाले, त्यावरील निधीचा विनियोग मुख्याधिकाऱ्यांनी कसा केला, याबाबतचाही आढावा जिल्हाधिकारी घेणार आहेत. त्यासाठी २०१३-१४ ते २०१६-१७ या वर्षांत नगरपरिषदांनी ज्या-ज्या कामांसाठी प्रशासकीय मान्यता घेतली होती, त्या कामांची संपूर्ण माहिती मागविण्यात आली आहे.यवतमाळ शहरातील भीषण पाणीटंचाईवर जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख नजर ठेऊन आहेत. शहरात टंचाईच्या काळात नागरिकांना पाणी उपलब्ध करून देण्यासाठी झालेल्या उपाययोजना आणि आगामी काळात होणाऱ्या उपाययोजनांबाबत या बैठकीत ते माहिती घेणार आहेत. शहरात टंचाईच्या काळात नागरिकांना दिलासा मिळावा, यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्न करीत असून बैठकीत त्यावर खल होणार आहे. ही बैठक शहराच्या दृष्टीने महत्त्वाची आहे.यवतमाळ शहरातील टंचाई उपाययोजनेबाबत उत्सुकतासर्व मुख्याधिकाऱ्यांकडून पाणीटंचाईचा आढावा घेताना यवतमाळच्या प्रश्नावर प्रचंड खल होण्याची शक्यता आहे. नैसर्गिक संकट, त्यात नगरपरिषदेतील दोन पक्षांचा संघर्ष यात टंचाईनिवारणाच्या कामांचा आढावा सादर करताना मुख्याधिकाऱ्यांचा कस लागणार आहे. शिवाय, ३१ मार्चअखेर मालमत्ता आणि पाणीपट्टीची वसुली किती झाली, हेही सांगावे लागणार आहे. यवतमाळात मालमत्ता करावरून वादंग माजलेले आहे. अन् पाणीच नाही तर पाणीपट्टी वसुली किती झाली असावी, हाही प्रश्न आहे. एकंदरीत शहरातील पाणी प्रश्न गुंतागुंतीचा होत आहे.

टॅग्स :Waterपाणी