शहरं
Join us  
Trending Stories
1
"श्रीलंकेतून ३७ तमिळ मच्छिमारांची सुटका करावी", राहुल गांधींचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना पत्र
2
"जर मी 3-4 महिने आधी सुटलो असतो तर...", अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
3
अटल सेतूवरील यंत्रणा ITMS प्रणालीसाठी अकार्यक्षम; परिवहन विभागाच्या चाचणीत निष्पन्न
4
जय शाह यांचा ऐतिहासिक निर्णय! IPL खेळणाऱ्यांवर पैशांचा पाऊस; १ फ्रँचायझी १२.६० कोटी देणार
5
अरविंद केजरीवाल कधी मुख्यमंत्री निवासस्थान सोडणार? AAP कडून आली मोठी अपडेट
6
उल्हासनगरमधून शिंदेसेनेच्या राजेंद्र चौधरी यांनी थोपटले दंड; 'मराठी चेहरा' मतदारांना भावणार?
7
“लाडकी बहीण योजनेला स्वार्थी म्हणणे महिलांचा अपमान”; राज ठाकरेंना अजित पवार गटाचे उत्तर
8
"अपने साथी शहीदों में शामिल...", हिजबुल्लाहकडून नसरल्लाहच्या खात्म्याची पुष्टी; घेतली मोठी शपथ!
9
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
10
कृषी पुरस्कारांचे उद्या राज्यपालांच्या हस्ते वितरण होणार, धनंजय मुंडेंची माहिती
11
"महालक्ष्मी ब्लॅकमेल करत होती, म्हणून ५९ तुकडे..."; बंगळुरू हत्येतील आरोपीच्या भावाचा मोठा दावा
12
“ठाकरे गटाला महाविकास आघाडीत फक्त ४४ जागा मिळतील”; प्रकाश आंबेडकरांचा मोठा दावा
13
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
14
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
15
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!
16
उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री व्हावे म्हणून १०१ पुजाऱ्यांच्या हस्ते महायज्ञ
17
“लाडकी बहीण नाही, लाडकी खुर्ची योजना, तिघे भाऊ लबाड आहेत”; ठाकरे गटाची खोचक टीका
18
Narendra Modi : "हा नवा भारत, घरात घुसून मारतो, आजच्याच रात्री सर्जिकल स्ट्राईक..."; मोदींचा काँग्रेसवर घणाघात
19
“...तर शरद पवारांच्या इशाऱ्यावर मनोज जरांगे मराठा आंदोलन करत होते स्पष्ट”: प्रकाश आंबेडकर
20
देशातील टॉप १० श्रीमंत देवस्थानांच्या यादीत राम मंदिर; किती कोटींचे दान मिळाले? आकडा पाहाच

निसर्गाच्या लहरीपणाने कृषी अर्थव्यवस्था संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 01, 2022 8:00 AM

Yawatmal News दरवर्षी निसर्गाचा प्रकोप वाढत आहे. यावर मात करणारी हवामान विभागाची यंत्रणा यावर्षी सपशेल अपयशी ठरल्याची बाब पुढे आली आहे.

ठळक मुद्देपावसाळा एक महिने पुढे सरकला ७० टक्के पेरण्या अजूनही खोळंबल्या

रुपेश उत्तरवार

यवतमाळ : निसर्गाच्या लहरीपणाने संपूर्ण कृषी अर्थव्यवस्था धोक्यात आली आहे. महिना लोटला तरी जिल्ह्यातील अनेक भागात पाऊस बरसला नाही. ज्या भागात पाऊस बरसला त्या ठिकाणी अपुरा पाऊस होता. अशा ठिकाणी दुबार पेरणीचे मोठे संकट उभे ठाकले आहे. किमान २५ टक्के क्षेत्र यामुळे धोक्यात आले आहे. दरवर्षी निसर्गाचा प्रकोप वाढत आहे. यावर मात करणारी हवामान विभागाची यंत्रणा यावर्षी सपशेल अपयशी ठरल्याची बाब पुढे आली आहे. वारंवार वर्तविले जाणारे पावसाचे अंदाज सायंकाळपर्यंत विरले आहेत. यामुळे शेतकऱ्यांनाच आर्थिक फटका बसला आहे.

गतवर्षी हवामान विभागाचा अंदाज अक्षरश: खरा ठरला, अशी स्थिती होती. एका खासगी अभ्यासकांनी वारंवार भाकीत केले. त्यांना शेतकऱ्यांनी अक्षरश: डोक्यावर घेतले. याबाबत या खासगी अभ्यासकांनी काही ठोकताळे जाहीर कार्यक्रमात सांगितले. यामुळे शेतकऱ्यांचा पक्का विश्वास झाला आहे. याच अंदाजावर यावर्षी शेतकऱ्यांनी भरवसा ठेवला. शेत शिवारात पेरणी केली. प्रत्यक्षात भाकिताप्रमाणे पाऊस पडला नाही. वेधशाळेने वर्तविलेला अंदाजही दरवर्षीप्रमाणे फोल ठरला. जून महिन्यात १०० टक्के पाऊस पडेल, असा अंदाज होता. प्रत्यक्षात ५९ टक्केच पाऊस जिल्ह्यात कोसळला. हा पाऊस पेरणीकरिता पोषक नसल्याने या शेतशिवारात दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहेत.

एकूण सिंचन क्षमतेच्या १९ टक्के सिंचन

मोठ्या आणि मध्यम प्रकल्पाच्या एकूण सिंचन क्षमतेच्या १९ टक्के क्षेत्रातच प्रत्यक्षात ओलीत होत आहे. दोन लाख हेक्टर क्षमता असताना केवळ ४० हजार हेक्टर क्षेत्रावर प्रकल्पाच्या माध्यमातून सिंचन होत असल्याची संपूर्ण स्थिती आहे. यासाठी अपुरे कॅनल कारणीभूत ठरले आहे. तर अनेक ठिकाणी कॅनॉलची डागडुजी रखडली आहे.

वाढत्या महागाईपुढे पीक कर्ज अपुरे

मजुरीचे दर १०० रुपयांवरून २५० रुपयांवर पोहोचले आहेत. खताच्या किमती १२०० रुपये पोत्यावरून १५०० रुपयांवर पोहोचल्या आहेत. सोयाबीन बियाण्यांचे दर ३२०० रुपयांवरून ४००० रुपयांवर पोहचले आहेत. फवारण्याच्या औषधाच्या किमती प्रचंड वाढल्या आहेत. महागाई प्रचंड वाढत आहे. याचवेळी मिळणारे पीक कर्ज मात्र अपुरे राहिलेे आहेत. यातून शेतकऱ्यांवर सावकाराकडे हात पसरण्याची वेळ आली आहे.

टॅग्स :agricultureशेती