शहरं
Join us  
Trending Stories
1
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
2
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर
3
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२४; नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल
4
आघाडी अन् युती कोणाच्या पथ्यावर? काँग्रेस ८२ पार गेली नाही; वेगळे लढल्यावर भाजपला यश
5
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
6
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
7
एनपीएस : लाभार्थ्यांत महाराष्ट्र, यूपी आघाडीवर; संख्येत सातत्याने वाढ : २०२३ मध्ये एक कोटी ७३ लाख संख्या
8
अडीच कोटी पाकिस्तानी मुले शाळेबाहेर ! धक्कादायक माहिती उघड
9
तिरुपतीच्या लाडूत प्राण्याची चरबी? आरोपावरून वादळ; प्रयोगशाळेच्या अहवालावरुन मुख्यमंत्री नायडू व वायएसआरसीपीची एकमेकांवर टीका
10
दाेन हजार घरे; सव्वा लाख अर्ज, म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांची मुंबईकरांना भुरळ
11
पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप
12
खाद्यतेल, मिरची पावडर, दुधाचे नमुने जप्त; अन्न व औषध प्रशासनाची विशेष मोहीम
13
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘परफॉर्मन्स’ कसा राहणार? २०१९ मध्ये मुंबईत लढविल्या होत्या २५ जागा
14
राहुल यांच्या लोकप्रियतेने भाजपमध्ये वाढती घबराट; काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांचे टीकास्त्र
15
आवाजाचा डेसिबल डबल! ईद, गणेशोत्सव मिरवणुकीत डीजेंचा दणदणाट, मुंबईकरांच्या कानठळ्या बसल्या
16
सीए ॲनाच्या मृत्यूची केंद्राकडून चौकशी; कामाच्या प्रचंड ताणाचा करणार तपास
17
कुलगुरूपदावरील नियुक्ती रद्द; डॉ. अजित रानडे यांची हायकोर्टात धाव
18
सख्ख्या भावानेच केली लहान भावाची हत्या; धरणात आढळलेल्या मृतदेहाचा छडा
19
‘कोस्टल’वरून ४० लाख वाहनांची वर्दळ; वाहतूक नियोजनाला आणखी गती मिळाली
20
मुंबईकरांनी मारला सव्वालाख टन आंब्यांवर ताव; एप्रिल-मे महिन्यात ५०० कोटींची उलाढाल

नेत्यांच्या पुत्रप्रेमाने काँग्रेस कार्यकर्त्यांचा सावध पवित्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 03, 2022 5:00 AM

काँग्रेसची नेतेमंडळी अजूनही कार्यकर्त्यांना संधी देण्याच्या मानसिकतेत नाहीत. नगरपंचायत निवडणूक ही खऱ्या अर्थाने कार्यकर्त्यांची निवडणूक होती. या निवडणुकीत सर्वाधिक सदस्य काँग्रेसचे निवडून आले. मात्र सत्तेच्या समीकरणात नेत्यांच्या बोटचेप्या भूमिकेमुळे संख्याबळ असूनही चार ठिकाणी विरोधी बाकावर बसावे लागले. नेत्यांना कार्यकर्त्यांच्या भवितव्याची नव्हे तर आपल्याच  घरातील व्यक्तीला काँग्रेसमध्ये नेतेपदी बसविण्याची आस लागली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांच्या कुटुंबापुरतीच मर्यादित झाली आहे. कोणत्याच नेत्याला माजी झाल्यानंतरही पुत्रप्रेमाचा मोह सोडवत नाही. यामुळे अनेक वर्षे पक्षासाठी झटणाऱ्या कार्यकर्त्यांनी आता सावध पवित्रा घेतला आहे. याचा परिणाम पक्षाच्या सदस्य नोंदणी मोहिमेवर झाला आहे. आतापर्यंत २८ हजार सदस्य नोंदणी झाली असून त्यासाठीही १५ दिवसांची मुदतवाढ घ्यावी लागली आहे. काँग्रेसची नेतेमंडळी अजूनही कार्यकर्त्यांना संधी देण्याच्या मानसिकतेत नाहीत. नगरपंचायत निवडणूक ही खऱ्या अर्थाने कार्यकर्त्यांची निवडणूक होती. या निवडणुकीत सर्वाधिक सदस्य काँग्रेसचे निवडून आले. मात्र सत्तेच्या समीकरणात नेत्यांच्या बोटचेप्या भूमिकेमुळे संख्याबळ असूनही चार ठिकाणी विरोधी बाकावर बसावे लागले. नेत्यांना कार्यकर्त्यांच्या भवितव्याची नव्हे तर आपल्याच  घरातील व्यक्तीला काँग्रेसमध्ये नेतेपदी बसविण्याची आस लागली आहे. त्यामुळेच १६ तालुके असलेल्या २७ लाख लोकसंख्येच्या जिल्ह्यात जेमतेम २८ हजारांवर सदस्य नोंदणी झाली. पक्षवाढीसाठी सदस्य नोंदणी अभियान राबविण्याचे ठरले. त्यासाठी मोबाईल लिंक देण्यात आली. मात्र नेत्याने पक्षाच्या कामात कधीच रस दाखविला नाही. याउलट युवक काँग्रेसच्या निवडणुकीत नेत्यांचे पुत्र उमेदवार म्हणून रिंगणात होते. त्यावेळी सामदामदंड भेद वापरून आपल्याच पक्षातील सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा पराभव कसा होईल यासाठी जंगजंग पछाडले. परिणामी नेत्यांचे पुत्रच पक्षांतर्गत निवडणुकीत विजयी      झाले. सामान्य कार्यकर्त्याला अपवादाने संधी मिळत असल्याने आता त्यांनीही पक्षकार्यातून आपले लक्ष कमी केल्याचे दिसून येते. त्यामुळेच सदस्य नोंदणीत काँग्रेस माघारली. यवतमाळ विधानसभेत तर जेमतेम १४०० सदस्य नोंदविता आले. हे पक्षाचे होत चाललेले अध:पतन  मानले जात आहे. खासगीत कार्यकर्ते उघड नाराजी व्यक्त करीत आहे. 

 कार्यकर्ते घडविणाऱ्या लाेकनेत्याची वानवा - जिल्ह्यातील काँग्रेसने राज्याला व देशाला अनेक प्रतिभावान नेते दिले आहेत. या नेत्यांनी खऱ्या अर्थाने लोकनेत्याची भूमिका बजावत पक्षातील कार्यकर्त्यांनाही वेळोवेळी संधी दिली. त्यामुळेच पक्ष सतत सत्तेत होता. मात्र, नंतरच्या काळात पक्षात साठमारी होऊ लागली. आमदार, मंत्री असलेल्यांनी कार्यकर्त्यांऐवजी स्वत:च्या मुलांनाच पद मिळावे यासाठी परिश्रम घेणे सुरू केले. परिणाम सामान्य कार्यकर्ता पक्ष कार्यातून अलिप्त राहू लागला. याचा फटका विधानसभा, लोकसभा निवडणुकीत सातत्याने बसला आहे. आताही कार्यकर्त्यांना बळ देणाऱ्या लोकनेत्याची काँग्रेसला व जिल्ह्याला गरज भासत आहे.

 

टॅग्स :congressकाँग्रेस