शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूच्या उपमुख्यमंत्रीपदी उदयनिधी स्टॅलिन, मंत्रिमंडळात मोठे फेरबदल
2
Team India Announced, IND vs BAN T20 Series: भारताचा संघ जाहीर! बांगलादेशविरूद्ध २ IPL स्टार्स संघात, आणखी एकाचं ३ वर्षाने 'कमबॅक'
3
मेहबूबा मुफ्ती यांनी नसराल्लाहला म्हटलं शहीद; उद्याच्या सर्व निवडणूक सभा केल्या रद्द!
4
"श्रीलंकेतून ३७ तमिळ मच्छिमारांची सुटका करावी", राहुल गांधींचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना पत्र
5
"सर्व मुस्लिम देशांनी एकत्र येऊन इस्रायलशी लढावं", इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांचं आवाहन 
6
बांगलादेशी फॅनचा 'पर्दाफाश'! ५ वर्षांसाठी भारतात येण्यावर बंदी येण्याची शक्यता, प्रकरण काय?
7
"रस्त्यावर हरे कृष्ण-हरे राम करताना दिसतील..."; श्रीकृष्ण जन्मभूमीचा उल्लेख करत काय म्हणाले CM योगी?
8
सौंदर्याचा 'सन्मान'... समंथाला मिळाला विशेष पुरस्कार, सोहळ्यातील 'हॉट लूक'वर खिळल्या नजरा
9
"जर मी 3-4 महिने आधी सुटलो असतो तर...", अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
10
अटल सेतूवरील यंत्रणा ITMS प्रणालीसाठी अकार्यक्षम; परिवहन विभागाच्या चाचणीत निष्पन्न
11
जय शाह यांचा ऐतिहासिक निर्णय! IPL खेळणाऱ्यांवर पैशांचा पाऊस; १ फ्रँचायझी १२.६० कोटी देणार
12
अरविंद केजरीवाल कधी मुख्यमंत्री निवासस्थान सोडणार? AAP कडून आली मोठी अपडेट
13
उल्हासनगरमधून शिंदेसेनेच्या राजेंद्र चौधरी यांनी थोपटले दंड; 'मराठी चेहरा' मतदारांना भावणार?
14
“लाडकी बहीण योजनेला स्वार्थी म्हणणे महिलांचा अपमान”; राज ठाकरेंना अजित पवार गटाचे उत्तर
15
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
16
कृषी पुरस्कारांचे उद्या राज्यपालांच्या हस्ते वितरण होणार, धनंजय मुंडेंची माहिती
17
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
18
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
19
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!
20
“लाडकी बहीण नाही, लाडकी खुर्ची योजना, तिघे भाऊ लबाड आहेत”; ठाकरे गटाची खोचक टीका

विहिरीतील गाळात रुतून दोन चिमुकल्यांचा मृत्यू; पाणी पिताना झाला घात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2022 7:35 PM

चिमुकले पाच मित्र गुरे चारण्यासाठी गावशिवारात गेले होते. तहान लागल्याने एका शेतातील विहिरीजवळ गेले. त्यातील चौघे विहिरीत उतरले. पैकी दोघांचा गाळात रुतून मृत्यू झाला.

ठळक मुद्देगुराख्यामुळे दोघे बचावले 

यवतमाळ : चिमुकले पाच मित्र गुरे चारण्यासाठी गावशिवारात गेले होते. तहान लागल्याने एका शेतातील विहिरीजवळ गेले. त्यातील चौघे विहिरीत उतरले. पैकी दोघांचा गाळात रुतून मृत्यू झाला. वर थांबलेल्या एका मित्रामुळे दोनजण सुखरूप बचावले. ही हृदयद्रावक घटना रविवारी दुपारी मोहदा शिवारातील शेतात घडली. अक्षय मनोज पवार (वय १०) व रणजित श्रीराम भोसले (११, रा. किनवट, ता. कळंब) अशी मृत बालकांची नावे आहेत. या घटनेमुळे कळंब तालुक्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या दुर्गम भागातील किनवट गावावर शोककळा पसरली आहे.

अक्षय पवार, रणजित भोसले, शिवम पवार (१०), रोहन घोसले (९), विरण पवार (७) हे पाचजण गावशिवारात गुरे चारत होते. दुपारच्या वेळी तहान लागल्याने ते कुंच्या मांडवकार भोसले यांच्या शेतातील विहीरीवर गेले. १२ ते १५ फूट खोल असलेल्या या विहिरीला भरपूर पाणी असून, त्यात सहज उतरता येते, त्यामुळे चाैघे खाली उतरले. एकजण वर थांबला. यातील अक्षय व रणजित पाण्यात पडून गाळात फसले. हा प्रकार पाहून वर थांबलेल्या विरण पवार याने आरडाओरड केली. त्यावेळी जवळच असलेला गुराखी गंगाधर काळे (रा. किनवट) धावून आला. त्याने शिवम पवार व रोहन घोसले या दोघांना सुखरूप बाहेर काढले.

घटनेची माहिती होताच संपूर्ण गाव घटनास्थळी पोहोचले. कळंब पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली; परंतु घटनास्थळ त्यांच्या हद्दीत नव्हते. मोहदा येथील पोलीस पाटील पीयूष गब्रानी यांनी पांढरकवडा पोलिसांना कळविले. तेथील पोलीस दाखल झाले. दोन्ही ठाण्यांच्या पोलिसांनी संपूर्ण कारवाई पार पाडून अक्षय मनोज पवार (१०) व रणजित श्रीराम भोसले (११) यांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रवाना केले. सोमवारी शवचिकित्सेनंतर मृतदेह किनवट येथे आणण्यात आले. दोघांवरही दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले.

टॅग्स :Deathमृत्यूAccidentअपघात