शहरं
Join us  
Trending Stories
1
मेहबूबा मुफ्ती यांनी नसराल्लाहला म्हटलं शहीद; उद्याच्या सर्व निवडणूक सभा केल्या रद्द!
2
"श्रीलंकेतून ३७ तमिळ मच्छिमारांची सुटका करावी", राहुल गांधींचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना पत्र
3
"सर्व मुस्लिम देशांनी एकत्र येऊन इस्रायलशी लढावं", इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांचं आवाहन 
4
बांगलादेशी फॅनचा 'पर्दाफाश'! ५ वर्षांसाठी भारतात येण्यावर बंदी येण्याची शक्यता, प्रकरण काय?
5
"रस्त्यावर हरे कृष्ण-हरे राम करताना दिसतील..."; श्रीकृष्ण जन्मभूमीचा उल्लेख करत काय म्हणाले CM योगी?
6
सौंदर्याचा 'सन्मान'... समंथाला मिळाला विशेष पुरस्कार, सोहळ्यातील 'हॉट लूक'वर खिळल्या नजरा
7
"जर मी 3-4 महिने आधी सुटलो असतो तर...", अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
8
अटल सेतूवरील यंत्रणा ITMS प्रणालीसाठी अकार्यक्षम; परिवहन विभागाच्या चाचणीत निष्पन्न
9
जय शाह यांचा ऐतिहासिक निर्णय! IPL खेळणाऱ्यांवर पैशांचा पाऊस; १ फ्रँचायझी १२.६० कोटी देणार
10
अरविंद केजरीवाल कधी मुख्यमंत्री निवासस्थान सोडणार? AAP कडून आली मोठी अपडेट
11
उल्हासनगरमधून शिंदेसेनेच्या राजेंद्र चौधरी यांनी थोपटले दंड; 'मराठी चेहरा' मतदारांना भावणार?
12
“लाडकी बहीण योजनेला स्वार्थी म्हणणे महिलांचा अपमान”; राज ठाकरेंना अजित पवार गटाचे उत्तर
13
"अपने साथी शहीदों में शामिल...", हिजबुल्लाहकडून नसरल्लाहच्या खात्म्याची पुष्टी; घेतली मोठी शपथ!
14
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
15
कृषी पुरस्कारांचे उद्या राज्यपालांच्या हस्ते वितरण होणार, धनंजय मुंडेंची माहिती
16
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
17
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
18
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!
19
“लाडकी बहीण नाही, लाडकी खुर्ची योजना, तिघे भाऊ लबाड आहेत”; ठाकरे गटाची खोचक टीका
20
Narendra Modi : "हा नवा भारत, घरात घुसून मारतो, आजच्याच रात्री सर्जिकल स्ट्राईक..."; मोदींचा काँग्रेसवर घणाघात

पालकमंत्र्यांनीच सोडले शिवसेनेचे मैदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2022 5:00 AM

वनमंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्यानंतर एप्रिल २०२१ मध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील शिवसेना नेते संदीपान भूमरे यांच्यावर यवतमाळच्या पालकमंत्री पदाची धुरा आली. पैठनमधील संत एकनाथ सहकारी साखर कारखान्यात स्लीप बॉय ते कॅबिनेट मंत्री असा प्रवास केलेले भूमरे हे तब्बल पाच वेळा शिवसेनेकडून आमदार झालेले आहेत. त्यांच्याकडे फलोत्पादन मंत्रिपदासह यवतमाळच्या पालकमंत्री पदाची धुरा आहे.

विशाल सोनटक्केलोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : विधान परिषद निवडणुकीनंतर मंगळवारची पहाट राजकीय भूकंप घेऊन उगविली. शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे पक्षाच्या काही आमदारांसह गुजरातमधील सुरत येथे मुक्कामी गेले. यामध्ये यवतमाळचे विद्यमान पालकमंत्री संदीपान भूमरे यांचेही नाव आहे. तर यवतमाळमधूनच काही वर्षापूर्वी विधान परिषद लढविलेले तानाजी सावंतही सुरतमध्येच आहेत. सेनेतील या बंडाळीमुळे जिल्ह्यातील शिवसैनिकांना धक्का बसला असून,  जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष मुंबईतील घडामोडींकडे लागले आहे. वनमंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्यानंतर एप्रिल २०२१ मध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील शिवसेना नेते संदीपान भूमरे यांच्यावर यवतमाळच्या पालकमंत्री पदाची धुरा आली. पैठनमधील संत एकनाथ सहकारी साखर कारखान्यात स्लीप बॉय ते कॅबिनेट मंत्री असा प्रवास केलेले भूमरे हे तब्बल पाच वेळा शिवसेनेकडून आमदार झालेले आहेत. त्यांच्याकडे फलोत्पादन मंत्रिपदासह यवतमाळच्या पालकमंत्री पदाची धुरा आहे. मात्र, एकनाथ शिंदे यांचे निष्ठावंत म्हणून ओळखले जाणारे भूमरे हेही सुरतमध्ये असल्याचे पुढे आल्यानंतर जिल्ह्यातील शिवसैनिकांत अस्वस्थता पसरली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर प्रारंभी भूमरे यांना राज्यमंत्री करणार असल्याचे सांगितले होते. मात्र, त्याच रात्री त्यांनी भूमरे यांना कॅबिनेट मंत्री करीत असल्याचा निरोप दिला. यावर स्वत: भूमरे यांनी कॅबिनेट नको, राज्यमंत्रीच ठेवा अशी विनंती केली होती. मग भूमरे यांनी सेनेला आता हात का दिला, असा प्रश्न शिवसैनिकांना सतावतो आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्यांमध्ये यवतमाळ विधान परिषदेतून सहा वर्षांपूर्वी आमदार झालेल्या तानाजी सावंत यांचेही नाव आहे. नोव्हेंबर २०१६ मध्ये यवतमाळ विधान परिषद मतदारसंघातून ३४८ मते घेऊन तानाजी सावंत हे विजयी झाले होते. त्यांनी कॉंग्रेस उमेदवार शंकर बढे यांचा २७० मतांनी पराभव केला होता. शिक्षण आणि साखर सम्राट अशी ओळख असलेल्या सावंत यांनी विधानसभा निवडणुकीवेळी यवतमाळ विधान परिषदेचा राजीनामा दिला आणि ते उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम-परांडा मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेले. सेना-भाजप सरकारमध्ये त्यांच्याकडे जलसंपदा मंत्रिपद होते. मात्र, महाविकास आघाडी निर्माण झाल्यानंतर त्यांचे मंत्रिपद गेले. त्यामुळे ते नाराज होते. त्यांना मानणारा काही शिवसैनिकांचा वर्ग यवतमाळमध्ये आहे. मंगळवारी तरी कोण गेले, कोण राहिले याचीच चर्चा दिवसभर सुरू होती. दरम्यान, भाजपच्या वर्तुळात मात्र उत्साह पसरला आहे.  मी पुन्हा येईन ही घोषणा प्रत्यक्षात येण्याच्या आशा भाजप कार्यकर्त्यांमध्ये वाढल्या आहेत. 

शिवसेना पदाधिकाऱ्यांचे ‘वेट ॲण्ड वाॅच’- मंगळवारी शिवसेना आमदारांच्या बंडाळीने शिवसैनिकात अस्वस्थता पसरली. कोण गेले आणि कोण सोबत आहेत, पुढे काय होणार, याचीच दिवसभर चर्चा सुरू होती. काही आमदारांसह विद्यमान मंत्र्यांची नावे टीव्हीवर झळकत असल्याने शिवसैनिकांची अस्वस्थता वाढताना दिसली. तरीही या संकटातूनही शिवसेना बाहेर पडेल, असे निष्ठावंत सैनिकांना वाटते पदाधिकारी मात्र ‘वेट ॲण्ड वाॅच’च्या भूमिकेत दिसले. 

संजय राठोड यांची शिवसेनेच्या बैठकीला उपस्थिती - माजी पालकमंत्री तथा दारव्हा-दिग्रसचे आमदार संजय राठोड हेही एकनाथ शिंदे यांच्यासोबत सुरतला गेल्याच्या बातम्या मंगळवारी सकाळी वृत्तवाहिन्यातून झळकत होत्या. मात्र, दुपारी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीला आमदार संजय राठोड यांची उपस्थिती होती. संजय राठोड हे मुंबईतच असून सेनेसोबत असल्याचे सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. याबाबत प्रतिक्रियेसाठी त्यांना संपर्क केला असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. दरम्यान मुंबईतील पुढील    घडामोडीकडे जिल्ह्यातील शिवसैनिकांचे लक्ष लागले आहे. 

 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाSanjay Rathodसंजय राठोड