शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

जुन्या वादातून शेजाऱ्यानेच केला युवकाचा खून

By सुरेंद्र राऊत | Updated: April 30, 2024 15:20 IST

दोन वर्षापूर्वीच्या घटनेचा वचपा : लोहारातील पंचशीलनगरमध्ये थरार

यवतमाळ : शेजार धर्मात कोणताही वाद नको असे सांगितले जाते. शेजाऱ्याशी असलेला वाद कोणत्या टोकाला जाईल, याचा नेम नाही. शहरातील लोहारा परिसरातील पंचशील नगर येथे शेजारच्या भांडणातूनच युवकाला चाकूने भोसकून ठार करण्यात आले. ही घटना मंगळवारी दुपारी घडली. दोन वर्षापूर्वी मृतकाने आरोपीवर चाकूहल्ला केला होता. याच घटनेचा वचपा काढण्यात आला. 

जय विजय पाटील (२६) रा. पंचशीलनगर लोहारा असे मृताचे नाव आहे. त्याचा शेजारी राहणाऱ्या दिगांबर उर्फ दीक्षित हिरणवाडे याच्याशी वाद होता. दोघांमध्ये नेहमीच खटके उडत होते. दोन वर्षापूर्वी शुभेच्छा फलक फाडल्यावरून प्रकरण विकोपाला गेले. त्यावेळी जय पाटील याने चाकूहल्ला करून दिगांबर हिरणवाडे याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. तेव्हा पाठीत खुपलेला चाकू घेऊन दिगांबर शासकीय रुग्णालयात पोहोचला होता. शस्त्रक्रियेनंतर त्याचा जीव वाचला. मात्र शेजाऱ्यातील वाद धुमसत राहिला. जुन्या हल्ल्याचा वचपा काढण्याच्या प्रतीक्षेत दिगांबर होता. मंगळवारी त्याने जय पाटील हा ड्युटीवरुन परत आला असता त्याच्यावर चाकूने वार केले. यात जय गंभीर जखमी झाला. कुटुंबीयांनी त्याला शासकीय रुग्णालयात आणले. तेथे त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, असे लोहारा पोलिसांकडून सांगण्यात आले. 

घटनास्थळी तणावाची स्थिती निर्माण झाली होती. किरकोळ कारणाने वाढत गेलेल्या वादातून हकनाक एकाचा बळी गेला आहे, या प्रकरणात वृत्तलिहिस्तोवर पोलिसात तक्रार दाखल झाली नव्हती. संशयिताचा शोध पोलिसांकडून सुरू आहे.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीYavatmalयवतमाळ