शहरं
Join us  
Trending Stories
1
"खोलीत क्षेपणास्त्रे, गॅरेजमध्ये रॉकेट ठेवणाऱ्यांकडून...", हवाई हल्ल्यादरम्यान नेतन्याहू यांचा लेबनॉनला संदेश
2
भाजपच्या 'इलेक्शन मोड'साठी अमित शाहांची दहा सूत्री 'ब्ल्यू प्रिंट'!
3
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
4
...अन् बलात्कारी, मर्डरर अमरसिंग ठाकूरचे एन्काऊंटर थोडक्यात हुकले!
5
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
6
अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न, घरकुलाच्या जागेच्या मोजणीवरून वाद
7
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची सीआयडी व न्यायालयीन चौकशी केली जाणार 
8
माजी पोलीस महासंचालक म्हणाले, तर हे एन्काऊंटरच घडले नसते!
9
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
10
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
11
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
12
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
13
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
14
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
15
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
16
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
17
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
18
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."
19
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच
20
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य

काँग्रेस जिल्हाध्यक्षाच्या शर्यतीत तिसऱ्याची ‘एन्ट्री’

By admin | Published: December 28, 2016 12:13 AM

काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदासाठी यवतमाळातून दोन नावांची शिफारस केली गेली असताना मंगळवारी मुंबईतील बैठकीदरम्यान अचानक तिसऱ्या नावाची

मुंबईतील बैठक गाजली : वाद दिल्लीत जाण्याची चिन्हे यवतमाळ : काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदासाठी यवतमाळातून दोन नावांची शिफारस केली गेली असताना मंगळवारी मुंबईतील बैठकीदरम्यान अचानक तिसऱ्या नावाची एन्ट्री झाल्याने जिल्हाध्यक्ष निवडीचा गुंता आणखी वाढला आहे. मंगळवारी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण, प्रदेश प्रभारी मोहन प्रकाश यांच्या उपस्थितीत यवतमाळ जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांची बैठक पार पडली. जिल्हा काँग्रेस कमिटीने अध्यक्षपदासाठी माजी मंत्री प्रा. वसंतराव पुरके आणि माजी राज्यमंत्री संजय देशमुख यांच्या नावाची शिफारस केली आहे. या दोघांमधूनच कॉँग्रेसचा नवा जिल्हाध्यक्ष निवडला जाईल, असा अंदाज असताना मुंबईतील बैठकीत अचानक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मनीष उत्तमराव पाटील यांच्या नावाची एन्ट्री झाली. विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी या नावाला ऐनवेळी पसंती दर्शविल्याचे सांगितले जाते. दोन नावे असतानाच जिल्हाध्यक्ष पदाचा दोन महिन्यांपासून निर्णय झाला नाही. आता त्यात तिसऱ्या नावाची एन्ट्री झाल्याने हा वाद आणखी वाढण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. मंगळवारी जिल्हाध्यक्ष पदाचा सोक्षमोक्ष लावायचाच अशा इराद्याने जिल्ह्यातील काँग्रेसची तमाम प्रमुख नेते मंडळी प्रदेशाध्यक्षांच्या दरबारात पोहोचली होती. मात्र तेथे तिसऱ्याच्या एन्ट्रीमुळे पेच निर्माण झाला. जिल्हाध्यक्षपदाचा तोडगा मुंबईत निघण्याची शक्यता कमीच आहे. हा वाद आता थेट दिल्लीपर्यंत जाण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. यापूर्वीसुद्धा काँग्रेस जिल्हाध्यक्षाचा वाद दिल्लीपर्यंत गेला होता, हे विशेष. सेनापतीविना निवडणुकीची चिन्हे जानेवारीच्या पहिल्या-दुसऱ्या आठवड्यात जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीची आचारसंहिता जारी होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच आचारसंहितेपूर्वी काँग्रेसला जिल्हाध्यक्ष मिळावा म्हणून नेत्यांचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र तिसऱ्या नावामुळे वाढलेला गुंता लक्षात घेता जिल्ह्यात काँग्रेसला अध्यक्षाशिवाय जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुका लढाव्या लागतात की काय, अशी शंका कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत. वृत्तलिहीस्तोवर मुंबईतील काँग्रेसची बैठक सुरूच होती. (जिल्हा प्रतिनिधी) जनआक्रोश यात्रा रद्द केल्याने नेत्यांची झाडाझडती सूत्रानुसार, मुंबईतील बैठकीत प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण यांनी जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांची झाडाझडती घेतल्याचे सांगितले जाते. काँग्रेसने २९ डिसेंबरपासून भाजपा सरकारच्याविरोधात जनआक्रोश यात्रेची घोषणा केली होती. मात्र पक्षाला जिल्हाध्यक्ष नसल्याचे कारण सांगून ही यात्रा परस्परच रद्द करण्यात आली. याच मुद्यावरून प्रदेशाध्यक्षांनी आपली नाराजी प्रकट केल्याचे सांगितले जाते. शिवाय यात्रा रद्दबाबत पक्षश्रेष्ठींना न कळविता जिल्ह्यातील नेते थेट प्रसार माध्यमांना ‘अ‍ॅप्रोच’ झाल्याने प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण यांची नाराजी आणखी वाढल्याचे समजते.