शहरं
Join us  
Trending Stories
1
मी ५ वाजता उपोषण स्थगित करणार; नवव्या दिवशी मनोज जरांगे पाटलांची घोषणा
2
“पोलिसांचे कौतुक करावेसे वाटते, एन्काउंटर करुन चांगलेच केले”; शर्मिला ठाकरे स्पष्टच बोलल्या
3
"पहिल्या नजरेत गडबड दिसतेय"; अक्षय शिंदे एन्काउंटरवर उच्च न्यायालयाने पोलिसांकडे केल्या या मागण्या
4
पाचवी कहाणीही अधूरीच! ७५ वर्षांच्या WWE पैलवानाचा घटस्फोट, आतापर्यंत केलीत ५ लग्नं
5
काल शेतकरी कायद्यावर विधान, दुसऱ्याच दिवशी यू-टर्न; कंगना राणौतने कृषी कायद्यावर केलेले वक्तव्य घेतले मागे
6
अमित शाह म्हणजे बाजारबुणगे, पवार आणि ठाकरेंना महाराष्ट्रातून कुणी संपवू शकत नाही, उद्धव ठाकरेंनी ठणकावले
7
ज्या १० महिन्याच्या चिमुकलीसोबत खेळायचा, तिच्यावर घरी नेऊन केला बलात्कार
8
महालक्ष्मीची हत्या करून तुकडे करणारा नेमका आहे कुठे?; पोलिसांना मिळालं लोकेशन, पण...
9
'हा' IPO खुला होताच तासाभरात पूर्ण सबस्क्राइब; ग्रे मार्केटमध्ये ₹२३६ वर पोहोचला भाव; नफ्याचे संकेत
10
"मलाच लढण्यासाठी जागा नाही", प्रीतम मुंडेंच्या उमेदवारीबद्दल पंकजा मुंडे काय म्हणाल्या?
11
जरांगेंना सवाल, पवारांवर टीका; मराठा-ओबीसी आरक्षणावर देवेंद्र फडणवीस रोखठोक बोलले!
12
Navratri 2024: नवरात्रीत कोणत्याही एका दिवशी करा कुंकुमार्चन, म्हणा 'हा' सिद्धमंत्र!
13
Mukta Arts Share: एक डील आणि सुभाष घई यांच्या कंपनीचा शेअर बनला रॉकेट; लागलं अपर सर्किट, जाणून घ्या
14
काळा पैसा, दहशतवाद अन् भ्रष्ट राजकारण ही मोठी समस्या; FATF रिपोर्टमधून भारताला इशारा
15
आमच्या जीवाला धोका, मध्यरात्री ४ तरुण हल्ल्याच्या उद्देशाने आल्याचा लक्ष्मण हाके यांचा दावा
16
Guru Pushyamrut Yoga 2024: पितरांच्या आशिर्वादाबरोबरच, दत्त आणि लक्ष्मी कृपेचा सुवर्णयोग; टाळा 'या' चुका!
17
Mallikarjun Kharge : "शेतकऱ्यांना वाहनाखाली चिरडणाऱ्या मोदी सरकारने अन्नदात्यांसाठी..."; खरगेंचा घणाघात
18
गुरुभक्तीचा सुपंथ, शिष्यांचा उद्धार, गजानन महाराज-शंकर महाराज यांच्यात ‘हा’ समान धागा; वाचा
19
बच्चू कडूंना अक्षय शिंदेचा एन्काउंटर कधी झाला हेच माहिती नाही; पण 'देवाभाऊ न्याय'वर दिली बोचरी प्रतिक्रिया...

एक हजार अनाथांचे घडविले आयुष्य

By admin | Published: January 17, 2016 2:34 AM

भारतीय जैन संघटनेच्या पुणे येथील शैक्षणिक पुनर्वसन प्रकल्पात यवतमाळ जिल्ह्यातील ३८ विद्यार्थी शनिवारी रवाना झाले.

यवतमाळ : भारतीय जैन संघटनेच्या पुणे येथील शैक्षणिक पुनर्वसन प्रकल्पात यवतमाळ जिल्ह्यातील ३८ विद्यार्थी शनिवारी रवाना झाले. या प्रकल्पाने आजवर ३ हजार ३६६ विद्यार्थ्यांना शिक्षण दिले. मराठवाड्यातील २३७ मुलं सध्या तेथे शिकत आहेत. त्यातला एकही जण घरी परत गेला नाही, हेच या प्रकल्पाच्या चांगल्या वातावरणाचे लक्षण होय. एक हजार अनाथांना या प्रकल्पात मोफत शिक्षण दिले आहे. आज ही मुले विविध पदांवर उत्तम काम करीत असल्याचे प्रकल्प शिक्षक ए. जी. पवार यांनी सांगितले. या मुलांच्या पालकांनी कोणतीही काळजी करण्याचे कारण नाही. त्यांच्या राहण्याची, जेवणाची, आरोग्याची आणि शिक्षणाची पूर्ण काळजी घेण्यात येणार आहे. दोन दिवसातून एकदा आम्हीच या मुलांना फोन लावून देऊ आणि त्यांच्या पालकांशी त्यांचे बोलणे करून देऊ . तसेच दिवाळी आणि उन्हाळ्यातील सुटीसाठी या मुलांना घरी पाठविण्यात येईल. कारण चांगले शिक्षण घेत असताना त्यांनी आपल्या गावातील वातावरणाशीही जुळून राहावे, हा प्रकल्पाचा उद्देश असल्याचेही पवार म्हणाले. हा प्रकल्प भारतीय जैन संघटनेचा असल्यामुळे येथे धार्मिक शिक्षणच दिले जात असावे, अशी शंका अनेकांना वाटत असावी. मात्र मी गेल्या कित्येक वर्षापासून या प्रकल्पात काम करीत आहे. येथे केवळ मानवतावादी आणि मानवाच्या विकासासाठी आवश्यक असलेले शिक्षण दिले जाते.(स्थानिक प्रतिनिधी)