शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राची इच्छा पूर्ण झाली! सूरज चव्हाण 'बिग बॉस मराठी'चा महाविजेता; अभिजीत सावंतचं स्वप्न भंगलं
2
उद्धव ठाकरे यांची मुलावर टीका; एकनाथ शिंदे भडकले, म्हणाले…
3
बेरोजगारी दूर झाली तर आरक्षणाचा एकही प्रश्न उभा राहणार नाही; पृथ्वीराज चव्हाण यांचे मत
4
Bigg Boss Marathi Season 5: रनर अप ठरल्यानंतर अभिजीत सावंतची पोस्ट, म्हणाला...
5
प्रयागराजमधील महाकुंभदरम्यान मांस आणि मद्यविक्रीवर बंदी, मुख्यमंत्री योगींचा मोठा निर्णय
6
"8 ऑक्टोबरनंतर बिहारमध्ये राजकीय भूकंप"! NDA संदर्भात आरजेडी नेत्याची मोठी भविष्यवाणी 
7
३ वर्षांनी कमबॅक! आधी Varun Chakravarthy च्या नावे लाजिरवाणा विक्रम; मग सोडली छाप
8
Bigg Boss Marathi Season 5: टॉप ३ च्या शर्यतीतून 'हा' सदस्य बाहेर, कुटुंबाच्या उपस्थितीत झालं एलिमिनेशन
9
INDW vs PAKW : पाक विरुद्ध विजयी जल्लोष! हरमनप्रीत ब्रिगेडनं पुन्हा मारलं मैदान
10
भारतीय महिलांनी पाकिस्तानला दिला 'जोर का झटका'; क्रिकेटच्या देवाने केलं 'नारीशक्ती'चे कौतुक
11
रामराजेंनी घेतली शरद पवारांची भेट?; रणजीतसिंह निंबाळकरांचा खळबळजनक दावा
12
नवा फास्टर किंग Mayank Yadav ची दाबात एन्ट्री; असा पराक्रम करणारा तिसरा गोलंदाज
13
बंगालमध्ये पुन्हा बलात्कार अन् हत्या; आरोपीला 3 महिन्यांत फाशीची शिक्षा, ममतांचा अल्टिमेटम
14
9 चिमुकल्यांची शिकार करणाऱ्या लांडग्यांची दहशत संपली; शेवटचा लांडका मृतावस्थेत आढळला
15
हरियाणात कसं स्थापन होणार भाजप सरकार? नायब सैनी यांनी सांगितला पुढचा प्लॅन, म्हणाले...
16
पाकिस्तानात काहीही होऊ शकतं... आता थेट मुख्यमंत्रीच झाले बेपत्ता, नक्की प्रकरण काय?
17
कुणासोबत डिनर करायला आवडेल किम जोंग की जॉर्ज सोरोस? जयशंकर यांचं उत्तर ऐकून टाळ्यांचा कडकडाट; बघा Video
18
IND vs PAK मॅचमध्ये Arundhati Reddy चा तोरा; ज्यानं प्रसादच्या अविस्मरणीय सीनला उजाळा (VIDEO)
19
Bigg Boss Marathi Season 5: दोन आठवडे 'भाऊचा धक्का' का झाला नाही? रितेशने प्रेक्षकांची माफी मागत सांगितलं कारण
20
अजित पवारांची आघाडी; जनसन्मान यात्रेत विधानसभेसाठी आणखी एका उमेदवाराच्या नावाची घोषणा

जिल्ह्यात तिघांचा बुडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2018 10:22 PM

जिल्ह्यात तीन विविध घटनांत तिघांचा पाण्यात बुडून मृत्यू तर दोन बालिका अत्यवस्थ झाल्याची घटना मंगळवारी घडली. उमरखेड तालुक्यातील बारा येथे पैनगंगा नदीत बुडून एक बालिका, दिग्रस तालुक्यातील अरुणावती धरणात बुडून विद्यार्थी तर पुसद तालुक्याच्या बान्शी येथे विहिरीत पडून शेतकऱ्याचा मृत्यू झाला.

ठळक मुद्देदोघी अत्यवस्थ : उमरखेडमध्ये पैनगंगेत बालिका तर दिग्रसमधील अरुणावतीत विद्यार्थ्याचा अंत

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यात तीन विविध घटनांत तिघांचा पाण्यात बुडून मृत्यू तर दोन बालिका अत्यवस्थ झाल्याची घटना मंगळवारी घडली. उमरखेड तालुक्यातील बारा येथे पैनगंगा नदीत बुडून एक बालिका, दिग्रस तालुक्यातील अरुणावती धरणात बुडून विद्यार्थी तर पुसद तालुक्याच्या बान्शी येथे विहिरीत पडून शेतकऱ्याचा मृत्यू झाला.उमरखेड तालुक्यातील बारा येथे पैनगंगा नदीवर कपडे धुण्यासाठी गेलेल्या रुपाली उकाजी उखळे (१२) या बालिकेचा बुडून मृत्यू झाला. तर कांचन संजय उखळे (११), नेहा पांडुरंग सुरोशे (१६) असे अत्यवस्थ झालेल्या बालिकांची नावे आहे. या दोघींवरही नांदेडच्या रुग्णालयात उपचार सुरू आहे. इसापूर धरणाचे पाणी सोडल्याने पैनगंगा नदीच्या पाण्याची पातळी वाढली आहे. मंगळवारी तीन मुली कपडे धुण्यासाठी नदीवर गेल्या होत्या. त्यावेळी कपडे धुताना रुपालीचा पाय घसरला आणि ती पाण्यात बुडाली. तिला वाचविण्यासाठी कांचन आणि नेहाही पाण्यात उतरल्या. मात्र पोहता येत नसल्याने त्याही बुडू लागल्या. दरम्यान हा प्रकार नदीवर असलेल्या इतर महिलांच्या लक्षात आला. त्यांनी आरडाओरडा करून नागरिकांना गोळा केले. तिघींनाही पाण्यातून बाहेर काढले. मात्र रुपालीचा मृत्यू झाला तर कांचन आणि नेहा बेशुद्ध पडल्या होत्या. त्यांना प्रथम उमरखेड व नंतर नांदेडच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.दिग्रस तालुक्यातील अरुणावती धरणात बुडून तुषार महादेव मात्रे (१८) रा. कारखेडा ता. मानोरा जि. वाशिम याचा मृत्यू झाल्याचे मंगळवारी दुपारी उघडकीस आले. तो तालुक्यातील चिंचोली येथे आजोबा जयराम काळे यांच्याकडे शिक्षणासाठी राहत होता. नुकतीच १२ वीची परीक्षा त्याने दिली होती. सोमवारी सायंकाळी ५ वाजता तो मित्रांसोबत अरुणावती धरणावर पोहण्यासाठी गेला. चौघांनी पाण्यात उडी घेतली. मात्र तुषार बाहेरच आला नाही. त्यानंतर त्याचा शोध सुरू झाला. परंतु रात्र झाल्याने शोध लागला नाही. दरम्यान मंगळवारी सकाळी १० वाजता त्याचा मृतदेह धरणातील पाण्यावर तरंगताना आढळून आला. शवविच्छेदन करुन प्रेत नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. तीन घटनांनी जिल्ह्यात खळबळ उडाली.बान्शी येथे शेतकरी विहिरीत पडलापुसद तालुक्यातील बान्शी येथील शेतातील विहिरीत पडून ब्रिजलाल गरीबसिंग आडे (४०) यांचा मृत्यू झाला. ब्रिजलाल नोकरासह आपल्या शेतात कामासाठी गेला होता. विहिरीवर गेला असता त्याचा तोल जाऊन विहिरीत पडला. त्यात त्याच्या डोक्याला जबर मार लागला. नोकराने आरडाओरडा करून नागरिकांना बोलावून आणले. ब्रिजलालला बाहेर काढले असता तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. त्याच्या मागे साप लागल्याने तो विहिरीवर चढला आणि तोल जाऊन पडल्याची चर्चा गावात आहे. त्याच्या मागे पत्नी, दोन मुले, आई-वडील आहे.