शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरेंनी आमच्यावर टीका करताना आरसा बघावा", देवेंद्र फडणवीस यांचा टोला
2
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे लाटणाऱ्यांवर काय कारवाई होणार? मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या...
3
आता कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या ईडीच्या निशाण्यावर! MUDA घोटाळ्याप्रकरणी PMLA अंतर्गत FIR दाखल
4
राहुल गांधी ४,५ ऑक्टोबरला महाराष्ट्रात; छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाचे करणार अनावरण
5
"दम असेल तर उद्धव ठाकरेंनी फडणवीसांविरोधात निवडणूक लढावी", फडणवीसांचे निकटवर्तीय जोशींचे आव्हान
6
इलेक्टोरल बाँड खंडणी प्रकरणात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना दिलासा, उच्च न्यायालयाकडून तपासाला स्थगिती
7
विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे उमेदवार कसे निवडले जाणार? पक्षश्रेष्ठींनी ठरवला 'मास्टरप्लॅन'
8
विमान अपहरणानंतर वाटाघाटींसाठी गेलेल्या जसवंत सिंहांच्या लाल सुटकेसमध्ये काय होतं? २५ वर्षांनंतर मुलाने केला मोठा गौप्यस्फोट  
9
अवघ्या २३ धावा, ३ षटकार; तरीही रोहितने केली 'मास्टरब्लास्टर'ची बरोबरी, काय केला पराक्रम?
10
"हा 'पंढरी' कायम चालत राहील आणि...", पॅडी कांबळेची पोस्ट चर्चेत
11
पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी ठाणे जिल्हा दौऱ्यावर; अधिकाऱ्यांनी घेतली पूर्वतयारी आढावा बैठक! 
12
अपक्ष निवडणूक लढवतेय देशातील सर्वात श्रीमंत महिला; मुलगा प्रचारापासून लांब तर सून मैदानात
13
नोकरी सोडून गेलेल्या कर्मचाऱ्याला Google ने परत बोलावले; पगार तब्बल 22,000 कोटी रुपये!
14
युवासेनेच्या आनंदावर विरजण? ‘पिक्चर अभी बाकी है’ म्हणत सिनेट निकालाला हायकोर्टात आव्हान
15
"ब्राह्मणांना मारून योगीं आदित्यनाथ...!"; हे काय बोलून गेले काँग्रेस नेते रणदीप सिंह सुरजेवाला?
16
IND vs BAN, 2nd Test, Day 4 Stumps: रोहितचा 'मास्टर स्ट्रोक'; चौथ्या दिवसाअखेर बांगलादेशचा दुसरा डाव २ बाद २६ धावा
17
डिझेलवर 12 रुपये तर...? जाणून घ्या, एक लिटर पेट्रोलवर किती नफा कमावतायत तेल कंपन्या?
18
माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंच्या कन्या संजना जाधव यांच्या गाडीला अपघात, थोडक्यात बचावल्या
19
इस्रायलने आपल्या आणखी एका शत्रूचा केला खात्मा, हमास कमांडर फतेह शेरीफ ठार
20
“ही निवडणूक आरक्षणाच्या मुद्द्यावरच लढली जाईल, ठाकरे गट-भाजपा पडद्यामागे...”: प्रकाश आंबेडकर

साडेतीन हजार विहिरी रखडल्या

By admin | Published: January 03, 2017 2:21 AM

महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या साडे तीन हजार विहिरींची कामे रखडली आहे. केवळ सहा हजार

मग्रारोहयो : ५८ कोटींचा झाला खर्च यवतमाळ : महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या साडे तीन हजार विहिरींची कामे रखडली आहे. केवळ सहा हजार विहिरी आत्तापर्यंत पूर्णत्वास गेल्या आहेत. शेतकऱ्यांना बारमाही ओलिताची सोय उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत विहिरी बांधून देण्याचा कार्यक्रम हाती घेतला आहे. जिल्हा परिषदेने या योजनेअंतर्गत तब्बल १५ हजार ८५३ विहिरींना प्रशासकीय मान्यता प्रदान केली. मात्र विहिरी खोदण्याचे काम अत्यंत संथगतीने होत असल्याने आजमितीस केवळ सहा हजार ३१५ विहिरी पूर्ण झाल्या आहेत. ही गती कायम राहिल्यास उर्वरित विहिरी पूर्ण होण्यास किती काळ लागेल, हे सांगणे कठीण झाले आहे. या योजनेंतर्गत सध्या जिल्ह्यात पाच हजार ८७५ विहिरींची कामे सुरू आहेत. पूर्ण झालेल्या आणि कामे सुरू असलेल्या विहिरींवर तब्बल ५८ कोटी ४७ लाख ३७ हजार रूपयांचा खर्च झाला आहे. अद्याप तीन हजार ६६३ विहिरींची कामे प्रतीक्षेतच आहे. या साडे तीन हजार विहिरींची कामे कधी सुरू होतील, त्या कधी पूर्ण होतील, हे सांगायला कुणीच तयार नाही. त्यामुळे किमान तीन हजार ६६३ शेतकऱ्यांचे हिरवे स्वप्न डोळ्यातच साठवून राहणार आहे. (शहर प्रतिनिधी) ६८ कोटींची गरज ४विदर्भ धडक सिंचन विहिरी योजनेतून दोन हजार ७५ विहिरी पूर्ण झाल्या आहेत. मात्र तीन हजार ७७० विहिरी अद्याप अपूर्ण आहे. यापैकी एक हजार ४११ विहिरींची कामे सुरू आहे. उर्वरित दोन हजार ७२१ विहिरींसाठी निधीच उपलब्ध नाही. त्यासाठी ६८ कोटींच्या निधीची गरज आहे. दरम्यान, यापूर्वीच या योजनेतील चार हजार १४ विहिरी महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेत वर्ग करण्यात आल्या आहेत.