शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
2
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
3
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
4
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
5
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
6
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
7
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
8
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
9
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
10
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
11
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
12
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
13
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
14
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
15
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
16
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
17
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
18
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
19
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
20
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...

यवतमाळात आज पहिल्यांदाच देशपातळीवरील नीट परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2020 05:00 IST

केवळ मुंबई व देशातील मोठ्या शहरातच या परीक्षेचे केंद्र दिले जात होते. मात्र यंदा कोरोनाचा धोका टाळण्यासाठी परीक्षा केंद्रांची संख्या वाढविण्यात आली. त्यात यवतमाळ येथे जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालय (जेडीआयईटी) आणि जगदंबा अभियांत्रिकी महाविद्यालय असे दोन केंद्र देण्यात आले. रविवारी १३ सप्टेंबर रोजी येथे सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळत परीक्षा घेतली जाणार आहे.

ठळक मुद्देवैद्यकीय प्रवेश । ‘जेडीआयईटी’सह शहरात दोन परीक्षा केंद्र सज्ज

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : वैद्यकीय अभ्यासक्रमांना प्रवेश मिळविण्यासाठी आवश्यक असलेली देशपातळीवरील नीट परीक्षा यंदा पहिल्यांदाच यवतमाळ शहरातही होत आहे. येथे दोन परीक्षा केंद्र असून तेथे ८४० विद्यार्थी पेपर देणार आहे.केवळ मुंबई व देशातील मोठ्या शहरातच या परीक्षेचे केंद्र दिले जात होते. मात्र यंदा कोरोनाचा धोका टाळण्यासाठी परीक्षा केंद्रांची संख्या वाढविण्यात आली. त्यात यवतमाळ येथे जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालय (जेडीआयईटी) आणि जगदंबा अभियांत्रिकी महाविद्यालय असे दोन केंद्र देण्यात आले. रविवारी १३ सप्टेंबर रोजी येथे सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळत परीक्षा घेतली जाणार आहे.नॅशनल टेस्टिंग एजंसीद्वारे ही नॅशनल एन्टरन्स कम एलिजिबिलिटी टेस्ट (नीट) घेतली जात आहे. रविवारी सकाळी दुपारी २ ते ५ या वेळात १८० प्रश्नांसह ७२० गुणांची परीक्षा होणार आहे. यात जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या केंद्रावर ४८० तर दुसऱ्या केंद्रातून ३६० विद्यार्थी बसणार आहेत.कोविडच्या पार्श्वभूमीवर एनटीएच्या सूचनेनुसार परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांसाठी विविध सुविधा करण्यात आल्याचे केंद्राधिकारी डॉ. विवेक गंधेवार यांनी सांगितले. जगदंबा अभियांत्रिकीतही परीक्षेसाठी सज्जता असल्याचे केंद्राधिकारी डॉ. विजय नेवे यांनी सांगितले.पेपरच्या तीन तास आधी विद्यार्थ्यांना ‘एन्ट्री’कोविडचा संसर्ग टाळण्यासाठी या परीक्षेत सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोर पालन केले जाणार आहे. विद्यार्थ्यांची एकाच वेळी केंद्रावर गर्दी होऊ नये यासाठी २ वाजता सुरू होणाºया पेपरसाठी विद्यार्थ्यांना सकाळी ११ वाजतापासूनच एन्ट्री दिली जाणार आहे. मात्र त्यातही १२०-१२० विद्यार्थ्यांचे चार स्लॉट पाडण्यात आले असून कोणी किती वाजता यावे याचे वेळापत्रक विद्यार्थ्यांच्या प्रवेशपत्रावर नमूद आहे.संसर्ग टाळण्यासाठी ‘एक्झिट प्लॅन’पेपर संपल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांची बाहेर निघण्यासाठी गर्दी होऊ नये याकरिता जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाने ‘एक्झिट प्लॅन’ केला आहे. यात कोणत्या वर्गातील विद्यार्थ्यांनी कोणत्या मार्गाने जावे हे निश्चित आहे. त्यांना मार्ग दाखवित गेटपर्यंत नेण्यासाठी कर्मचारी दिमतीला असतील. शिवाय गेटवर ध्वनीक्षेपकाद्वारे याबाबत उद्घोषणा केली जाणार आहे.सुरक्षित वर्ग रचनाविद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी वर्गरचना करण्यात आली आहे. यावेळी एका वर्गात फक्त बारा विद्यार्थी बसविले जाणार असून एका बाकावर एकच विद्यार्थी असेल. दोन बाकांमध्ये सहा फुटांचे अंतर ठेवले जाणार आहे. एका वर्गात दोन इन्व्हीजीलेटर असतील. वर्गात येण्यापूर्वीच विद्यार्थ्यांना सॅनिटायझर, मास्क पुरविले जाणार आहे. तसेच नोंदणीची प्रक्रियाही ‘टचलेस’ राहणार आहे.कोविडची स्थिती बघता पालकांनी सहकार्य करावे. सूचनांचे पालन करून ठरलेल्या वेळीच विद्यार्थ्यांना केंद्रावर आणावे व विद्यार्थ्यांना सोडून लगेच परत जावे. केंद्राबाहेर घुटमळत राहू नये. त्यामुळे गर्दी-गोंधळ होणार नाही.- डॉ. विवेक गंधेवार, केंद्राधिकारी, जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालय, यवतमाळ

टॅग्स :JDIETजेडीआयईटीexamपरीक्षा