शहरं
Join us  
Trending Stories
1
नसराल्लाह मारला गेला? हिजबुल्लाहच्या मुख्यालयावर इस्रायलचा मोठा हल्ला
2
"मला क्लीन चिट मिळाल्यामुळेच चांदीवाल आयोगाचा अहवाल दडवला", अनिल देशमुखांचा शिंदे सरकारवर आरोप
3
सरकारची मोठी कारवाई, Aadhaar आणि PAN Card चा डेटा लीक करणाऱ्या ३ वेबसाइट्स ब्लॉक! 
4
Ujjain Mahakal Temple Wall Collapse: उज्जैनच्या महाकाल मंदिराजवळ मोठी दुर्घटना! मुसळधार पावसाने भिंत कोसळली, दोघांचा मृत्यू
5
'त्या' दोन अल्पवयीन मुलींवर आणखी ७ जणांनी अत्याचार केल्याचे उघड!
6
शून्य मोजून थकाल; भारतात लॉन्च झाली Rolls-Royce ची सर्वात महागडी कार, किंमत तब्बल...
7
Rohit Sharma Team India, IND vs BAN 2nd Test: "रोहित शर्माला ही आकडेवारी दाखवा..."; माजी मुंबईकर क्रिकेटर संतापला
8
भारताने कलम 370 लागू करावी; संयुक्त राष्ट्राच्या मंचावर शाहबाज शरीफ यांनी गरळ ओकली
9
"दलित समाजाचा मुख्यमंत्री व्हावा", कुमारी सैलजा यांचा पुन्हा मुख्यमंत्रीपदावर दावा
10
सेक्स रॅकेट चालविणाऱ्या दलाल महिलेला ठाणे येथून अटक; तीन पिडित तरुणींची सुटका
11
Giriraj Singh : केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांना जीवे मारण्याची धमकी, पाकिस्तानातून आला व्हॉट्सॲप कॉल
12
An Se-young Shocking Revelations, Paris Olympics 2024: "मला त्यांनी अंतर्वस्त्रे धुवायला लावली"; ऑलिम्पिक गोल्ड मेडलिस्ट खेळाडूचा आरोप
13
"ती म्हणाली मला तुझ्यासोबत वेळ घालवायचाय", युवीने सांगितला अभिनेत्रीसोबतचा किस्सा अन् मोठा खुलासा
14
"PM ज्याच्यावर घोटाळ्याचा आरोप करतात, त्याला DCM बनवतात", केजरीवाल यांचा सभागृहातून हल्लाबोल
15
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याविरोधात एफआयआर दाखल, MUDA प्रकरणात पोलिसांची कारवाई! 
16
ना तिकीट, ना रिझर्व्हेशन, भारतामधील एकमेव ट्रेन, जिच्यामधून करता येतो मोफत प्रवास
17
महाराष्ट्रात हजारो जणांना ३०० कोटींचा गंडा घातला, मथुरेत साधूच्या वेशात लपला, अखेर पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
18
काँग्रेसच्या १३ बंडखोर नेत्यांवर कारवाई, ६ वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी!
19
Ranbir Kapoor : वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी रणबीर कपूरने कामाला केली सुरुवात; आईला दिला पहिला पगार
20
अग्निवीरांसाठी खूशखबर; 'ब्रह्मोस'मध्ये नोकरीची सुवर्णसंधी, कंपनी देणार आरक्षणाचा लाभ

ट्रॅव्हल्स भस्मसात; मृत्यूच्या दाढेतून परतले 20 प्रवासी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 08, 2022 10:56 PM

चिंतामणी ट्रॅव्हल्सची यवतमाळ-मुंबई ही एम.एच.२९/ए.डब्ल्यू.३१०० या क्रमांकाची बस शुक्रवारी दुपारी ३.३० वाजता यवतमाळहून मुंबईसाठी निघाली होती. प्राप्त झालेल्या माहितीनुसार या गाडीमध्ये ५३ व्यक्ती होत्या. त्यापैकी १२ जणांचा अपघातात मृत्यू झाला असून, यातील काहींची ओळख पटलेली नाही. मृतांमध्ये यवतमाळ जिल्ह्यातील एकाचा समावेश आहे. यवतमाळ येथील लखन राठोड आणि मीराबाई राठोड या जखमींवर नाशिकच्या सिल्व्हर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे,

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : यवतमाळहून मुंबईसाठी निघालेल्या चिंतामणी ट्रॅव्हल्सच्या बसला शनिवारी पहाटे नाशिक येथील आडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत भीषण अपघात होऊन १२ जणांचा मृत्यू झाला. या अपघातात मारेगाव तालुक्यातील मांगरूळ येथील अजय मोहन कुचनकर या १७ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे, तर २० जण बालंबाल बचावले आहेत. जखमीवर नाशिकमधील विविध रुग्णालयात उपचार सुरू आहे, तर किरकोळ जखमी असलेल्या चौघांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. चिंतामणी ट्रॅव्हल्सची यवतमाळ-मुंबई ही एम.एच.२९/ए.डब्ल्यू.३१०० या क्रमांकाची बस शुक्रवारी दुपारी ३.३० वाजता यवतमाळहून मुंबईसाठी निघाली होती. प्राप्त झालेल्या माहितीनुसार या गाडीमध्ये ५३ व्यक्ती होत्या. त्यापैकी १२ जणांचा अपघातात मृत्यू झाला असून, यातील काहींची ओळख पटलेली नाही. मृतांमध्ये यवतमाळ जिल्ह्यातील एकाचा समावेश आहे. यवतमाळ येथील लखन राठोड आणि मीराबाई राठोड या जखमींवर नाशिकच्या सिल्व्हर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे, तर नाशिक जिल्हा रुग्णालयात अमितकुमार (यवतमाळ), सचिन जाधव, अश्विनी जाधव (पुसद), अजय शेषराव देवगन (दिग्रस), ज्ञानदेव नथू राठोड (पुसद), दीपक बजरंग शेंडे (ड्रायव्हर, यवतमाळ), सतीश बाबूसिंग राठोड, स्वरा ज्ञानदेव राठोड (यवतमाळ), अनिल चव्हाण (पुसद), हंसराज (दिग्रस), महादेव धोत्रे, पिराजी धोत्रे (आर्णी) यांचा समावेश असून, पुसद येथील प्रभादेवी केशव जाधव यांना एनडीव्हीपी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. यवतमाळातीलच वैशाली बागडे आणि उज्ज्वल यांच्यासह दिग्रस येथील बादल बस्सी आणि पायल साबळे हे चौघेजण या अपघातात किरकोळ जखमी झाले होते. उपचारानंतर ते पुढे मुंबईला पोहोचले असल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात आले. दरम्यान या अपघातामुळे खासगी प्रवासी वाहतुकीच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. खासगी प्रवासी वाहनांची आरटीओतर्फे नियमित तपासणी करणे गरजेचे असल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांतून उमटत आहेत.

ओळख पटविण्यासाठी संपर्क कराजिल्ह्यातील आणखी एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे समजते. मात्र त्याचे अद्यापपर्यंत ओळख पटलेली नाही. याबरोबरच सदर ट्रॅव्हल्सने आणखी काही प्रवासी ज्यांची ट्रॅव्हल्स कंपनीकडे नोंद नाही, असे या अपघातात जखमी अथवा मृत झाले असतील तर संबंधितांच्या नातेवाइकांनी नाशिक जिल्हाधिकाऱ्यांशी ८६६८७८४८४७ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन यवतमाळचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे.

आरटीओच्या नाकर्तेपणामुळेच अपघात वाढलेआरटीओ कार्यालयातील काहींनी थेट ट्रॅव्हल्सच्या धंद्यात भागिदारी केली आहे. यासाठी स्वतंत्र कार्यालय थाटले आहे. त्यामुळे ट्रॅव्हल्समधून अतिरिक्त होणारी प्रवासी वाहतूक याकडे दुर्लक्ष केले जाते. ट्रॅव्हल्स चालकांकडून वसुलीसाठी प्रतिनियुक्तीवर विशेष अधिकारी आणला आहे. ओव्हरलोडचाही हिशेब त्याच अधिकाऱ्याकडे आहे. आर्थिक हितसंबंधातून होत असलेल्या गैरप्रकाराकडे दुर्लक्ष झाल्यानेच अपघात वाढले आहे. यासाठी जबाबदारी निश्चित करणे गरजेचे आहे.

 

टॅग्स :fireआग