शहरं
Join us  
Trending Stories
1
चेंबुरमध्ये पहाटे अग्नितांडव; चाळीत लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
2
"त्यांना लाज वाटली पाहिजे", पंतप्रधान नेतन्याहू फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांवर भडकले
3
पाकिस्तानमध्ये मोठं काय घडणार? अमेरिकेने नागरिकांसाठी ॲडव्हायजरी जारी केली
4
काहीही करा, आरक्षणाच्या मर्यादेची भिंत तोडणारच! जात जनगणनाही करायला भाग पाडू: राहुल गांधी
5
अल्लू अर्जुन नाही बॉलिवूडचा हा सुपरस्टार बनला असता 'पुष्पा', जाणून घ्या का नाकारला सिनेमा
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सामाजिक क्षेत्रात मान - सन्मान; दुपार नंतर मात्र संयमित राहावे
7
लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यातून काढता येईना; किरीट सोमय्या महिलांसह पोहोचले पोलीस ठाण्यात
8
जुन्नर विधानसभेतही शरद पवार धक्का देणार! नवं कार्ड बाहेर काढणार?; बेनकेंविरोधात 'हा' उमेदवार मैदानात उतरवणार
9
नवरात्रात विनायकी चतुर्थी: ६ राशींना लाभ, सुख-समृद्धी-सौभाग्य; पाहा, साप्ताहिक राशीभविष्य
10
हरयाणात भाजपाला पराभूत करत काँग्रेसची सत्ता, तर जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेस-नॅकॉ युतीला कौल
11
मविआकडून केवळ दिशाभूल, विकासकामे रोखणाऱ्या शत्रूला निवडणुकीत रोखा: PM नरेंद्र मोदी
12
मराठी भाषेने स्वराज्यासह संस्कृतीची चेतना जागविली; पंतप्रधान मोदी यांचे कौतुकोद्गार
13
PM मोदी यांच्या हस्ते मेट्रो ३ मार्गिकेचे उद्घाटन; प्रवासात शाळकरी मुले, महिलांशी संवाद
14
दुर्गादेवी विरोधकांचा राजकीय संहार करेल; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मविआवर टीका
15
पंतप्रधानांचा ठाणे दौरा: तीन हजार अवजड वाहने रोखल्याने नाशिक-मुंबई प्रवास झाला सुसाट!
16
हरयाणामध्ये मतदारांनी कोणाला दिला सत्तेचा कौल? ६१ टक्क्यांपेक्षा जास्त मतदानाची नोंद
17
‘वैद्यकीय शिक्षण’मध्ये कंत्राटी भरती करणार; आपलाच निर्णय सरकारकडून धाब्यावर
18
सरळसेवेची ‘ती’ पदे ‘मानधना’वर भरणार; सुट्टीच्या दिवशी राज्य सरकारचा जीआर
19
नायगाव बीडीडी आता ‘डॉ. आंबेडकर संकुल’; महायुती सरकारचा मोठा निर्णय
20
भोजनातून शासकीय वस्तीगृहातील ४० मुलींना विषबाधा; वैद्यकीय महाविद्यालयात उपचार

आदिवासींचे चौथे राष्ट्रीय अधिवेशन

By admin | Published: November 14, 2015 2:43 AM

राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेचे चौैथे अधिवेशन यवतमाळात आयोजित करण्यात आले आहे.

यवतमाळात आयोजन : ६७ वर्षानंतरही प्रश्न कायमचयवतमाळ : राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेचे चौैथे अधिवेशन यवतमाळात आयोजित करण्यात आले आहे. १५ नोव्हेंबरला समता मैदानावर (पोष्टल मैदान) हे अधिवेशन पार पडणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत शुक्रवारी देण्यात आली.आदिवासी बांधवांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेच्या वतीने चौथे राज्यस्तरीय अधिवेशन आयोजित करण्याचे ठरले आहे. आदिवासींच्या हितासाठी असलेली ५ वी आणि ६ वी सुची तयार करण्यात आली. मात्र त्याची अंमलबजावणीच झाली नाही. यामुळे स्वातंत्र्याच्या ६७ वर्षानंतरही आदिवासींचे प्रश्न कायम आहेत. या प्रश्नावर मात करण्यासोबतच महाराष्ट्रातील आदिवासी बांधवांना एकत्र करण्यासाठी राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेत आदिवासींच्या प्रलंबित प्रश्नांवर सांगोपांग चर्चा होईल. तसेच हे प्रश्न सोडविण्यासाठी यापुढील रुपरेषा ठरविण्यात येईल. या परिषदेला राज्यभरातून आदिवासी नेते, तज्ज्ञ, विचारवंत उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहे. या परिषदेचे उद्घाटन माजी विधानसभा उपाध्यक्ष प्रा. वसंतराव पुरके करणार आहेत. राज्य अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम राहणार आहेत. पत्रपरिषदेला राज्याध्यक्ष घनशाम अलामे, जिल्हाध्यक्ष राजू मडावी, बामसेबचे जिल्हाध्यक्ष पी.एल.कुमरे, कृष्णा किनाके आदी प्रामुख्याने उपस्थित होते. (शहर वार्ताहर)