शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक दिवस! मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा; केंद्र सरकारचा मोठा निर्णय
2
अजित पवार बारामतीमधून माघार घेणार? कार्यकर्त्यांसमोर दिले सूचक संकेत 
3
रेल्वे कर्मचाऱ्यांना मोदी सरकारची मोठी भेट! नवरात्रीच्या पहिल्या दिवशी बोनस मंजूर, मिळणार 'इतकी' रक्कम! 
4
Women's T20 World Cup : कॅप्टन Fatima Sana ची अष्टपैलू खेळी; लंकेविरुद्ध पाकचा 'डंका'
5
"आजचा दिवस मायमराठीच्या इतिहासातील एक ऐतिहासिक दिवस’’, देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया
6
मुलीच्या अपहरणाची तक्रार देणारा बापच निघाला विकृत, वडिलांच्याच अत्याचाराला कंटाळून मुलीने सोडले होते घर
7
अखेर सापडलं सोन्याचं घुबड, ३१ वर्षांपासून शोघ घेत होता संपूर्ण देश, नेमकं कारण काय?  
8
धक्कादायक! घरात घुसून पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची हत्या; CM योगींनी दिले कारवाईचे आदेश
9
केकमुळे कॅन्सरचा धोका! अन्न सुरक्षा आणि गुणवत्ता विभागाच्या अहवालात मोठा खुलासा
10
एक दोन नव्हे, तब्बल 7 आघाड्यांवर युद्ध लढतोय चिमुकला इस्रायल; जाणून घ्या, ज्यूंचे शत्रू कोण कोण?
11
अरुण गवळीची मुलगी गीता गवळी ठाकरे गटाच्या संपर्कात; लवकरच मशाल हाती घेणार?
12
Sangli: शरद पवारांच्या दौऱ्याने सांगलीत भाजपला मोठा धक्का; राजेंद्रअण्णा देशमुख पवार गटात
13
वैवाहिक बलात्कार गुन्हा नाही तर सामाजिक समस्या; सुप्रीम कोर्टात केंद्र सरकारची स्पष्टोक्ती
14
रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरला, ‘फादर ऑफ ऑल बॉम्ब’ चा वापर केल्याचा दावा! बघा धडकी भरवणारा VIDEO
15
Rohit Pawar Rohit Sharma, Viral VIDEO: रोहित पवार म्हणाले- "हमको और एक वर्ल्ड कप चाहिए", मग रोहित शर्माने काय केलं?
16
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना खूशखबर, ५ तारखेला खात्यात जमा होणार ४ हजार रुपये
17
इराणमध्ये विषारी दारू प्यायल्यानं २६ जणांचा मृत्यू, १०० हून अधिक जण रुग्णालयात दाखल
18
"जरांगेंनी पाडापाडीचं राजकारण करण्यापेक्षा उमेदवारांना निवडून आणावं’’,संभाजीराजेंचा सल्ला
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ठाणे दौरा, शहरातील वाहतुकीमध्ये बदल
20
"आधी स्वतःची परिस्थिती पाहा..." धार्मिक स्वातंत्र्याबाबत अमेरिकेच्या टीकेवर भारताचा पलटवार

तुरीवर रोग, शेतकरी चिंतातुर

By admin | Published: November 22, 2015 2:33 AM

सोयाबीन आणि कापसाने दगा दिला. सर्व आशा तूर पिकावर होत्या. मात्र त्यावर रोगाने आक्रमण केले.

ढगाळ वातावरण : कृषी मार्गदर्शनाची प्रतीक्षा, कृषी सहायकांची पावले कधी वळणार?प्रवेश कवडे हरदडासोयाबीन आणि कापसाने दगा दिला. सर्व आशा तूर पिकावर होत्या. मात्र त्यावर रोगाने आक्रमण केले. आधीच चिंताग्रस्त असलेल्या शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फेरले जाण्याची भीती आहे. तूर हातातून गेल्यास वर्षभर कुटुंबाचा गाडा चालवायचा कसा, प्रासंगिक खर्च करायचे कसे याची काळजी त्यांना लागली आहे. एवढी गंभीर परिस्थिती असतानाही कृषी विभागाकडून कुठलेही मार्गदर्शन होत नाही. या विभागातील अधिकारी वा कर्मचारी शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष शेतापर्यंत पोहोचण्याची तसदी घेत नाही. निसर्गाच्या लहरीपणाचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. उशिराचा पाऊस, बराच काळपर्यंत दडी आणि आवश्यक त्यावेळी पावसाची माघार या कारणामुळे सोयाबीन आणि कापूस हे नगदी पीक शेतकऱ्यांच्या हातून गेले. हाता-तोंडाशी आलेला घास हिरावला गेला. सोयाबीनला पाण्याची गरज असताना वरुण राजा बरसला नाही. त्यामुळे बळीराजाची सर्व भिस्त तूर पिकावर आहे. आता या पिकावर ढगाळ वातावरणामुळे अळींचा प्रादुर्भाव झाला आहे. या स्थितीत काय उपाययोजना करायला पाहिजे, याविषयीचे मार्गदर्शन त्यांना मिळत नाही. प्रत्यक्षात यावर्षी तुरीचा पेरा कमी आहे. त्यातही वातावरणातील बदलामुळे रोगांचा प्रादुर्भाव वाढला. तूर काढणीवर येण्यासाठी बराच कालावधी आहे. फुलोऱ्यावर असलेल्या तुरीवर मावा आणि तुडतुड्यांचा प्रादुर्भाव वाढल्याने फुलांची गळती वाढली आहे. यावर नियंत्रण न आणल्यास संपूर्ण तूर पीक हातची जाण्याची चिन्हे दिसत आहे. गेली दोन दिवसांपासून थंडीचे प्रमाण वाढले आहे. हा काळ तूर पिकासाठी लाभदायक आहे. पण, कीडींचा प्रादुर्भाव धोक्याचा ठरत आहे. कृषी विभागाचे कृषी सहायक, मंडळ अधिकारी, विस्तार अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांची पावले शेतापर्यंत वळावी, अशी अपेक्षा मेटाकुटीस आलेल्या शेतकऱ्यांना आहे.