शहरं
Join us  
Trending Stories
1
मेहबूबा मुफ्ती यांनी नसराल्लाहला म्हटलं शहीद; उद्याच्या सर्व निवडणूक सभा केल्या रद्द!
2
"श्रीलंकेतून ३७ तमिळ मच्छिमारांची सुटका करावी", राहुल गांधींचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना पत्र
3
"सर्व मुस्लिम देशांनी एकत्र येऊन इस्रायलशी लढावं", इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांचं आवाहन 
4
बांगलादेशी फॅनचा 'पर्दाफाश'! ५ वर्षांसाठी भारतात येण्यावर बंदी येण्याची शक्यता, प्रकरण काय?
5
"रस्त्यावर हरे कृष्ण-हरे राम करताना दिसतील..."; श्रीकृष्ण जन्मभूमीचा उल्लेख करत काय म्हणाले CM योगी?
6
सौंदर्याचा 'सन्मान'... समंथाला मिळाला विशेष पुरस्कार, सोहळ्यातील 'हॉट लूक'वर खिळल्या नजरा
7
"जर मी 3-4 महिने आधी सुटलो असतो तर...", अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
8
अटल सेतूवरील यंत्रणा ITMS प्रणालीसाठी अकार्यक्षम; परिवहन विभागाच्या चाचणीत निष्पन्न
9
जय शाह यांचा ऐतिहासिक निर्णय! IPL खेळणाऱ्यांवर पैशांचा पाऊस; १ फ्रँचायझी १२.६० कोटी देणार
10
अरविंद केजरीवाल कधी मुख्यमंत्री निवासस्थान सोडणार? AAP कडून आली मोठी अपडेट
11
उल्हासनगरमधून शिंदेसेनेच्या राजेंद्र चौधरी यांनी थोपटले दंड; 'मराठी चेहरा' मतदारांना भावणार?
12
“लाडकी बहीण योजनेला स्वार्थी म्हणणे महिलांचा अपमान”; राज ठाकरेंना अजित पवार गटाचे उत्तर
13
"अपने साथी शहीदों में शामिल...", हिजबुल्लाहकडून नसरल्लाहच्या खात्म्याची पुष्टी; घेतली मोठी शपथ!
14
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
15
कृषी पुरस्कारांचे उद्या राज्यपालांच्या हस्ते वितरण होणार, धनंजय मुंडेंची माहिती
16
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
17
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
18
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!
19
“लाडकी बहीण नाही, लाडकी खुर्ची योजना, तिघे भाऊ लबाड आहेत”; ठाकरे गटाची खोचक टीका
20
Narendra Modi : "हा नवा भारत, घरात घुसून मारतो, आजच्याच रात्री सर्जिकल स्ट्राईक..."; मोदींचा काँग्रेसवर घणाघात

गुणवंतांची बॅटिंग धुवाधार, एकाच फटक्यात बारा फौजदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2022 11:28 AM

एमपीएससीच्या एकाच परीक्षेतून जिल्ह्यातून तब्बल १२ तरुण एकाच फटक्यात फौजदार झाले आहेत. एकाचवेळी इतक्या मोठ्या प्रमाणात एमपीएससी क्रॅक करण्याची जिल्ह्यातील ही पहिलीच वेळ आहे.

ठळक मुद्देएमपीएससी परीक्षेतून झेपगरिबीवर मात करीत तरुण झाले यशस्वी

यवतमाळ : जिल्ह्यात एकीकडे नोकऱ्यांचा दुष्काळ पडलेला असताना दुसरीकडे कष्ट उपसणाऱ्यांचा सुकाळ झाला आहे. लाख अडचणी असल्या तरी स्पर्धा परीक्षांमधून यशस्वी होणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून आता तर गुणवंत विद्यार्थ्यांनी धुवाधार बॅटिंग सुरू केली आहे. एमपीएससीच्या एकाच परीक्षेतून जिल्ह्यातून तब्बल १२ तरुण एकाच फटक्यात फौजदार झाले आहेत. एकाचवेळी इतक्या मोठ्या प्रमाणात एमपीएससी क्रॅक करण्याची जिल्ह्यातील ही पहिलीच वेळ आहे.

महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत २०१९ मध्ये पोलीस उपनिरीक्षक गट ब या पदासाठी परीक्षा घेण्यात आली होती. कोविडमुळे परीक्षेचा निकाल येण्यास तब्बल अडीच वर्षांचा विलंब लागला; मात्र देर आए दुरूस्त आए या उक्तीप्रमाणे आता जाहीर झालेल्या निकालात राज्यातील ४९४ उमेदवारांसह जिल्ह्यातील १२ तरुणांनी यश मिळविले आहे.

जिल्ह्यातील एमपीएससी उत्तीर्ण झालेले हे बाराही तरुण अत्यंत गरीब कुटुंबातील आहेत. शिवाय जिल्ह्यात यवतमाळ शहर वगळता स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी कुठेही अनुकूल वातावरण नाही. अभ्यासिका नाही. हवे ते पुस्तक तातडीने मिळण्याची सोय नाही. या अडचणी असतानाच या बारा विद्यार्थ्यांना चक्क उदरभरणाचीही व्यवस्था स्वत:च करण्याची परिस्थिती होती; मात्र अशाही अवस्थेत त्यांनी परीक्षेची सलग तीन-चार वर्षे तयारी केली. मनाचा समतोल राखून परीक्षा दिली. विशेष म्हणजे, परीक्षेच्या निकालाला तब्बल अडीच वर्षांचा विलंब होत असतानाही धीर सोडला नाही. आता या बाराही तरुणांना पोलीस उपनिरीक्षक म्हणून नियुक्ती मिळाली आहे. जिल्ह्यातून एकाचवेळी बारा फौजदार मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे.

हे आहेत नवे बारा फौजदार

संदीप पाटील अंबोडा (आर्णी), सागर भोकरे यवतमाळ, अनिल थोरात मनपूर (आर्णी), निखिल मेश्राम यवतमाळ, अमित बंडगर आर्णी, शंतनू गजभिये दारव्हा, निखिल धोबे पिंपरी कायर (वणी), शुभम शिंदे उमरखेड, विजय नगराळे पांढरकवडा, विकास आडे मोरवाडी (महागाव), पूजा नैताम यवतमाळ, रोहिणी चवरे महागाव या बारा जणांनी एमपीएससी उत्तीर्ण करून फौजदारपद पटकावले आहे.

वीटभट्टीवर मजुरी करत दिली परीक्षा

आर्णी तालुक्यातील मनपूर येथील अनिल थोरात या तरुणाने अत्यंत गरिबीतून हे यश मिळविले आहे. त्याचे आई, वडील आणि भाऊ वीटभट्टीवर मजुरी करून घर चालवितात. स्वत: अनिलनेही वीटभट्टीवर चिखल तुडविण्याचे काम करीत एमपीएससीची तयारी केली. आता मुलगा फौजदार झाल्याचे कळताच अनिलचे वडील बाबाराव, आई बेबीबाई यांच्या आनंदाला पारावार उरला नाही.

टॅग्स :MPSC examएमपीएससी परीक्षाEducationशिक्षणYavatmalयवतमाळ