शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’चे पैसे पोहोचले भावांच्या खात्यात; आणखी एक फ्रॉड, हडपले लाखो रुपये
2
जुन्या सरकारांमुळे महाराष्ट्राचे नुकसान; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मविआवर टीका
3
‘किल्लारी’नंतर ३१ वर्षांत भूकंपाचे तब्बल १२५ धक्के; भूगर्भातून आवाज येण्याचे प्रमाणही वाढले 
4
‘मन की बात’ म्हणजे देवदर्शन; पंतप्रधान नरेंद्र मोदी; देशातील लोक सकारात्मक माहितीसाठी भुकेले 
5
भारतीय महिलांचा परदेशात होतोय हुंड्यासाठी छळ; पती होतोय गायब
6
यूपीत ११ जिल्ह्यांना पुराचा वेढा; २० लोकांचा मृत्यू, बिहारच्या १३ जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती
7
काेचिंग क्लास चालक तीन भावांचा मुलीवर अत्याचार; तिघांनाही अटक
8
राजू शेट्टी पवईतून ठरले ‘विजयी’; म्हाडाच्या लॉटरीत अभिनेत्री संस्कृती बालगुडे अपात्र
9
अखेर हसन नसरल्लाहचा मृतदेह सापडला; शरीरावर एकही जखम नाही, मृत्यू कसा झाला?
10
"सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सोमवारी मिळणार अनुदानाची रक्कम’’, अजित पवार यांची घोषणा  
11
विधानसभा निवडणूक लढवलेला नेता निघाला कार चोरी करणाऱ्या टोळीचा सदस्य, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
12
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तातडीने गुन्हा दाखल करा'; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल
13
इस्राइलने असा केला हिजबुल्लाहच्या टॉप लीडरशिपचा खात्मा, पाहा कधी आणि कुठे केला गेम?
14
‘किल्लारी’च्या आठवणी: तीन दशकानंतरही ‘भय इथले संपत नाही’! ३१ वर्षांत भूकंपाचे बसले १२५ धक्के...
15
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
16
"नवीन आयुष्य मिळालं", भीषण अपघातानंतर मुशीर खानची पहिली प्रतिक्रिया; वडिलांनी मानले आभार
17
धक्कादायक! स्वतःशी लग्न करून इन्फ्लुएंसर झाली व्हायरल, आता वयाच्या २६ व्या वर्षी केली आत्महत्या
18
Fab Four मध्ये किंग कोहली तळाला; केन विलियम्सन ओव्हरटेक करुन गेला पुढे; पण...
19
"मोजक्याच क्रिकेटपटूंना ते जमले आहे", रोहित रेकॉर्डच्या उंबरठ्यावर; फिटनेसच्या प्रश्नावर सोडलं मौन
20
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या

प्रत्येक रविवार दोन तास निसर्गासाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 4:40 AM

पांढरकवडा : निसर्ग मित्रमंडळातर्फे मागील अनेक वर्षापासून ‘दर रविवारी दोन दोन तास निसर्गासाठी’ हा उपक्रम सुरू ...

पांढरकवडा : निसर्ग मित्रमंडळातर्फे मागील अनेक वर्षापासून ‘दर रविवारी दोन दोन तास निसर्गासाठी’ हा उपक्रम सुरू आहे.

या उपक्रमाअंतर्गत वनविभागाने लावलेल्या झाडांची काळजी घेणे, त्यांना पाणी देणे, निंदन-खुरपण करणे आदी कामे प्रत्येक रविवारी न चुकता केली जातात. आतापर्यंत १४० रविवार अखंडपणे हा उपक्रम श्रीकृष्ण टेकडी येथील वन उद्यानात सुरू आहे. वनविभाग आणि निसर्ग मित्रमंडळातर्फे लावण्यात आलेल्या या झाडांना पाणी देणे, त्याची साफसफाई करणे, फांद्यांची कटाई करणे या प्रकारचे कार्य केले जात आहे. त्याचप्रमाणे दर रविवारी वेगवेगळ्या प्रकारची झाडेसुध्दा लावली जातात. टेकडी परिसरात मागील काही आठवड्यात लावण्यात आलेल्या झाडांच्या मुळाजवळ मोठ्या प्रमाणात वाढलेले गवत रविवारी साफ करण्यात आले. निसर्ग मित्रमंडळातर्फे दरवर्षी रक्षाबंधनाच्या दिवशी राख्या बांधून वृक्षसंवर्धन करण्याचे आवाहन करून वृक्षसंवर्धन केल्या जात आहे. मागील १० वर्षापासून हा उपक्रम अखंडपणे राबविला जात आहे. निसर्ग मित्रमंडळातर्फे आतापर्यंत वेगवेगळ्या प्रकारची १४० फुलझाडे, फळझाडे, औषधी वनस्पती, धार्मिक महत्त्व असणारी झाडे आणि वेलवर्गीय तसेच वड, पिंपळ, कडुलिंब अशी मोठी वाढ होणारी झाडे लावण्यात आलेली आहेत. पर्यावरणाचे संतुलन राखणे आवश्यक असून त्यादृष्टीने निसर्ग मित्रमंडळाचा हा उपक्रम अत्यंत स्तुत्य उपक्रम असल्याची प्रतिक्रिया निसर्गप्रेमींकडून व्यक्त केल्या जात आहे. निसर्ग मित्रमंडळाचे अध्यक्ष सुबोध काळबांडे, स्वप्नील बोमेनवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी राबविलेल्या या उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले आहे.