शहरं
Join us  
Trending Stories
1
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तातडीने गुन्हा दाखल करा'; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल
2
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
3
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या
4
'प्रत्येक घरातून हिजबुल्ला निघणार', जम्मू-काश्मीरमध्ये उमटले नसरुल्लाहच्या मृत्यूचे पडसाद
5
भाजपा नेत्याच्या मुलानं उचललं टोकाचं पाऊल, संपवलं जीवन, या राज्यात खळबळ
6
AI चा गैरवापर! विद्यार्थ्यांनी अश्लील फोटो व्हायरल केले; महिला शिक्षिका नैराश्याच्या छायेत, FIR दाखल
7
तामिळनाडू कॅबिनेटमध्ये फेरबदल; सीएम स्टॅलिन यांनी स्वतःच्या मुलाला उप-मुख्यमंत्री केले
8
“शरद पवारांचे संकेत, पण मंत्रीपदासाठी रोहित पवारांची योग्यता आहे का?”; अजितदादा गटाचा पलटवार
9
“१५-२० नोव्हेंबर दरम्यान मतदान होईल, निवडणूक आयोग...”; शरद पवारांनी व्यक्त केला अंदाज
10
WTC Final Race : दोघांत तिसरा सीन! भारत-ऑस्ट्रेलियाला फाइट देतीये लंकेची टीम
11
बाबा राम रहिमने पुन्हा मागितला २० दिवसांचा पॅरोल, हरियाणा विधानसभा निवडणुकीवर होणार परिणाम   
12
युवीने सांगितला जुना किस्सा! चाहत्यांनी फटकारले; दीपिकाची बदनामी केल्याचा आरोप, काय आहे प्रकरण?
13
तरुणांसाठी खुशखबर! महिन्याला मिळणार ५ हजार रुपये, केंद्र सरकारने केली मोठी घोषणा
14
झेड प्लस सुरक्षा नाकारून एकनाथ शिंदेंना शहीद करायचे होते; संजय शिरसाटांचा रोख कुणाकडे?
15
काचेच्या कारखान्यात माल उतरवताना काचा फुटल्याने अपघात; ४ कामगारांचा मृत्यू, येवलेवाडीतील घटना
16
ठाकरे सेनेच्या 'विजयी धमाक्या'ने शिंदेसेनेत खळबळ; 'सिनेट' निकालाने 'आदित्य ब्रिगेड'ला बळ, मुंबईत देणार धक्का?
17
अयोध्येतील पराभवावर गृहमंत्री अमित शाह पहिल्यांदाच बोलले, हरियाणात केलं मोठं विधान
18
PAK vs ENG : इंग्लंडचा पाकिस्तान दौरा! पण आधीच मोहम्मद युसूफचा राजीनामा; कारणही सांगितलं
19
IND vs BAN : यंत्रणेअभावी मैदान सुकेना! मग नेटकऱ्यांनी जपला BCCI च्या ट्रोलिंगचा 'मंत्र'
20
भाषण देताना मल्लिकार्जुन खरगे व्यासपीठावर बेशुद्ध पडले; म्हणाले, "मी ८३ वर्षांचा आहे, मोदींना सत्तेवरून..."

मारेगाव तालुक्यात अनधिकृत वीज कनेक्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 03, 2022 5:00 AM

मारेगाव तालुक्यात लाखाच्यावर घरगुती वीज जोडणी असून तीन हजार कृषी पंपाच्या वीज जोडण्या आहेत. या दोन्ही  वीज जोडणीची देयके थकलेली आहेत. लॉकडाऊनच्या काळात वीज बिल माफ होण्याच्या आशेने अनेक ग्राहकांनी देयकाचा भरणा केला नाही. नंतर एकाच वेळेस ग्राहकांना मोठ्या रकमेचे देयके प्राप्त झाल्याने मजूरदार व सर्वसामान्य ग्राहक या देयकाचा भरणा करू शकली नाही. त्यामुळे वीज वितरणने थकीत ग्राहकांची वीज खंडित केली. परंतु विजेच्या प्रकाशात राहायची सवय पडलेल्या या ग्राहकांनी आकोडे टाकून वीज जोडणी केली.

लोकमत न्यूज नेटवर्कमारेगाव : वीज कंपनीकडून वारेमाप येणारी वीज देयके आणि लॉकडाऊनमध्ये वीज बिल माफीच्या आशेने थकलेली देयके, यामुळे अनेक वीज ग्राहकांकडे थकबाकी वाढली. सूचना देऊनही ग्राहक बिलाचा भरणा करीत नसल्याने वितरण कंपनीने अनेकांचा वीज पुरवठा खंडित केला. परिणामी विजेच्या प्रकाशात राहायची सवय पडलेल्या नागरिकांनी आता आकोडे टाकून वीज जोडण्या सुरू केल्याचे चित्र तालुक्यात आहे. तसेच कृषी पंपाच्या जोडण्याही अनधिकृत असल्याची माहिती समोर येत आहे.मारेगाव तालुक्यात लाखाच्यावर घरगुती वीज जोडणी असून तीन हजार कृषी पंपाच्या वीज जोडण्या आहेत. या दोन्ही  वीज जोडणीची देयके थकलेली आहेत. लॉकडाऊनच्या काळात वीज बिल माफ होण्याच्या आशेने अनेक ग्राहकांनी देयकाचा भरणा केला नाही. नंतर एकाच वेळेस ग्राहकांना मोठ्या रकमेचे देयके प्राप्त झाल्याने मजूरदार व सर्वसामान्य ग्राहक या देयकाचा भरणा करू शकली नाही. त्यामुळे वीज वितरणने थकीत ग्राहकांची वीज खंडित केली. परंतु विजेच्या प्रकाशात राहायची सवय पडलेल्या या ग्राहकांनी आकोडे टाकून वीज जोडणी केली. आज ग्रामीण भागात आकोडे टाकून वीज चोरी होत असल्याचे प्रमाण खूप वाढले आहे. काही वर्षांपूर्वी रात्री आकोडे टाकून वीज चोरी व्हायची. आता तर दिवस-रात्र अनधिकृत आकोडे टाकून वीज चोरी होत आहे. वीज वितरणचे कर्मचारी चिरीमिरी घेऊन या प्रकाराकडे डोळेझाक करीत आहे. याचा भुर्दंड सर्वसामान्य ग्राहकांना बसत आहे, तर दुसरीकडे कृषी पंपाच्या वीज जोडण्यातही मोठा घोळ आहे. अनेक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये कृषी पंपाच्या जोडण्या आहेत. परंतु जोडण्या केल्या तेव्हापासून  या शेतकऱ्यांना देयकेच पाठविली गेली नाहीत. विशेष म्हणजे बऱ्याच कृषी पंप जोडणीची कार्यालयात नोंदच नाही. अनेक कृषी पंप ग्राहकांची नावे कार्यालयातून गायब आहेत. तालुक्यात विजेची मोठ्या प्रमाणात चोरी सुरू असताना महावितरण कंपनीकडून साधी चौकशीही होताना दिसत नाही. गेल्या अनेक वर्षात चोरीच्या कार्यवाहीचा आकडा नगण्य आहे. अनेकांचे मीटर बंद आहे. त्यामुळे वीज चोरी करणाने बिनधास्त झाले आहेत. 

१०५ गावांसाठी केवळ दोनच लाईनमन - तालुक्यात १०५ गावे आहेत. या १०५ गावासाठी केवळ दोन लाईनमन आहे. तर एका हेल्परकडे १५ ते २० गावाचा भार आहे. त्यामुळे वीज बिघाड व थकीत वसुली ही दोन कामेच ही मंडळी करीत असतात. आकोडे टाकून होणाऱ्या वीज चोरीची हेल्परला पूर्ण कल्पना असून चिरीमिरी घेऊन हा प्रकार सुरू आहे. त्यामुळे अनेकांच्या घरातील प्रकाशाला आकोड्याचा आधार मिळाल्याचे चित्र आहे. 

 

टॅग्स :electricityवीज