शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे तर व्होट कटिंग मशिन..."; 'परिवर्तन महाशक्ती' तिसऱ्या आघाडीवर संजय राऊत बरसले
2
भाजपाची ऑफर नाकारली, काँग्रेसमध्ये घरवापसी; खतगावकरांचा पुढचा प्लॅन ठरला?
3
Kolkata Doctor Case : "मृत्यूच्या काही तास आधी लेकीशी बोललो होतो..."; डॉक्टरच्या वडिलांनी CBI ला केली 'ही' विनंती
4
वडीगोद्री ते जालना मार्गावर बस - टेम्पोचा भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, १७ जखमी
5
Exclusive: 'युध्रा' मधून साऊथ ब्युटीचं हिंदीत पदार्पण, म्हणाली, "सिनेमात केवळ बाहुली बनून..."
6
अयोध्येत पुन्हा होणार प्राणप्रतिष्ठापना, २२ जानेवारीचा मुहुर्त, तयारीला सुरुवात, नेमकं काय होणार?
7
'बिग बॉसचे पहिले 4 सिझन गाजले नाहीत', केदार शिंदेंच्या वक्तव्यावर मेघा धाडेची लक्षवेधी कमेंट
8
तिरुपती लाडू प्रकरण : पवन कल्याण म्हणाले, "आता सनातन धर्म रक्षण बोर्ड स्थापन करण्याची वेळ आलीय"
9
'या' कंपनीच्या गोल्ड लोन व्यवहारावरील बंदी हटवली; रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय; शेअरमध्ये तुफान तेजी
10
शिवसेना-भाजपा वाद संपेना; आमदार योगेश कदमांविरोधात भाजपा पदाधिकारी संतापले
11
४०० पारचा प्रयत्न फसला; ३७ धावांत ४ विकेट्स! ३७६ धावसंख्येवर आटोपला टीम इंडियाचा पहिला डाव
12
जुना अनुभव फार डेंजर, बॅकअप प्लॅन तयार ठेवलाय; अपक्ष आमदाराचा महायुतीला सूचक इशारा
13
Piccadily Agro Share : ही तर कमालच! १ लाखांचे झाले १ कोटी रुपये, मद्य तयार करणाऱ्या कंपनीकडून गुंतवणूकदारांवर पैशांचा पाऊस
14
आमदार आदित्य ठाकरेंना निमंत्रण; मनसेच्या 'व्हिजन वरळी'त काका-पुतणे एकत्र येणार?
15
Post Office Saving Scheme : Post Office ची सुपरहिट स्कीम! ५ वर्षांपर्यंत दर महिन्याला मिळतील ₹९,२५०; पाहा स्कीमचे फायदे
16
iPhone 16 ची भारतात विक्री सुरू होताच खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड; मुंबई, दिल्लीत लागल्या रांगा  
17
ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच; मुंबईतल्या 'या' ६ जागांवर दोन्ही पक्षांचा दावा
18
मारु का सोडू? संभ्रमात पडल्यामुळं फसला जड्डू! शतकासह 'द्विशतकी' डावही हुकला
19
Aadhaar Card : Aadhaar मध्ये केवळ एकदा करू शकता 'हा' बदल; अनावधानानेही करू नका 'ही' चूक; पुन्हा संधी मिळणार नाही
20
उर्वशी रौतेला क्रिकेटर ऋषभ पंतला करतेय डेट? अभिनेत्री म्हणाली...

बेरोजगार प्रकल्पग्रस्तांना वय उलटूनही नोकरी नाही

By admin | Published: June 23, 2017 1:51 AM

जगण्याचे एकमेव साधन अरुणावतीच्या बुडीत क्षेत्रात गेल्यानंतर प्रकल्पग्रस्त बेरोजगार तरुणांना शासकीय नोकरीची अपेक्षा होती.

अरुणावती प्रकल्प : मजुरीवर करावा लागतो उदरनिर्वाहलोकमत न्यूज नेटवर्कदिग्रस : जगण्याचे एकमेव साधन अरुणावतीच्या बुडीत क्षेत्रात गेल्यानंतर प्रकल्पग्रस्त बेरोजगार तरुणांना शासकीय नोकरीची अपेक्षा होती. परंतु आता नोकरीचे वय उलटून गेले तरी अनेकांना नोकरीच मिळाली नाही. भूमिहीन झालेल्या बेरोजगार तरुणांना मजुरीवर उदरनिर्वाह करावा लागतो.दिग्रस तालुक्यातील सावंगा बु. येथे अरुणावती नदीवर प्रकल्प उभारण्यात आला. जिल्ह्यातील सर्वात मोठा प्रकल्प असून या प्रकल्पाचे पाणलोट क्षेत्र ८९४ चौरस किलोमीटर आहे. १९८० साली कामाला सुरुवात झालेल्या या प्रकल्पाची घळ १९९४ मध्ये भरण्यात आली. १९९५ पासून सिंचन सुरू झाले. या प्रकल्पात ११ गावे बुडित क्षेद्धात गेली. येथील शेतकरी भूमिहीन झाले. त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. प्रकल्पग्रस्त कुटुंबातील व्यक्तीला ज्येष्ठता यादीनुसार वर्ग ३ व ४ मध्ये नोकरी देण्याचे आश्वासन देण्यात आले. नोकरी मिळणार या आशेवर अनेकांनी प्रकल्पाला विनाअट जमिनी दिल्या. परंतु अनेक प्रकल्पग्रस्त बेरोजगार तरुण एजबार झाले आहे. त्यामुळे शासकीय नोकरीची आशाही मावळली आहे. शेती धरणात गेली. रोजगाराचा कोणताही आधार नाही. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांची मुले भूमिहीन होवून रोजमजुरी करताना दिसत आहे. सुरुवातीला या बेरोजगारांना मोठमोठाली आश्वासने देण्यात आली. अनेकांना नोकरीचे स्वप्न दाखविण्यात आले. परंतु अरुणावती प्रकल्पातील प्रकल्पग्रस्त शासकीय नोकरीपासून वंचितच राहिले. नोकरीसाठी शासनाचे दार ठोठावून ही मंडळी आता थकली आहे. आपल्यावरील अन्याय दूर करावा, शासनाला जाग यावी यासाठी प्रकल्पग्रस्त सुशिक्षित बेरोजगार तरुण एकत्र येण्याच्या तयारीत आहे. प्रशासनाकडून टोलवाटोलवीप्रकल्पग्रस्त तरुणांनी नोकरीच्या आशेने आतापर्यंत अनेक कार्यालयांचे उंबरठे झिजविले. परंतु प्रत्येक ठिकाणी टोलवाटोलवी करण्यात आली. अनेकांनी तर नोकरीसाठी अर्ज करणेही आता बंद केले आहे. नोकरी मिळत नसेल तर आम्ही जगावे कसे, असे तरुण म्हणत आहे.