शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मण हाकेंकडून मद्यप्राशन करून शिविगाळ, मराठा आंदोलकांचा आरोप, पुण्यात तणाव  
2
'दहशतवादाला कुठेही जागा नाही', युद्धाच्या पार्श्वभूमीवर PM मोदींची नेतन्याहूंशी फोनवर चर्चा...
3
"उद्धव ठाकरेंनी आमच्यावर टीका करताना आरसा बघावा", देवेंद्र फडणवीस यांचा टोला
4
बंडखोरी, मुख्यमंत्रिपदावरील दावेदारीसह या ४ मुद्यांनी हरियाणात वाढवलंय भाजपा, काँग्रेसचं टेन्शन
5
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे लाटणाऱ्यांवर काय कारवाई होणार? मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या...
6
"राहुल निरागस, स्वतःला फॅन्टम समजतात; त्यांनी...", हिमंता बिस्वा सरमांची बोचरी टीका
7
आता कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या ईडीच्या निशाण्यावर! MUDA घोटाळ्याप्रकरणी PMLA अंतर्गत FIR दाखल
8
राहुल गांधी ४,५ ऑक्टोबरला महाराष्ट्रात; छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाचे करणार अनावरण
9
Akola: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हरवले आहेत, अकोल्यात कॉग्रेसचे अनोखे आंदोलन
10
"दम असेल तर उद्धव ठाकरेंनी फडणवीसांविरोधात निवडणूक लढावी", फडणवीसांचे निकटवर्तीय जोशींचे आव्हान
11
इलेक्टोरल बाँड खंडणी प्रकरणात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना दिलासा, उच्च न्यायालयाकडून तपासाला स्थगिती
12
विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे उमेदवार कसे निवडले जाणार? पक्षश्रेष्ठींनी ठरवला 'मास्टरप्लॅन'
13
विमान अपहरणानंतर वाटाघाटींसाठी गेलेल्या जसवंत सिंहांच्या लाल सुटकेसमध्ये काय होतं? २५ वर्षांनंतर मुलाने केला मोठा गौप्यस्फोट  
14
अवघ्या २३ धावा, ३ षटकार; तरीही रोहितने केली 'मास्टरब्लास्टर'ची बरोबरी, काय केला पराक्रम?
15
"हा 'पंढरी' कायम चालत राहील आणि...", पॅडी कांबळेची पोस्ट चर्चेत
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी ठाणे जिल्हा दौऱ्यावर; अधिकाऱ्यांनी घेतली पूर्वतयारी आढावा बैठक! 
17
अपक्ष निवडणूक लढवतेय देशातील सर्वात श्रीमंत महिला; मुलगा प्रचारापासून लांब तर सून मैदानात
18
नोकरी सोडून गेलेल्या कर्मचाऱ्याला Google ने परत बोलावले; पगार तब्बल 22,000 कोटी रुपये!
19
युवासेनेच्या आनंदावर विरजण? ‘पिक्चर अभी बाकी है’ म्हणत सिनेट निकालाला हायकोर्टात आव्हान
20
"ब्राह्मणांना मारून योगीं आदित्यनाथ...!"; हे काय बोलून गेले काँग्रेस नेते रणदीप सिंह सुरजेवाला?

दीड हजार हेक्टरवरील मिरचीवर अज्ञात रोग

By admin | Published: January 05, 2016 2:52 AM

वणी उपविभागातील सुमारे दीड हजार हेक्टरवरील मिरची पिकावर अज्ञात रोगाने हल्ला केला असून विविध औषधांच्या फवारण्या

देवेंद्र पोल्हे ल्ल मारेगाववणी उपविभागातील सुमारे दीड हजार हेक्टरवरील मिरची पिकावर अज्ञात रोगाने हल्ला केला असून विविध औषधांच्या फवारण्या करूनही रोग आटोक्यात आला नाही. यामुळे मिरची उत्पादक शेतकरी पुरता हादरला आहे. या रोगाच्या संशोधनासाठी बुधवारी दिल्लीचे कृषितज्ज्ञांचे पथक येणार आहे. वणी उपविभागात कापसाने दगा दिल्यानंतर बहुतांश शेतकरी मिरची लागवडीकडे वळले आहे. मोठ्या प्रमाणात मिरचीची लागवड होत आहे. वणी उपविभागात यावर्षी जवळपास दीड हजार हेक्टरवर लागवड झाली. मिरचीच्या लागवडीला एकरी सव्वा ते दीड लाख खर्च येतो. मात्र उत्पन्नही मोठ्या प्रमाणात मिळत असल्याने शेतकरी या पिकाकडे वळले होते. परंतु यावर्षी मिरचीवर अज्ञात रोगाने जोरदार हल्ला चढविला आहे. चुरड्या सारखा हा रोग असून झाडाची पाने गुंडाळून गेली आहे. त्यामुळे झाडांची वाढ खुंटली आहे. या अज्ञात रोगाच्या नियंत्रणासाठी शेतकऱ्यांनी विविध उपाय योजले. परंतु परिणाम झाला नाही. वणी उपविभागासोबतच लगतच्या चंद्रपूर जिल्ह्यातील मिरचीही अशीच अवस्था आहे. नेमका कोणता रोग मिरचीवर आला याची माहिती व्हावी म्हणून मारेगावचे शेतकरी डॉ.भास्कर महाकुलकर, श्रीनिवास पालमपाटील यांनी भारतीय अनुसंधान कृषी संशोधन संस्था दिल्लीशी संपर्क साधला. मिरचीचे झाड आणि बियाणेही संशोधनासाठी पाठविले. आता वणी विभागातील मिरचीची परिस्थिती जाणून घेण्यासाठी कृषी संशोधन संस्थेचे दिल्ली, पुणे आणि नागपूर येथील पथक ६ व ७ जानेवारीला वणी उपविभागात येणार आहे. तसचे शेतकऱ्यांनी शेतात लावलेल्या मिरचीचे बियाणे बोगस असल्याची तक्रार होत आहे. अनेक कंपन्यांनी सीड प्लॉटच्या नावाखाली शेतकऱ्यांकडून मिरची खरेदी केली आणि त्यापासून बियाणे बनविले त्यामुळेच शेतकऱ्यांना अज्ञात रोग आल्याचे शेतकरी सांगत आहे. आंध्राचे अण्णाही धास्तावले४यवतमाळ जिल्ह्यात आंध्र प्रदेशातील शेतकरी मोठ्या प्रमाणात मिरचीची शेती करतात. मक्त्याने शेती घेऊन मोठ्या प्रमाणात उत्पादनही घेत आहे. परंतु यावर्षी या मिरचीवरही अज्ञात रोगाने आक्रमण केल्याने आंध्र प्रदेशातील अण्णाही चांगलेच धास्तावले आहे.