शहरं
Join us  
Trending Stories
1
सलग दोन स्फोटांनंतर लेबनान 'सावधान'! आता विमान प्रवासात पेजर, वॉकी-टॉकीवर बंदी
2
VIDEO: क्रिकेट मॅचमध्ये तुफान राडा! खेळाडूंमध्ये हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी झाली तुडवातुडवी
3
"हिंदूंसोबत विश्वासघात, देव..."; तिरुपतीच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी प्रकरणावरून भाजपची प्रतिक्रिया
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विदर्भातील स्वागतासाठी भाजपाची जय्यत तयारी, तर काँग्रेसचे १० सवाल
5
सातारा: अल्पवयीन मुलाचा ४ वर्षीय मुलीवर अत्याचार; घराच्या टेरेसवर घडला किळसवाणा प्रकार
6
हातात खराटा अन् स्वच्छतेचा मंत्र... नागपुरात रेल्वे व्यवस्थापकांनी केली स्थानकावर साफसफाई
7
"इस्रायलने लेबनानमध्ये नरसंहार केला, आता परिणाम भोगा"; हिज्बुल्ला प्रमुखाचा इशारा
8
रशियासोबतची मैत्री तोडण्याचं कटकारस्थान...! युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवल्याची खोटी बातमी पसरवली; भारतानं सुनावलं
9
तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी? चंद्राबाबूंनी दिला लॅब रिपोर्टचा हवाला, झाली अशी पुष्टी
10
महायुतीतील ८० टक्के जागावाटप निश्चित, भाजपची १६० च्या जवळपास जागा लढविण्याची भूमिका
11
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये सामील; विधानसभा निवडणूक लढवणार?
12
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
13
विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले 
14
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
15
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
16
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
17
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
18
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
19
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
20
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश

दारव्हा तालुक्याला अवकाळी पावसाचा तडाखा

By विलास गावंडे | Published: February 27, 2024 9:28 PM

तुरळक गारपीट : ४५० हेक्टर क्षेत्रातील रब्बीचे नुकसान

दारव्हा (यवतमाळ) : अवकाळी पावसासह गारपिटीचा दारव्हा तालुक्यातील ४५० हेक्टर क्षेत्रातील रब्बी पिकांना फटका बसला आहे. ऐन काढणीस आलेल्या गहू, हरभऱ्यासह भाजीपाला व फळझाडांना याचा तडाखा बसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. हवामान कोरडे असताना सोमवारी मध्यरात्री अवकाळी पाऊस आणि काही ठिकाणी तुरळक गारपीट झाली.

गहू, हरभरा, टरबूज, खरबूज यासह भाजीपाला पिकांचे नुकसान झाले. महसूल व कृषी विभागाच्या प्राथमिक माहितीनुसार खोपडी, चोपडी, भांडेगाव, तेलगव्हाण, कुंड, चोरखोपडी, राजीवनगर, वागद बुद्रुक, कुऱ्हाड बुद्रुक, निळोणा, ब्रह्मनाथ, तळेगाव, मांगकिन्ही, कुंभार किन्ही, लोही, रामगाव रामेश्वर, सावंगी रेल्वे, हातोला, माहुली, ब्रह्मी, धामणगाव खुर्द, धामणगाव बुद्रुक, कुऱ्हाड खुर्द, वरुड, कोहळा, बोदेगाव, करजगाव, कोलवाई, मानकी इमामपूर, इस्रामपूर, तरनोळी, नखेगाव, बरबडी, दारव्हा, भोपापूर, बोरगाव, इरथळ, भुलाई, घाटकिन्ही, हनुमान नगर, हातनी, दुधगाव, पिंपळखुटा, वागद, नांदगव्हाण आदी गावांतील पिकांचे नुकसान झाले. तसा प्राथमिक अहवाल कृषी सहायक आणि तलाठ्यांच्या माध्यमातून महसूल विभागाला देण्यात आला आहे. काही ठिकाणी जनावरे जखमी झाल्याची माहिती आहे.

टॅग्स :RainपाऊसYavatmalयवतमाळ