शहरं
Join us  
Trending Stories
1
रामराजेंनी घेतली शरद पवारांची भेट?; रणजीतसिंह निंबाळकरांचा खळबळजनक दावा
2
ज्येष्ठ साहित्यिका प्रा. डॉ. तारा भवाळकर यांची ९८ व्या अ.भा.म. साहित्य संमेलनाध्यक्षपदी निवड
3
अजित पवारांची आघाडी; जनसन्मान यात्रेत विधानसभेसाठी आणखी एका उमेदवाराच्या नावाची घोषणा
4
INDW vs PAKW : रिचा घोषनं घेतला सुपर कॅच; पाक कॅप्टनचा खेळ खल्लास! (VIDEO)
5
"उत्तर गाझा खाली करा", IDF ची वॉर्निंग! इस्रायलकडून लेबनॉनमध्ये मृत्यूचं तांडव, हिजबुल्लाहचा पलटवार
6
Bigg Boss18 च्या प्रीमियरला आले अनिरुद्धाचार्य महाराज, सलमानला भेट दिली भगवद् गीता
7
अमेरिकेतील यशानंतर 'अमूल' आता युरोपमध्ये ठेवणार पाऊल!
8
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यावर 'क्रिकेटचा देव' सचिन तेंडुलकर म्हणतो- "हा सन्मान..."
9
"सरदार पटेलांचा पुतळा पूर्ण झाला पण..."; संभाजीराजे छत्रपतींनी स्पष्टच सांगितलं
10
'इस्रायलने इराणवर हल्ले करावे, पण...', जो बायडेन यांचा बेंजामन नेतन्याहूंना सल्ला
11
धोनी, विराट की रोहित... भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार कोण? 'युनिव्हर्स बॉस' ख्रिस गेलने दिलं उत्तर
12
तिरुपती मंदिराबाबत नवा वाद, प्रसादात सापडले किडे; मंदीर प्रशासनाने दिले स्पष्टीकरण
13
"छत्रपतींच्या स्मारकालाच अडचणी का येतात?", रोहित पवार काय म्हणाले?
14
Gold Investment: दागिने घेण्याऐवजी सोन्यामध्ये 'या' 5 प्रकारे करा गुंतवणूक; मिळेल भरपूर रिटर्न
15
INDW vs PAKW : रेणुकाचा कमालीचा इन-स्विंग चेंडू; पाक बॅटर फक्त बघतच राहिली अन्..
16
संजय राऊतांना पवित्र करण्यासाठी अयोध्याला पाठवू; अब्दुल सत्तारांची बोचरी टीका
17
पाक विरुद्ध हरमनप्रीत कौरनं खेळली 'ही' चाल; या खेळाडूची प्लेइंग इलेव्हनमध्ये एन्ट्री
18
"स्मारकाच्या कामात स्थगिती आणणाऱ्या काँग्रेसच्या वकिलांचाही..."; संभाजीराजे छत्रपतींना फडणवीसांचा सल्ला
19
तिलक वर्मा की नितीश रेड्डी? मयंक यादव की रवी बिश्नोई? आकाश चोप्राने निवडली टीम इंडियाची Playing XI
20
तरुणाच्या आत्महत्येला मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री जबाबदार; मनोज जरांगेंनी काय दिला इशारा?

इचोरात महिलेचा बळी तर घुईत ग्रामसेवकाला कोंडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2018 9:36 PM

यवतमाळ जिल्ह्यात पाणीटंचाईने उग्ररुप धारण केले असून आर्णी तालुक्यातील ईचोरा येथे पाण्यासाठी गेलेल्या महिलेचा विहिरीत पडून मृत्यू झाला. तर नेर तालुक्यातील सोनखास येथे संतप्त गावकऱ्यांनी पाण्यासाठी ग्रामसेवकाला चक्क ग्रामपंचायत कार्यालयातच कोंडले.

ठळक मुद्देजिल्ह्यात पाणी पेटले : थकीत वीज बिलाने कृत्रिम पाणीटंचाई

ऑनलाईन लोकमतआर्णी/सोनखास : यवतमाळ जिल्ह्यात पाणीटंचाईने उग्ररुप धारण केले असून आर्णी तालुक्यातील ईचोरा येथे पाण्यासाठी गेलेल्या महिलेचा विहिरीत पडून मृत्यू झाला. तर नेर तालुक्यातील सोनखास येथे संतप्त गावकऱ्यांनी पाण्यासाठी ग्रामसेवकाला चक्क ग्रामपंचायत कार्यालयातच कोंडले. यावरून जिल्ह्यातील पाणीटंचाईचे भीषण वास्तव पुढे येत आहे.आर्णी तालुक्यात पाणीटंचाईने पेट घेतला आहे. अनेक गावात पाणी असतानाही वीज वितरणने खंडित केलेल्या वीज पुरवठ्याने कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली आहे. या कृत्रिम पाणीटंचाईने महिलेचा बळी घेतला. इचोरा येथील शांताबाई उर्फ शेवंतीबाई डोमा पवार (५०) या महिलेचा बुधवारी पहाटे ५ वाजता गावानजीकच्या शिवारातील विहिरीत पडून मृत्यू झाला. इचोरा येथील ग्रामपंचायतीकडे वीज वितरणचे सात लाख रुपये थकीत आहे. त्यामुळे दहा दिवसापूर्वी या गावातील पाणीपुरवठा योजनेचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता. त्यामुळे गावात कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली. सर्व कामधंदे सोडून नागरिक शेतशिवारातून पाणी आणत आहे. अशाच बुधवारी पहाटे ५ वाजता शांताबाई पवार स्मशानभूमीजवळील विहिरीवर पाणी आणण्यासाठी गेली. पहाटेची वेळ असल्याने ती एकटीच पाणी भरत होती. त्यावेळी तिचा तोल गेला असावा आणि ती दोर-बादलीसह विहिरीत पडली. सकाळी ७ वाजताच्या सुमारास विहिरीच्या काठावर काही नागरिकांना रिकामा गुंड दिसला. परंतु तेथे कुणीच नव्हते. त्यामुळे विहिरीत डोकावून बघितले असता एक महिला विहिरीत पडल्याचे लक्षात आले. त्यानंतर गावकऱ्यांनी धाव घेतली. तेव्हा शांताबाई पवार यांचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याचे पुढे आले.इचोरा गावात भरपूर पाणी आहे. परंतु नियोजनाअभावी गावात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. याबाबत सरपंच संदीप वंजारे यांना विचारले असता कर वसुली नसल्यामुळे आम्ही बिल भरु शकलो नाही. ग्रामसेवकही गावात येत नसल्याने ही परिस्थिती ओढवल्याचे त्यांनी सांगितले. गटविकास अधिकारी सी.जी. चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, १४ व्या वित्त आयोगातून पूर्वी पैसे वापरण्याची तरतूद होती. परंतु आता शासनाने नियम बदलविले आहे. यातून रक्कम वळविता येत नसल्याचे सांगितले.नेर तालुक्यातही पाणीटंचाई उग्र झाली आहे. गावागावात पाण्यासाठी नागरिक संतप्त आहे. घुई येथेही महिनाभरापासून नागरिक पाणीटंचाईचा सामना करीत आहे. ग्रामसेवक कोणत्याही उपाययोजना करीत नाही. दरम्यान बुधवारी सकाळी १२ वाजता ग्रामसेवक मनोहर मालखेडे १५ दिवसानंतर गावात आले. गावकऱ्यांनी पाण्याचा प्रश्न त्यांच्यापुढे मांडण्याचा प्रयत्न केला. परंतु ग्रामसेवकाने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी ग्रामसेवकाला चक्क ग्रामपंचायत कार्यालयातच कोंडले. त्यानंतर या घटनेची माहिती लाडखेड पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तासाभराने ग्रामसेवकाची सुटका केली. महिलांनीही या ग्रामसेवकाला चांगलेच धारेवर धरले. दरम्यान विस्तार अधिकारी आर.डी. डाबरे यांनी गावाला भेट दिली. यावेळी सरपंच अरुणा आडे व उपसरपंच नरेश राठोड उपस्थित होते.आर्णी पंचायत समिती सभापतींचेच गाव तहानलेलेआर्णी पंचायत समितीचे सभापती सूर्यकांत शंकरलाल जाधव हे तालुक्यातील इचोरा गावचे रहिवासी आहे. संपूर्ण पंचायत समितीचा कारभार पाहणाऱ्या सभापतीच्याच गावात कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली. त्यामुळे एका महिलेचा बळी गेला. असे किती बळी जाणार असे म्हणत इचोरा येथील नागरिकांनी बुधवारी संताप व्यक्त केला.

टॅग्स :Waterपाणी