शहरं
Join us  
Trending Stories
1
 "महायुती सरकार म्हणजे भ्रष्ट कारभार, जाहिराती जोरदार", 90 कोटींच्या कंत्राटावर जयंत पाटलांची संतप्त पोस्ट
2
राहुल गांधींनी मानले सर्व कार्यकर्त्यांचे आभार; हरयाणातील पराभवावर दिली प्रतिक्रिया, म्हणाले...
3
हरयाणात 14 जागांवर काँग्रेसचा निसटचा पराभव; आम आदमी पक्षामुळे गमावल्या 5 जागा
4
"बाप-बेटे हल्ली दारोदारी फिरतात, दारावर टक-टक करुन..."; आशिष शेलारांचे ठाकरे पिता-पुत्रांवर टीका
5
हरयाणा निकालामुळे भाजपाचं कमबॅक, मविआत संघर्ष; ठाकरेंचेही सूर बदलले, पडद्यामागचं राजकारण?
6
माधुरी की विद्या? नक्की कोण आहे मंजुलिका? कार्तिक आर्यनच्या 'भूल भुलैय्या ३' चा ट्रेलर रिलीज
7
प्रकाश आंबेडकरांनी विधानसभेसाठी दहा उमेदवारांची केली घोषणा; दुसऱ्या यादीत कोणाची नावे?
8
कर्मचाऱ्यांसाठी ESIC बाबत महत्त्वाची बातमी, सरकारचा मोठा निर्णय, अनेकांना मिळणार लाभ!
9
जम्मू-काश्मिरमध्ये इंडिया आघाडीचे अवघे दोन हिंदू उमेदवार जिंकले, कोण आहेत ते? एकाने नोंदवला धक्कादायक निकाल  
10
Gold Silver Rate Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, एकाच दिवसात चांदी ₹२१२२ स्वस्त; Gold किती घसरलं?
11
₹६७ च्या शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या; ८ टक्क्यांची तेजी, एक घोषणा आणि स्टॉक सुस्साट
12
हरयाणातील गोहानाच्या जिलेबीची 'तारीफ' राहुल गांधींना महागात पडली! काय म्हणाला दुकानदार?
13
वकिलांकडून भाजपच्या आमदाराला पोलिसांसमोरच मारहाण; अर्बन बँक निवडणुकीतला प्रकार
14
मुंबईतील हिंदी बहुल १२ मतदारसंघात परप्रांतीय उमेदवाराला प्राधान्य द्या; मविआला पत्र
15
"काँग्रेसच जिंकणार असं दाखवलं जात होतं...", हरयाणा निवडणुकीवर द ग्रेट खलीची प्रतिक्रिया
16
बापरे! होणारा नवरा सतत करायचा कॉल; मुलीने ब्लॉक करताच 'त्याने' केलं असं काही...
17
गुरु-शुक्र समसप्तक योग: ७ राशींना दसरा शुभ, मालामाल व्हाल; दिवाळीला धनलक्ष्मी प्रसन्न होईल!
18
5 लाखातून उभे केले 7000 कोटींचे साम्राज्य! Phanindra Sama चे स्टार्टअप काय?
19
SIP मध्ये मिळतात असे ७ फीचर्स जे दुसऱ्या स्कीम्समध्ये मिळत नाहीत, गुंतवणूकीपूर्वी जाणून घ्या
20
भारतासाठी 'करो वा मरो'चा सामना; 'कॅप्टन' हरमनप्रीत आज खेळणार? स्मृती मंधानाने दिली अपडेट

२०० कोटी पीक कर्ज होणार माफ

By admin | Published: June 27, 2017 1:23 AM

राज्य शासनाने घोषित केलेल्या कर्जमाफीचा लाभ थकबाकीदार शेतकऱ्यांसोबतच कर्जाचे पुनर्गठन झालेल्या शेतकऱ्यांंना मिळणार आहे.

पुनर्गठन : ५६ हजार शेतकरी लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : राज्य शासनाने घोषित केलेल्या कर्जमाफीचा लाभ थकबाकीदार शेतकऱ्यांसोबतच कर्जाचे पुनर्गठन झालेल्या शेतकऱ्यांंना मिळणार आहे. जिल्ह्यात २०० कोटींच्या पीक कर्जाचे पुनर्गठन करण्यात आले असून याचा ५६ हजार शेतकऱ्यांना लाभ होणार आहे.जिल्हा मध्यवर्ती बँक, राष्ट्रीयकृत बँक आणि ग्रामीण बँकेने शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठन केले होते. पुनर्गठित कर्जाची पाच वर्षात टप्प्याटप्प्याने परतफेड करायची होती. हप्ते पाडलेल्या कर्जाची अनेक शेतकऱ्यांना परतफेड करता आली नाही. त्यामुळे पुनर्गठनानंतरही शेतकरी अडचणीत सापडले होते. यातून मार्ग काढण्यासाठी दुसऱ्यांदा पुनर्गठन करण्यात आले. मात्र दुष्काळी स्थितीने ही तोकडी उपाययोजनाही निकामी झाली. यामुळे कर्जाचे पुनर्गठन करण्यात आलेले शेतकरी अडचणीत सापडले होते. राज्य शासनाच्या कर्जमाफी घोषणेत कर्जाची पुनर्गठन करण्यात आलेले शेतकरी कर्जमाफीस पात्र ठरणार असल्याचा उल्लेख मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत केला आहे. त्यामुळे कर्जाचे पुनर्गठन करण्यात आलेले शेतकरी मदतीस पात्र ठरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या ५६ हजार शेतकऱ्यांना थकीत कर्जाचे पुनर्गठन करण्यात आले आहे. या शेतकऱ्यांकडे २०० कोटी रुपयांचे कर्ज थकीत आहे. या सर्वांना लाभ होणार आहे. राष्ट्रीयकृत बँकांच्या पुनर्गठनाची माहिती मात्र उपलब्ध झाली नाही. जिल्ह्यात कर्जमाफी मिळणाऱ्या शेतकऱ्यांसोबतच आता पुनर्गठन झालेल्या शेतकऱ्यांनाही लाभ मिळेल. अडचणी सुटणार कर्जमाफीनंतर जिल्हा बँकेचा कारभार पूर्वपदावर येण्यास मदत होणार आहे. यामुळे गत अनेक वर्षांपासून बँकेचे सभासद होण्यास इच्छुक असलेल्यांना कर्जमाफीनंतर बँकेचे नवीन सभासद होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.