शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगे पाटील मुख्यमंत्रिपदाचा चेहरा?; तिसऱ्या आघाडीचे राजरत्न आंबेडकरांचं विधान
2
Maharashtra Politics : '२०२९ मध्ये भाजपाचे सरकार येणार', शाहांचं विधान; अजित पवार, एकनाथ शिंदे, जयंत पाटील काय म्हणाले?
3
संपादकीय: बिऱ्हाड गोमातेच्या पाठीवर..
4
Iran Israel संघर्षाचा भारतीयांनाही बसणार फटका! कच्च्या तेलाच्या किंमतीचा भडका 
5
पुण्यात हेलिकॉप्टर कोसळून तिघांचा मृत्यू; बावधनमधील रिसॉर्टवरुन केलं होतं उड्डाण
6
"हिचं तोंड काळं करा...", तृप्ती डिमरीवर भडकल्या महिला, पोस्टरवर काळं फासलं; प्रकरण काय?
7
Post Officeची भन्नाट स्कीम, ५ वर्ष महिन्याला मिळतील ₹९,२५०; पुढेही कमाई हवी असेल तर काय कराल?
8
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी केंद्र सरकारकडून मिळणार १४९२ कोटी निधी
9
देवानेच अद्दल घडवली! आधी मूर्ती चोरली, चार दिवसांनी पुन्हा परत केली; चिठ्ठी लिहून माफी मागितली
10
"तुम्हाला किंमत चुकवावी लागेल", नेतन्याहूंचा इशारा; इराण म्हणाले, "प्रत्युत्तर दिलं तर..."
11
यावेळी महायुतीचे अन् २९ मध्ये भाजपचे स्वबळावर सरकार; अमित शाहंच्या वक्तव्याने अजित पवार, शिंदे गटात खळबळ 
12
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आजचा दिवस आर्थिक व व्यावसायिक दृष्टया लाभदायक
13
मविआचे जागावाटप होणार दसऱ्याला; सलग दोन दिवस बैठका
14
बदलापूर लैंगिक अत्याचार : फरार संस्था चालकांना अद्याप अटक का नाही? उच्च न्यायालयाचे एसआयटीवर ताशेरे
15
विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात भाजपच्या अनेक उमेदवारांचे पर्याय लिफाफाबंद; कुठे कुठे मतदान
16
आयोगाच्या अल्टिमेटमनंतरही मुंबईतील १३० पोलिस अधिकाऱ्यांच्या बदलीस गृहविभागाचा नकार
17
मायदेशात सलग १८वा मालिका विजय; भारताने बांगलादेशला दिला व्हाइटवॉश
18
सहलीला जाताना बस पेटली; २५ विद्यार्थी, शिक्षकांचा मृत्यू
19
बनावट सुप्रीम काेर्टात सुनावणी, उद्याेजकाला घातला सात काेटींचा गंडा 
20
गुंतवणूकदार झाले तरुण; ४०% अवघे तिशीतलेच

युवाशक्तीची भांबरखेडात जलक्रांती

By admin | Published: January 05, 2017 12:27 AM

युवा शक्तीचा विधायक कामांसाठी उपयोग केल्यास काय प्रत्यय येतो, याचा अनुभव तालुक्यातील भांबरखेडा येथील गावकऱ्यांना आला आहे.

रासेयोचा पुढाकार : मिलिंद महाविद्यालयाचे विद्यार्थी, बंधाऱ्यात तीन महिने पुरेल एवढा साठा उमरखेड : युवा शक्तीचा विधायक कामांसाठी उपयोग केल्यास काय प्रत्यय येतो, याचा अनुभव तालुक्यातील भांबरखेडा येथील गावकऱ्यांना आला आहे. मिलिंद महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना पथकाच्या विद्यार्थ्यांनी बांधलेल्या बंधाऱ्यामुळे गावात जलक्रांती झाली. भांबरखेडा हे गाव उमरखेड तालुक्याच्या शेवटच्या टोकावर आहे. या गावाजवळून एक नाला वाहतो. परंतु पावसाळ्यात पाणी वाहून जाते. त्यामुळे उन्हाळ्यात पाणीटंचाईची तीव्रता निर्माण होते. याच गावात मिलिंद महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना पथकाचे शिबिर घेतले जाते. तीन वर्षांपूर्वी कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.अनिल काळबांडे यांच्या मार्गदर्शनात सिमेंट पोते बंधारा बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. युवा शक्तीने बघता-बघता २० फूट लांब, सहा फूट उंच, चार फूट रुंद साधारणत: ८०० पोत्यांचा हा बंधारा बांधला. आता या बंधाऱ्यात पाणी साचले आहे. गत तीन वर्षांपासून या बंधाऱ्यात पाणी साचलत असल्याने लाखो लिटर पाणी गावकऱ्यांच्या उपयोगात येत आहे. यासाठी शेतकरी संतोष देशमुख, संतोष जोगदंडे, दीपक धर्माधिकारी, ग्रामविकास अधिकारी विजय कांबळे, प्राचार्य खेमधम्मो यांनी सहकार्य केले. आता या बंधाऱ्यात सुमारे साडेपाच लाख लिटर पाणी साठले असून तीन महिने हा पाणीसाठा कमी होणार नाही. रासेयोचे स्वयंसेवक विजय कांबळे, श्याम पाटे, सिद्धांत कांबळे, धम्मदिना ढोले, समता मनवर, प्रियंका ढोले, संगेश कांबळे, राजकिरण खडसे, अरविंद मनवर, संतोष जगदंड, दिव्या गव्हाणे, विद्या मनवर यांनी परिश्रम घेतले. (शहर प्रतिनिधी)