शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूच्या उपमुख्यमंत्रीपदी उदयनिधी स्टॅलिन, मंत्रिमंडळात मोठे फेरबदल
2
Team India Announced, IND vs BAN T20 Series: भारताचा संघ जाहीर! बांगलादेशविरूद्ध २ IPL स्टार्स संघात, आणखी एकाचं ३ वर्षाने 'कमबॅक'
3
मेहबूबा मुफ्ती यांनी नसराल्लाहला म्हटलं शहीद; उद्याच्या सर्व निवडणूक सभा केल्या रद्द!
4
"श्रीलंकेतून ३७ तमिळ मच्छिमारांची सुटका करावी", राहुल गांधींचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना पत्र
5
"सर्व मुस्लिम देशांनी एकत्र येऊन इस्रायलशी लढावं", इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांचं आवाहन 
6
बांगलादेशी फॅनचा 'पर्दाफाश'! ५ वर्षांसाठी भारतात येण्यावर बंदी येण्याची शक्यता, प्रकरण काय?
7
"रस्त्यावर हरे कृष्ण-हरे राम करताना दिसतील..."; श्रीकृष्ण जन्मभूमीचा उल्लेख करत काय म्हणाले CM योगी?
8
सौंदर्याचा 'सन्मान'... समंथाला मिळाला विशेष पुरस्कार, सोहळ्यातील 'हॉट लूक'वर खिळल्या नजरा
9
"जर मी 3-4 महिने आधी सुटलो असतो तर...", अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
10
अटल सेतूवरील यंत्रणा ITMS प्रणालीसाठी अकार्यक्षम; परिवहन विभागाच्या चाचणीत निष्पन्न
11
जय शाह यांचा ऐतिहासिक निर्णय! IPL खेळणाऱ्यांवर पैशांचा पाऊस; १ फ्रँचायझी १२.६० कोटी देणार
12
अरविंद केजरीवाल कधी मुख्यमंत्री निवासस्थान सोडणार? AAP कडून आली मोठी अपडेट
13
उल्हासनगरमधून शिंदेसेनेच्या राजेंद्र चौधरी यांनी थोपटले दंड; 'मराठी चेहरा' मतदारांना भावणार?
14
“लाडकी बहीण योजनेला स्वार्थी म्हणणे महिलांचा अपमान”; राज ठाकरेंना अजित पवार गटाचे उत्तर
15
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
16
कृषी पुरस्कारांचे उद्या राज्यपालांच्या हस्ते वितरण होणार, धनंजय मुंडेंची माहिती
17
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
18
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
19
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!
20
“लाडकी बहीण नाही, लाडकी खुर्ची योजना, तिघे भाऊ लबाड आहेत”; ठाकरे गटाची खोचक टीका

घाटंजी शहराची भिस्त वाघाडी धरणावर; ५० टक्के पाणी शिल्लक पण वापर जपूनच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 03, 2022 4:26 PM

घाटंजी तालुक्याच्या ग्रामीण भागात काही ठिकाणी पाणीप्रश्न आहे. विविध उपाययोजना करून यावरही मात करण्याचा तालुका प्रशासनाचा प्रयत्न आहे.

विठ्ठल कांबळे

घाटंजी (यवतमाळ) : सूर्य आग ओकतो आहे. अंगाची लाहीलाही होत आहे. याचा जलसाठ्यावरही परिणाम झाला आहे; मात्र पावसाळ्यात भरपूर पाणी झाल्याने गतवर्षीपेक्षा यावेळी पाणीटंचाईची तीव्रता थोडीफार कमी आहे.

घाटंजी शहराला वाघाडी मध्यम प्रकल्पातून पाणी पुरवठा होतो. या प्रकल्पाची साठवण क्षमता ३५.३६ दलघमी आहे. सद्यस्थितीत १७.७४ दलघमी म्हणजे ५० टक्केपेक्षा अधिक पाणीसाठा आहे. घाटंजी शहरासाठी दोन एमएमक्यु दशलक्षघनमीटर पाणी आरक्षित आहे. घाटंजी तहसील ग्रामीणसाठी ४.५० दशलक्ष घनमीटर, यवतमाळ तहसील ग्रामीण पाणी पुरवठ्यासाठी दोन एमएमक्यु दशलक्ष घनमीटर पाणी आरक्षित आहे, तसेच १८किलोमीटरपर्यंत शेतीसाठी पाणी पुरवठा होतो. आतापर्यंत दोन रोटेशन झाले असून, तिसरे रोटेशन शेतीसाठी ४ मे पासून आहे.

वाघाडी धरणातून शहराला जलशुधद्धीकरण केंद्रामार्फत दररोज १७ लाख लीटर पाणी पुरवठा होतो. शहरात २३० हातपंप, २५ विंधन विहिरी, सात सार्वजनिक विहिरीमधून पाणीपुरवठा होतो. तसेच काही भागात एका टँकरव्दारे सार्वजनिक विहिरीत पाणी घेतले जाते. काही भागात दररोज दोन वेळा तर काही भागात एक दिवस आड दोन वेळा पाणी पुरवठा केला जातो. शहरात २३०० नळ कनेक्शन आहेत. पाणीपट्टी थकबाकी ५१लाख रुपयांपैकी २७ लाख रुपये वसुली करण्यात आली.

नामापूर गावाला होतोय टँकरने पाणीपुरवठा

ग्रामीण भागात नामापूर येथे टँकरव्दारा पाणी पुरवठा करण्यात येत आहे. वासरी, देवधरी, येडशी, कोळी बु., सोनखास, विरुळ,कवठा, येडशी, कोळी खु.,ससानी,मांडवा,वाढोणा या १२ गावांसाठी नवीन पाणी पुरवठा योजनेचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. यावर होणाऱ्या निर्णयाकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

विजेच्या लपंडावामुळे पाणीपुरवठ्यात अडचणी

घाटंजी शहरात पाण्याचे अनेक स्रोत आहे. विहिरी, हातपंपाला भरपूर पाणी आहे. त्यामुळे सद्यातरी पाण्याची समस्या नाही. मात्र, इतर काही ठिकाणचा अनुभव पाहता वीज पुरवठा नियमित न राहिल्यास योजनेच्या पाणीपुरवठ्यात अडचणी निर्माण शक्यता नाकारता येत नाही. गर्मी वाढल्याने पाण्याचा वापर वाढला आहे. अशावेळी पाण्याची अडचण निर्माण होऊ नये याकरिता यंत्रणेने आतापासूनच उपाययोजना करण्यात याव्या, अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त करण्यात येत आहे. 

घाटंजी तालुक्याच्या ग्रामीण भागात काही ठिकाणी पाणीप्रश्न आहे. विविध उपाययोजना करून यावरही मात करण्याचा तालुका प्रशासनाचा प्रयत्न आहे. नदी, नाले आटले असल्याने जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे. ही जनावरे घरी आल्यानंतर त्यांना पिण्यासाठी पाणी साठवून ठेवावे लागते.

ग्रामीण भागात विजेचा लपंडाव सुरू आहे. याचा परिणाम पाणीपुरवठ्यावर होत असल्याची ओरड आहे. वारंवार वीज गूल होते. काही ठिकाणी अर्धा तास, तर काही ठिकाणी तासनतास वीज बंद राहते. त्यामुळे पाण्याच्या टाक्या भरण्यात अडचणी निर्माण होतात. अशावेळी पाणीपुरवठा विस्कळीत होतो. यासाठी काही ग्रामपंचायत स्तरावर पाठपुरावाही केला जाणार आहे. विद्युत कंपनीने या प्रश्नाकडे लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.

जलजीवन मिशनमधून अधिकाअधिक कामे घेणार

शहराचा पाणीपुरवठा सुरळीत असून भारनियमनामुळे पाणी पुरवठ्यात व्यत्यय येत आहे. परंतु, काही दिवसातच लोडशेडिंगची समस्या सुटेल व पाणी पुरवठा नियमित सुरू होईल. प्रकल्पात पाणी भरपूर असले तरी नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करावा.

अमोल माळकर, मुख्याधिकारी नगर परिषद, घाटंजी

गतवर्षीपेक्षा यावर्षी प्रस्ताव कमी आले आहेत. या मे महिन्यात कदाचित ते वाढतील. पाणी टंचाई कृती आराखडा व जलजीवन मिशन कृती आराखड्यातून जास्तीत जास्त कामे करून तालुक्यात पाणी टंचाई भासणार नाही, यासाठी प्रयत्न सुरू आहे

सोनाली माडकर, गटविकास अधिकारी, घाटंजी

टॅग्स :Waterपाणीwater scarcityपाणी टंचाई