शहरं
Join us  
Trending Stories
1
"दिवट्या आमदार...", पोर्शे प्रकरणावरून सुनील टिंगरे शरद पवारांच्या 'रडार'वर!
2
"मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामागील सूत्रधार..."; नरेंद्र पाटलांचा गंभीर आरोप
3
मोबाईलमधले फोटो, टोकाचं भांडण, रक्तरंजित प्रेम; महालक्ष्मीच्या हत्येच्या रात्री नेमकं काय घडलं?
4
NCP च्या जागेवर दावा; मुलाच्या उमेदवारीसाठी माजी आमदाराची उद्धव ठाकरेंकडे मागणी
5
एका घरात पाच मृतदेह! चार मुलींसह वडिलांनी संपवलं आयुष्य, कारण...
6
गौतम अदानींना ज्यांनी तारलं, त्यांनाच अमेरिकेत बसला लाखो डॉलर्सचा दंड; कारण काय?
7
IND vs BAN : जा रे जारे पावसा! दुसऱ्या दिवसाचा बहुतांश खेळ पाहण्यात नव्हे पाण्यात जाणार?
8
त्रिग्रही बुधादित्य राजयोग: ७ राशींना अनुकूल, सरकारी कामात लाभ; उत्पन्नात वाढ, मनासारखा काळ!
9
मुंबईत ठाकरेंच्या युवासेनेचा जल्लोष; सिनेट निवडणुकीत पुन्हा एकदा १० पैकी १० विजयी
10
विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात घ्या; शिंदेसेना, अजित पवार गटाची मागणी
11
Today Daily Horoscope आजचे राशीभविष्य: विविध पातळ्यांवर यश, किर्ती व लाभासह धन प्राप्ती होईल
12
'ती माझी मुलगी आहे...', IIFA सोहळ्यावेळी आराध्याबद्दल विचारताच ऐश्वर्याचं पत्रकाराला थेट उत्तर
13
आज शेअर बाजार खुला राहणार, NSE वर होणार विशेष ट्रेडिंग सेशन; कारण काय?
14
Zomatoच्या सह-संस्थापक आकृती चोप्रा यांचा राजीनामा; १३ वर्षाचा प्रवास थांबला, पाहा त्यांची Networth किती?
15
Bigg Boss Marathi Season 5: राखी सावंतची घरात एन्ट्री! 'ड्रामा क्वीन'ला पाहून निक्कीची झाली अशी अवस्था; प्रोमो व्हायरल
16
उद्धव युवासेनेचा अखेर सिनेटवर झेंडा; विद्यापीठाच्या निवडणुकीत अभाविपचा उडाला धुव्वा
17
अग्रलेख : फडणवीसांचा कबुलीनामा; अजित पवारांना सोबत घेतल्यानंतर ‘परिवार’ फारच अस्वस्थ
18
मतदारांची गैरसोय झाल्यास अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई; केंद्रीय निवडणूक आयोगाचा इशारा
19
बहिणींच्या पैशांवर नजर ठेवाल तर खबरदार...; फडणवीस यांचा विरोधकांना इशारा
20
मध्य रेल्वेवर उद्या ५ तासांचा मेगाब्लॉक; तिन्हा मार्गांवरील लोकल धावणार उशिरा

पाणीटंचाईचे संकट गडद

By admin | Published: January 21, 2016 2:21 AM

यंदा झापलेला अपुरा पाऊस आणि आटलेल्या पैनगंगेमुळे उमरखेड तालुक्यात पाणीटंचाईचे संकट गडद झाले आहे.

उमरखेड : यंदा झापलेला अपुरा पाऊस आणि आटलेल्या पैनगंगेमुळे उमरखेड तालुक्यात पाणीटंचाईचे संकट गडद झाले आहे. पैनगंगा नदीतीरावरील गावांमध्ये तर पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ यंदा हिवाळ्यातच आली आहे. इसापूर धरणाचे पाणी पैनगंगेच्या पात्रात सोडण्याची मागणी नदीतीरावरील नागरिक करीत आहे. परंतु अद्यापही प्रशासनाने दखल घेतली नाही.उमरखेड तालुक्याची जीवनदायिनी पैनगंगा नदी यंदा हिवाळ्यातच कोरडी पडली आहे. त्यामुळे नदीतीरावरील सुमारे ४० गावांमध्ये पाणीसंकट निर्माण झाले आहे. या नदीतीरावर अनेक गावच्या नळयोजना आहे. नळयोजनेच्या विहिरींनी तळ गाठला आहे. त्यामुळे विहिरीतच नाही तर टाकीत पाणी कोठून येणार, असा प्रश्न पडला आहे. तसेच भारनियमनही टाकीपर्यंत पाणी पोहोचण्यात अडथळा ठरत आहे. अशा स्थितीत नदी तीरावरील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. नदीतीरावरील नागरिकांसारखीच स्थिती बंदी भागातीलही आहे. अनेक हातपंप नादुरुस्त आहेत. तसेच विहिरींनी तळ गाठला आहे. त्यामुळे या गावातील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते.उमरखेड पंचायत समितीने पाणीटंचाईचा कृती आराखडा तयार केला आहे. त्यात विविध उपाययोजना सुचविण्यात आल्या आहे. मात्र आतापर्यंतचा अनुभव पाहता या उपाययोजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी झाल्याचे दिसत नाही. दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च होत असले तरी नागरिकांना मात्र पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. हा निधी नेमका कशावर खर्च होतो, हाही संशोधनाचा विषय आहे. जलयुक्त शिवारच्या माध्यमातून प्रशासन एकीकडे गावात जलस्त्रोत वाढल्याचे सांगत आहे, तर दुसरीकडे तीच गावे पाणीटंचाईच्या कृती आराखड्यातही दिसत आहे. यामुळे पाणीटंचाई निवारणार्थ येणारा निधी कसा खर्च होतो, हे दिसून येते.उमरखेड तालुक्यातून वाहणाऱ्या पैनगंगा नदीपात्रात इसापूर धरणाचे पाणी सोडले तर मोठ्या प्रमाणात पाणीटंचाईवर मात होवू शकते. परंतु प्रशासन अद्यापही इसापूर धरणाचे पाणी सोडायला तयार नाही. त्यामुळे नागरिक आंदोलनाच्या पावित्र्यात दिसत आहे. उमरखेड तालुक्यातील अनेक गावांमध्ये सध्या पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले आहे. शहरातील काही भागातही पाणीटंचाई जाणवत आहे. जानेवारी महिन्यातच पाणीटंचाईचे संकट घोंगावत असून मार्च, एप्रिल महिन्यात काय होईल, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. विशेष म्हणजे पाणीटंचाई निवारण्यासाठी लोकप्रतिनिधी कोणताही पुढाकार घेताना दिसत नाही. नागरिक आंदोलनाच्या तयारीत असले तरी लोकप्रतिनिधी मात्र त्यावर बोलायला तयार नाही. दरवर्षी पाणीटंचाईचा सामना नागरिकांना करावा लागतो. खास करून नदीतीरावरील नागरिक पाणीटंचाईने हैराण असतात. परंतु त्यांच्यासाठी कायमस्वरूपी योजना केली जात नाही. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घ्यावा आणि उन्हाळ्यातील भीषण पाणीटंचाईवर मात करण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. (शहर प्रतिनिधी)