शहरं
Join us  
Trending Stories
1
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
2
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
3
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
5
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
6
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
7
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
8
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
9
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
10
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
11
अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी
12
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
13
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
14
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
15
आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ
16
सणासुदीच्या तोंडावर तेल महागाईची चाहूल; अनेक जीवनावश्यक वस्तू चढ्या दराने
17
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
18
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
19
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
20
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी

पावसाळ्यातही पाणीटंचाई

By admin | Published: June 24, 2017 12:39 AM

पावसाळा सुरू झाला तरी जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीत शुक्रवारी पाणीटंचाईवरून रान पेटले.

जिल्हा परिषद स्थायी समिती बैठक : घरकुल, शिक्षण, आरोग्यवर घमासान लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : पावसाळा सुरू झाला तरी जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीत शुक्रवारी पाणीटंचाईवरून रान पेटले. किमान पुढीलवर्षी तरी पाणीटंचाई निर्माण होऊ नये म्हणून कायमस्वरूपी योजना राबवाव्या, अशी अपेक्षा सदस्यांनी व्यक्त केली. जिल्हा परिषद अध्यक्ष माधुरी आडे यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समितीची बैठक झाली. यात सुरूवातीलाच राम देवसरकरसह अन्य सदस्यांनी पाणीटंचाईचा मुद्दा उपस्थित केला. विहीर अधिग्रहण, टँकरची संख्या कमी करण्यासाठी आत्तापासूनच प्रयत्न करावे, अशी सूचना त्यांनी केली. महिला व बालकल्याण सभापती अरूणाताई खंडाळकर यांनी पावसाळा लागूनही अद्याप आरो बसले नाही, असा आरोप केला. शिवसेना सदस्यांनी दूषित पाण्यामुळे अतिसाराची लागण झाल्याचा आरोप केला. बैठकीत घरकुल, शौचालय बांधकाम, दलित वस्तीतील कामे आदींवर चर्चा झाली. घरकुलाचे पैसे वेळेवर मिळत नसल्याचा आरोप सदस्यांनी केला. त्यावर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी अद्याप केंद्राचा निधी आला नसल्याचे सांगितले. तूर्तास जिल्हा परिषदेकडे दीड कोटींचा निधी असून त्यातून केवळ बाराशे शौचालयांसाठी पैसे देऊ शकतो, असे स्पष्ट केले. यापुढे रस्ता बांधकामासाठी कंत्राटदाराने आयएसआय, बीबीसीएल, एचपी या कंपन्यांकडून डांबर खरेदी करण्याची अट निविदेत टाकण्याचा ठराव मंजूर झाला. एकाच रस्त्यावर दोन विभागाचे काम जिल्हा परिषद बांधकाम आणि सार्वजनिक बांधकाम या दोन विभागांनी २०१४-१५ मध्ये ६, तर २०१५-१६ मध्ये १२ रस्त्यांच्या दुरूस्तीचे काम केले. हे सर्व रस्ते जिल्हा परिषदेचे आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश अध्यक्ष माधुरी आडे यांनी दिले. ६७ शाळांमधील अंशकालीन शिक्षकांना वेतन देण्याचा मुद्दाही उपस्थित झाला. गुजरी येथील संचमान्यतेचा मुद्दा जया पोटे यांनी उपस्थित केला. कायर येथील अनधिकृत गैरहजर वैद्यकीय अधिकाऱ्याला नोटीस बजावल्याचे आरोग्य अधिकारी डॉ. के. झेड. राठोड यांनी सांगितले. पाटणबोरी येथील दलित वस्तीतील कामे दलित वस्तीत झालीच नसून यात सरपंच, ग्रामसेवक, शाखा अभियंता दोषी आढळल्याचे पंचायत विभागाचे प्रभारी डेप्युटी सीईओ आर. एम. भुयार यांनी सांगितले. तसेच अफरातफरीची तब्बल एक हजाराच्यावर प्रकरणे असल्याचे स्पष्ट केले.