शहरं
Join us  
Trending Stories
1
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
2
भारताला अमेरिका देणार 31 किलर ड्रोन्स; नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांच्यात 'डील डन'
3
'यूपीआय'मध्ये मार्केटमध्ये PhonePe सुसाट! Google Pay, Paytm किती मागे?
4
"आम्ही कुणालाही सोडणार नाही!’’, तिरुपती लाडू भेसळीप्रकरणी आंध्र प्रदेश सरकार आक्रमक   
5
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोनाचा 'हा' नवा व्हेरिएंट किती खतरनाक, भारताला कितपत धोका?
6
"तुम्हाला दुःख झाले नाही का? देशाला सांगा", केजरीवालांचे मोहन भागवतांना पाच सवाल
7
IND vs BAN 1st Test : भारताची विजयी सलामी! अश्विनचा 'षटकार', जड्डूची साथ लाखमोलाची; बांगलादेशचा करेक्ट कार्यक्रम
8
IND vs BAN : "मला कोणी गिफ्ट दिलं नाही...", 'सामनावीर' अश्विनची मिश्किल प्रतिक्रिया, संघाला जिंकवलं
9
'गोळीला गोळीनेच उत्तर देणार; कलम 370 कधीही मागे घेणार नाही', अमित शाहंची गर्जना...
10
ENG vs AUS ODI : मिचेल स्टार्कचा अप्रतिम यॉर्कर! इंग्लंडचा कर्णधार 'चारीमुंड्या चीत', Video
11
पुण्यातील नवीन विमानतळाला 'हे' नाव देण्यासाठी प्रयत्न करणार; गडकरींचं आश्वासन
12
Bengaluru Murder : फ्रीजमध्ये सर्वात खालच्या कप्प्यात होतं शिर, पोलिसांनाही फुटला घाम
13
"वर्षा उसगावकर कोण हे मला माहितच नव्हतं", निक्की पुन्हा बरळली, म्हणाली- "बिग बॉसमध्ये आल्यानंतर..."
14
शाब्बास पोरा! वडिलांसोबत चहा विकला, मोलमजुरी करून उदरनिर्वाह; IAS होऊन रचला इतिहास
15
तु्मच्या खाण्यामध्ये येत नाही ना चरबी असलेलं भेसळयुक्त तूप, ५ मिनिटांत असं तपासून घ्या
16
काँग्रेसच्या बड्या नेत्याला केंद्रीय मंत्र्याने दिली ऑफर, हरियाणात भाजपाने टाकला नवा डाव
17
श्रीगोंदा मतदारसंघातील उमेदवारावरून शरद पवार यांनी संजय राऊतांना सुनावले, म्हणाले...
18
५०० रुपयांची लाच घेणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला ५ वर्षांची शिक्षा; १० वर्षांनी कोर्टाने दिला निकाल
19
IND vs BAN : पहिला सामना जिंकताच BCCI ची मोठी घोषणा; दुसऱ्या कसोटीसाठी भारताचा संघ जाहीर
20
पाकिस्तानी फवाद खानचा 'लिजेंड ऑफ मौला जट' सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही; राज ठाकरेंचा इशारा

पाणीटंचाई उपाययोजना शून्य

By admin | Published: May 17, 2017 12:50 AM

पावसाळा १५ दिवसांवर येऊन ठेपला तरी, पाणीटंचाई उपाययोजना शून्य आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी चौदाव्या वित्त आयोगाच्या

पावसाळा तोंडावर : ४० विहिरी अधिग्रहित, पाच टँकर सुरू लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : पावसाळा १५ दिवसांवर येऊन ठेपला तरी, पाणीटंचाई उपाययोजना शून्य आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीवरून ग्रामपंचायतींना धारेवर धरल्याने उपाययोजनांचे बिंग फुटले. केवळ विहीर अधिग्रहण आणि टँकर सुरू करण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी मंजुरी बहाल केली आहे. उन्हाच्या झळा वाढताच भूजल पातळी खालावली. परिणामी मे महिन्यात पाणीटंचाई तीव्र झाली. टंचाई निवारणार्थ जिल्हा परिषदेने कृती आराखडा सादर केला होता. मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी आधी चौदाव्या वित्त आयोगातील निधीचा हिशेब सादर करण्याचे आदेश देताच या उपाययोजनांची पोलखोल झाली. चौदाव्या वित्त आयोगातून प्राधान्याने पाणी टंचाई निवारणासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची कोणत्याच ग्रामपंचायतींनी घेतली नसल्याचे यातून उघड झाले. चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीचा हिशेब मागिल्याने उपाययोजनांमधील नळ आणि पाणी पुरवठ्याची कामे रखडली. यामुळे आता मे महिन्यात नागरिकांना पाणी टंचाईच्या तीव्र झळा बसत आहेत. दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांनी पाणी टंचाई निवारणासाठी तीन कोटी सात लाख ४० हजार रूपयांच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. मात्र या निधीतून केवळ विहीर अधिग्रहीत करणे आणि टँकर सुरू करण्यासच त्यांनी परवानगी दिली. विशेष नळ योजना दुरूस्ती आणि तात्पुरत्या पूरक नळ योजनांवर निधी खर्च करण्यास मंजूरी नाकारली. नळ योजना विशेष दुरूस्ती आणि तात्पुरत्या पूरक नळ योजनेसाठी तांत्रिक मंजुरीसह प्रशासकीय मान्यता घ्यावी लागते. हे प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी फेटाळले. आता पुन्हा जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाच्या अभियंत्यांनी पंचायतच्या उपमुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांना पत्र लिहून विशेष दुरूस्ती आणि तात्पुरत्या पूरक नळ योजनेच्या कामांसाठी ग्रामपंचायतींना निर्देश देऊन निधी उपलब्ध करून देण्याची गळ घातली आहे. पावसाळा सुरू होण्यास आता जेमतेम १५ दिवसांचा अवधी आहे. त्यामुळे पुढील १५ दिवसांत खरच ही कामे पूर्ण होतील, असा प्रश्न यामुळे निर्माण झाला आहे. आराखड्याला दोन कोटींची कात्री ४पाणीटंचाई निवारणासाठी तीन कोटी सात लाख ४० हजारांचा प्रस्ताव मंजूर झाला. मात्र त्यातील नळ योजनेची विशेष दुरूस्ती व तात्पुरत्या पूरक नळ योजनेच्या एक कोटी ९४ लाख रूपयांच्या खर्चावर बंधन घातले गेले. त्यामुळे हा निधी वाचणार आहे. अत्यावश्यक ठिकाणीच टँकर गेल्यावर्षी जिल्ह्यात ११० टक्के पाऊस झाला. जलयुक्तची कामे झाली. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने अत्यावश्यक ठिकाणीच टँकर सुरू करण्याच्या सूचना दिल्या. परिणामी केवळ चार तालुक्यांनी टँकरचे प्रस्ताव सादर केले. यामुळे आत्तापर्यंत जिल्ह्यात केवळ ४० विहिरी अधिग्रहीत करण्यात आल्या असून केवळ केवळ पाचच टँकर सुरू करण्यात आले आहे.