शहरं
Join us  
Trending Stories
1
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
2
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
3
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
4
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
5
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
6
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
7
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
8
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
9
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
10
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण
11
दिल्लीला मिळाल्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
12
काँग्रेस नेते राजभवनावर, घेतली राज्यपाल राधाकृष्णन यांची भेट; पण नेमके कारण काय?
13
जिंकलंस मित्रा! वकील बनून लढला स्वत:च्या किडनॅपिंगची केस, १७ वर्षांनंतर ८ गुन्हेगारांना शिक्षा
14
ENG vs AUS : WHAT A BALL! स्टीव्ह स्मिथ 'क्लिन बोल्ड', ऑस्ट्रेलियन दिग्गजाचाही विश्वास बसेना
15
"म्यानमारमधून ९०० कुकी अतिरेकी मणिपूरमध्ये घुसले", सुरक्षा सल्लागारांनी दिला दुजोरा, चिंता वाढली
16
58 कर्मचाऱ्यांशी शारीरिक संबंध अन्...! कोण आहे चीनची ही 'सुंदर गव्हर्नर'? ठोठावण्यात आली 13 वर्षांची शिक्षा
17
“ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री हे सूत्र मविआत नाही”; संजय राऊत स्पष्टच बोलले
18
हवाई दल प्रमुखपदी एअर मार्शल अमरप्रीत सिंग यांची नियुक्ती; जाणून घ्या, त्यांच्याविषयी...
19
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
20
भारतात WANTED असलेला फरार इस्लामिक धर्मगुरू झाकिर नाईक पाकिस्तानात 'पाहुणा'

पाणीपुरवठा योजना बारगळली

By admin | Published: August 01, 2016 12:57 AM

विहीत कालावधी उलटून गेल्यावरही पाणीपुरवठा योजनेचे काम नगरपरिषदेने सुरू केले नाही. त्यामुळे उर्वरित अनुदान देणे शक्य नाही.

आर्णी पालिकेला नोटीस : पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने मागितला खुलासा आर्णी : विहीत कालावधी उलटून गेल्यावरही पाणीपुरवठा योजनेचे काम नगरपरिषदेने सुरू केले नाही. त्यामुळे उर्वरित अनुदान देणे शक्य नाही. आता ही पाणीपुरवठा योजनाच रद्द का करण्यात येवू नये, अशी नोटीस नगरपरिषदेला पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने पाठवून खुलासा मागितला आहे. या नोटीसमुळे आर्णीतील महत्त्वाकांक्षी योजना बारगळल्याचे बोलले जात आहे. आर्णी शहरासाठी महाराष्ट्र सुजल निर्माण अभियानांतर्गत नगरपरिषदेच्या भांडवली कामातून पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली होती. १२ डिसेंबर २०१३ च्या आदेशानुसार ४१ कोटी ८१ लाख ४० हजार इतक्या रकमेच्या प्रस्तावाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. शासन निर्णयातील प्रशासकीय मान्यतेच्या आदेशानुसार तीन महिन्यात कामे सुरू न केल्यास सदर पाणीपुरवठा योजनेची प्रशासकीय मान्यता आपोआप रद्द होईल, अशी अट नमूद आहे. सदर अटीनुसार पाणीपुरवठा योजना सुरू करण्याच्या दृष्टीने आर्णी नगरपरिषदेने तातडीने कार्यवाही करणे आवश्यक होते. नगरपरिषदेला एकूण अनुदानापैकी नऊ कोटी इतक्या रकमेचा पहिला हप्ताही शासनाकडून २२ मे २०१५ च्या आदेशानुसार अदा करण्यात आला आहे. तरीसुद्धा अडीच वर्षाचा कालावधी लोटल्यावरही नगरपरिषदेने पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू केलेले नाही. त्यामुळे आपल्या नागरी संस्थेस उर्वरित अनुदान अदा करणे शक्य होणार नाही. नागरी क्षेत्रात विविध योजनेखाली पाणीपुरवठ्याबाबतच्या योजना आता नगरोत्थान महाअभियान, अमृत योजना यासारख्या योजनांमार्फत नगरविकास विभागाकडून राबविण्यात येत आहे. तसेच त्या विभागाने मंजूर केलेल्या योजनेनुसार महाराष्ट्र सुजल निर्माण अभियानांतर्गत आपल्या नागरी संस्थेस २२ मे २०१५ च्या निर्णयानुसार वितरीत करण्यात आलेल्या अनुदानाचे समायोजन करता येईल. ही परिस्थिती विचारात घेता आपल्या नागरी संस्थेस मंजूर करण्यात आलेली पाणीपुरवठा योजना रद्द का करण्यात येवू नये, या बाबत शासनाकडे तत्काळ खुलासा करण्यात यावा, असे पत्र मुख्याधिकाऱ्यांना २८ जुलै रोजी पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे अवर सचिव प्रमोद कानडे यांनी पाठविले आहे. या पत्रामुळे आर्णी नगरपरिषदेचा नाकर्तेपणा उघड झाला आहे. योजना मंजूर झाली. काही प्रमाणात निधीही मिळाला. परंतु काम कोणी करावे, खासगी कंत्राटदार की महाराष्ट्र जीवन प्राधिकरण या भानगडीत योजनेची वाट लागली. सदर योजनेत कोर्टकचेरी सुरू झाली. यातही बराच वेळ निघून गेला. आता केवळ नऊ कोटींवरच समाधान मानावे लागणार आहे. आर्णी नगरपरिषदेचे ३३ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे सदर योजना पूर्णत्वास जाणार की नाही, या बाबत साशंकता निर्माण झाली आहे. (शहर प्रतिनिधी) अखेर ५० हजार लोकसंख्येचा प्रश्न कायमच आर्णी शहरात दोन जुन्या पाण्याच्या टाक्या आहे. इतर भागात विहिरीवरून पाणीपुरवठा होतो. मात्र ही व्यवस्था ५० हजारांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरासाठी पुरेश्ी नाही. शहराची वाढत असलेली व्याप्ती पाहता नवी पाणीपुरवठा योजना अत्यंत आवश्यक आहे. सत्ताधाऱ्यांनी ही बाब गांभीर्याने घेतली नाही. उन्हाळ्यात प्रचंड पाणीटंचाई जाणवली. टँकरची मलमपट्टीदेखील अपुरी ठरली. ४२ कोटी रुपयांच्या योजनेतून आर्णीकरांना दिलासा मिळणार होता. मात्र नाना प्रकारच्या भानगडींमुळे ही योजना बारगळून ५० हजार लोकसंख्येची तहान भागविणे अशक्य होणार आहे. योजना मार्गी लावण्यात अपयश तत्कालीन मंत्री शिवाजीराव मोघे यांनी आर्णी शहरासाठी ४२ कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना मंजूर करवून आणली होती. ही योजना मार्गी लागावी, अशी त्यांची धडपड होती. आर्णी नगरपरिषदेत तेव्हा काँग्रेसचीच सत्ता होती. आजही नगरपरिषदेत काँग्रेसकडेच सत्ता आहे. तरीही आपल्या मंत्र्याने खेचून आणलेली योजना पूर्णत्वास नेण्यासाठी काँग्रेसचे स्थानिक शिलेदार अपयशी ठरले आहे. त्यामुळे शिवाजीराव मोघे यांच्या प्रयत्नांवर पाणी फेरले गेले, अशी चर्चा आता आर्णीकरांमध्ये सुरू झाली आहे.