शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत ठाकरेंच्या युवासेनेचा जल्लोष; सिनेट निवडणुकीत पुन्हा एकदा १० पैकी १० विजयी
2
विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात घ्या; शिंदेसेना, अजित पवार गटाची मागणी
3
Today Daily Horoscope आजचे राशीभविष्य: विविध पातळ्यांवर यश, किर्ती व लाभासह धन प्राप्ती होईल
4
धक्कादायक! नांदेडमध्ये पाण्यातून दोनशेहून अधिक जणांना विषबाधा, ६ जण गंभीर
5
उद्धव युवासेनेचा अखेर सिनेटवर झेंडा; विद्यापीठाच्या निवडणुकीत अभाविपचा उडाला धुव्वा
6
अग्रलेख : फडणवीसांचा कबुलीनामा; अजित पवारांना सोबत घेतल्यानंतर ‘परिवार’ फारच अस्वस्थ
7
मतदारांची गैरसोय झाल्यास अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई; केंद्रीय निवडणूक आयोगाचा इशारा
8
बहिणींच्या पैशांवर नजर ठेवाल तर खबरदार...; फडणवीस यांचा विरोधकांना इशारा
9
मध्य रेल्वेवर उद्या ५ तासांचा मेगाब्लॉक; तिन्हा मार्गांवरील लोकल धावणार उशिरा
10
नसराल्लाह मारला गेला? हिजबुल्लाहच्या मुख्यालयावर इस्रायलचा मोठा हल्ला
11
महायुतीमधील वाद विकोपाला गेले तर बसेल फटका; मीरा-भाईंदर, ऐरोली, बेलापूर, ठाणे मतदारसंघात अंतर्गत धुसफूस
12
"मला क्लीन चिट मिळाल्यामुळेच चांदीवाल आयोगाचा अहवाल दडवला", अनिल देशमुखांचा शिंदे सरकारवर आरोप
13
सरकारची मोठी कारवाई, Aadhaar आणि PAN Card चा डेटा लीक करणाऱ्या ३ वेबसाइट्स ब्लॉक! 
14
ऋता आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करा; व्हायरल व्हिडीओवरून परांजपे यांची मागणी
15
Ujjain Mahakal Temple Wall Collapse: उज्जैनच्या महाकाल मंदिराजवळ मोठी दुर्घटना! मुसळधार पावसाने भिंत कोसळली, दोघांचा मृत्यू
16
ठाणे, वसईत २० लाखांत घर; म्हाडाच्या कोकण मंडळाचा ‘धमाका’
17
'त्या' दोन अल्पवयीन मुलींवर आणखी ७ जणांनी अत्याचार केल्याचे उघड!
18
शून्य मोजून थकाल; भारतात लॉन्च झाली Rolls-Royce ची सर्वात महागडी कार, किंमत तब्बल...
19
उद्योगपती मंदाना यांची १७० कोटींची मालमत्ता जप्त; बँक ऑफ बडोदाची फसवणूक केल्याचा ठपका
20
भारताने कलम 370 लागू करावी; संयुक्त राष्ट्राच्या मंचावर शाहबाज शरीफ यांनी गरळ ओकली

साखर कारखाना वाचविण्याची धडपड आताच का?

By admin | Published: January 21, 2016 2:21 AM

सुधाकरराव नाईक साखर कारखाना गत चार वर्षांपासून बंद आहे. मात्र या काळात कुणीही कारखाना सुरू करण्यासाठी आंदोलन केले नाही.

महागाव : सुधाकरराव नाईक साखर कारखाना गत चार वर्षांपासून बंद आहे. मात्र या काळात कुणीही कारखाना सुरू करण्यासाठी आंदोलन केले नाही. आता राज्य बँकेने साखर कारखाना विक्रीची प्रक्रिया सुरू केली आणि खडबडून जागे झालेल्या काहींनी आंदोलनाचा पवित्रा घेतला. कारखाना वाचविण्यासाठी आताच का धडपड, असा सवाल संतप्त शेतकरी करीत आहे.महागाव तालुक्यातील गुंज येथे सुधाकरराव नाईक साखर कारखाना २०१२ सालापासून बंद आहे. त्यामुळे या कारखान्यावर अवलंबून असलेले शेतकरी, कामगार आर्थिक विवंचनेत सापडले आहे. गेल्या चार वर्षात कारखाना सुरू करावा, यासाठी कुणीही प्रयत्न केले नाही. कारखाना सुरू असताना आंदोलने करून प्रशासनाला सळो की पळो करण्यात आले. त्यानंतर वारणा ग्रुपने भाडेतत्त्वावर कारखाना घेतल्यानंतर त्यांनाही हा कारखाना अर्ध्यावरच करार मोडावा लागला. त्यानंतर कारखान्याला कायमचे टाळे लागले ते आजपर्यंत कायम आहे. दरम्यान, थकीत कर्जासाठी राज्य सहकारी बँकेने हा कारखाना आपल्या ताब्यात घेतला. कारखाना विकण्याची नोटीस काढली. दरम्यानच्या चार वर्षात कुणीही कारखाना सुरू करण्यासाठी प्रयत्न केले नाही किंवा आंदोलने केले नाही. मात्र कारखाना विक्रीला निघत असल्याचे पाहून अनेकांनी आंदोलनाची भाषा केली. परंतु त्यातही नेते मात्र बाजूलाच दिसत आहे. कारखाना वाचविण्यासाठी बैठा सत्याग्रह करण्यात आला. परंतु या सत्याग्रहालाही शेतकऱ्यांचा आणि नेत्यांचा फारसा प्रतिसाद मिळाला नाही. एकही नेता बैठा सत्याग्रहाकडे फिरकला नाही. आता आमदार मनोहरराव नाईकांना निवेदन देवून कारखाना वाचविण्यासाठी पुढाकार घेण्याचे निवेदन दिल्या गेले. मात्र हा कारखाना विक्रीस काढल्यावर जाग का आली, असा प्रश्न निर्माण होत आहे. कारखाना सुरू व्हावा, अशी प्रत्येकाचीच भावना आहे. त्यासाठी राजकारणविरहीत प्रयत्न होण्याची गरज आहे. (शहर प्रतिनिधी)