शहरं
Join us  
Trending Stories
1
टेक ऑफला वैमानिकाचा नकार; उद्योगमंत्री सामंत गेले मोटारीने, मालकाला फोन लावला तरी...
2
२६ नोव्हेंबरपर्यंत नवे सरकार स्थापन होईल; विधानसभा निवडणूक वेळेत घेण्याचे आयोगाचे संकेत
3
आजचे राशीभविष्य : उत्पन्न वाढेल; मित्रांसाठी खर्च करावा लागेल, त्यांच्याकडून लाभही होईल
4
क्रीडा संकुल हलविण्यामागे शिंदे सरकारचा अप्रामाणिकपणा; सर्वोच्च न्यायालयाचा ठपका
5
मोठ्या मुलाला १९९७ मध्येच संपविलेले, आता नसरल्ला मारला गेला; मध्य-पूर्वेत संघर्ष वाढणार
6
हायकोर्टाच्या केवळ ९८ न्यायाधीशांनी जाहीर केली संपत्ती; ६५१ न्यायाधीशांकडून मात्र मौनच
7
भारत हे वरदान अन् इराण हा शाप !; संयुक्त राष्ट्रांत इस्रायली पंतप्रधान नेतान्याहू यांनी दाखवले नकाशे
8
मानवी मूत्राचे शुद्ध पाणी बनविणारी ‘ब्रिफकेस’; ‘इस्राे’च्या मानवी ‘गगनयान’मध्ये उपयाेगी हाेईल तंत्रज्ञान
9
‘ते’ अधिकारी दोन दिवसांत बदला! निवडणूक आयोगाने राज्य सरकारला ठणकावले
10
भीतीदायक ‘फ्युचर’ अन् तोट्यातले ‘ऑप्शन्स’, तोट्याची गुंतवणूक तरी तिकडेच का वळतात पावले?
11
सॉफ्टवेअरद्वारे आगीची दुर्घटना तत्काळ कळणार; ११ शासकीय रुग्णालयांत लवकरच अद्ययावत यंत्रणा
12
अक्षयच्या एन्काउंटरबाबत सत्य लवकरच उघड होईल; ॲड. अमित कटारनवरे यांचा दावा
13
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची निवृत्त न्यायमूर्तींमार्फत चौकशी करा; मुंबईतील वकिलाची सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका 
14
रुग्णालयात औषधांचा तुटवडा, रुग्णांचे आरोग्य रामभरोसे; थकबाकी ४० लाखांवर,
15
“लाडकी बहीण योजनेला स्वार्थी म्हणणे महिलांचा अपमान”; राज ठाकरेंना अजित पवार गटाचे उत्तर
16
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
17
कृषी पुरस्कारांचे उद्या राज्यपालांच्या हस्ते वितरण होणार, धनंजय मुंडेंची माहिती
18
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
19
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
20
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!

पहिलीत प्रवेशासाठी नेमके वय किती हवे? साडेसात वर्षांच्या बंधनाने गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 04, 2022 3:28 PM

पहिल्या वर्गासाठी साडेसात वर्षे ही वयोमर्यादा घातल्याने शाळा व पालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देनवा आदेश आरटीईसाठी की नियमित प्रवेशासाठी?

अविनाश साबापुरे

यवतमाळ : पहिल्या वर्गात प्रवेश घेण्यासाठी बालकाचे वय किती असावे, याबाबत शिक्षण संचालकांनी नुकताच एक आदेश निर्गमित केला आहे. यात पहिल्या वर्गासाठी साडेसात वर्षे ही वयोमर्यादा घातल्याने शाळा व पालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. साडेसात वर्षांच्या मुलाला यंदा पहिल्या वर्गात घातल्यास त्याच्या शैक्षणिक आयुष्यातील दोन वर्षे वाया जाणार नाहीत का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

सध्या आरटीईनुसार २५ टक्के राखीव जागांवर प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. या प्रक्रियेत नेमक्या किती वर्षे वयाच्या मुलाला लाभ घेता येईल, यावरून पालकांमध्ये संभ्रम होता; तर खुद्द शिक्षण विभागातही एकवाक्यता नव्हती. त्यातून आरटीईसाठी ऑनलाईन अर्ज भरताना गोंधळ उडत होता. तो दूर करण्यासाठी शिक्षण संचालक दिनकर टेमकर यांनी सोमवारी विद्यार्थ्यांची वयोमर्यादा स्पष्ट करणारा सुधारित आदेश निर्गमित केला.

त्यानुसार प्ले ग्रुप किंवा नर्सरीमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्याचे किमान वय ४ वर्षे ५ महिने ३० दिवस असावे, ज्युनिअर केजीसाठी ही वयोमर्यादा ५ वर्षे ५ महिने ३० दिवस, तर सिनिअर केजीसाठी ६ वर्षे ५ महिने ३० दिवस असावी. याच आदेशानुसार इयत्ता पहिलीमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्याचे किमान वय ३१ डिसेंबर २०२२ रोजी ७ वर्षे ५ महिने ३० दिवस इतके पूर्ण झालेले असावे.

या सुधारित वयोमर्यादेवरून शाळांमध्ये आणखी गोंधळ वाढला आहे. किमान साडेसात वर्षे झाल्याशिवाय एखाद्या विद्यार्थ्याला पहिलीत प्रवेश देऊ नये, असा या आदेशाचा अर्थ अनेकांनी घेतला आहे. मग यंदा सिनिअर केजीमध्ये असलेल्या विद्यार्थ्यांना पहिलीत प्रवेश घेण्यासाठी आणखी एक वर्ष थांबावे लागणार आहे. शिवाय साडेसात वर्षे झाल्यानंतर पहिल्या वर्गात प्रविष्ट होणारा विद्यार्थी जेव्हा दहाव्या वर्गात जाईल तेव्हा तो १८ वर्षांचा असेल. या सुधारित आदेशापूर्वी राज्य शासनाच्याच १८ सप्टेंबर २०२० राेजीच्या शासन आदेशानुसार ६ वर्षे पूर्ण झालेल्या विद्यार्थ्याला पहिलीत प्रवेश मिळत होता. तो १६ व्यावर्षीच दहावी पूर्ण करीत होता. मात्र आता त्याच्या शैक्षणिक आयुष्यातील दोन वर्षे वाया जाणार आहेत.

शिक्षण संचालकांचा सुधारित आदेश केवळ आरटीईच्या प्रवेश प्रक्रियेपुरता मर्यादित आहे की, आरटीईव्यतिरिक्त नियमित प्रवेश प्रक्रियेसाठी तो लागू आहे, यावरून संभ्रम वाढला आहे. याबाबत शिक्षण विभागाकडूनही अद्याप कोणतेही स्पष्टीकरण न झाल्याने अनेक शाळांमधील प्रवेश प्रक्रिया बाधित झाली आहे.

शासनाने पहिली प्रवेशाबाबत आधीच किमान वयोमर्यादा ठरविली आहे. या सुधारित आदेशात सांगितली गेलेली कमाल वयाेमर्यादा आहे. त्यामुळे संभ्रम निर्माण होण्याचे कारण नाही. शिवाय हा आदेश केवळ आरटीईच्या २५ टक्के जागांसाठीच लागू असून, उर्वरित ७५ टक्के प्रवेश हे यापूर्वीच्या शासन आदेशातील वयोमर्यादेप्रमाणेच होतील. याबाबत कोणताही संभ्रम राहू नये, यासाठी आणखी स्पष्ट आदेश काढला जाणार आहे.

- राजेश क्षीरसागर, शिक्षण उपसंचालक, पुणे

टॅग्स :Educationशिक्षणStudentविद्यार्थीSchoolशाळा