शहरं
Join us  
Trending Stories
1
रतन टाटा यांची प्रकृती चिंताजनक, मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात ICU मध्ये दाखल; सूत्रांची माहिती
2
पराभव जिव्हारी, निवडणूक आयोगाच्या भेटीनंतर काँग्रेस नेते म्हणाले- 'EVM शी छेडछाड...'
3
महाराष्ट्र जिंकणं काँग्रेससाठी सोपं नाही, हरयाणाच्या निकालामधून शिकावे लागतील हे धडे
4
लेबनॉनची अवस्था गाझासारखी करू; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांचा थेट इशारा
5
‘वंचित’चा सातारा जिल्ह्यातील पहिला उमेदवार जाहीर; माणमध्ये इम्तियाज नदाफ 
6
Smriti Mandhana ची शानदार फिफ्टी; ५०० धावांचा पल्लाही गाठला, पण...
7
"इतिहास माझ्या कारकीर्दीचं मूल्यमापन कसं करेल?"; CJI चंद्रचूड नक्की काय म्हणाले?
8
Shafali Verma चा मोठा पराक्रम; श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात गाठला मैलाचा पल्ला
9
अजब गजब फिल्डिंग! Live मॅचमध्ये लाबूशेनने 'असा' उभा केला फिल्डर, अंपायरही चक्रावला (Video)
10
सूरतमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, गुंडांना पाहून मित्र पळाला
11
अमेरिकेसारखी सिस्टम बिहारमध्ये प्रशांत किशोर राबवणार; असं पहिल्यांदाच निवडणुकीत होणार! 
12
‘सुंदर तरुणींनी इथेच थांबा, बाकीच्यांनी…’’, HODवर विद्यार्थिनींनी केला गंभीर आरोप 
13
राहुल गांधींच्या पत्त्यावर ऑनलाइन जलेबी ...; काँग्रेसच्या जखमेवर भाजपनं चोळलं मीठ!
14
BREAKING: घाटकोपरच्या नारायण नगरमध्ये भीषण आग, नागरिकांची धावपळ; दाट लोकवस्तीमुळे परिसरात घबराट
15
"पवार साहेब म्हणाले, सगळीकडे आयात उमेदवार नाही", तिकीट वाटपाबद्दल रोहित पवारांचं विधान
16
दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान सील, PWD ने लावले कुलूप; कारण काय? पाहा...
17
शरद पवारांची चालाख खेळी: हजारो इच्छुकांच्या मुलाखती, पण बारामतीतील पत्ता राखून ठेवला!
18
अपक्ष उमेदवार सावित्री जिंदाल यांचा भाजप सरकारला पाठिंबा; मंत्रीपदाबाबत नवीन जिंदाल म्हणाले...
19
सुप्रिया सुळे यांच्या कारमध्ये नेत्याने फाईलने लपवला चेहरा; अजित पवारांनी रोखठोक शब्दांत दिली प्रतिक्रिया 
20
"काँग्रेस पक्ष इंडिया आघाडीतील इतर पक्षांसाठी ओझं झालाय"; ज्योतिरादित्य शिंदेंचा खोचक टोला

संपूर्ण जिल्हाच दुष्काळात

By admin | Published: January 01, 2016 3:39 AM

दुष्काळी परिस्थिती असतानाही जिल्ह्याची नजर पैसेवारी ६० टक्के दाखवून महसूल प्रशासनाने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने

यवतमाळ : दुष्काळी परिस्थिती असतानाही जिल्ह्याची नजर पैसेवारी ६० टक्के दाखवून महसूल प्रशासनाने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली होती. त्यानंतर सुधारित पैसेवारीत अर्धे तालुके ५० टक्केच्या आत दाखविण्यात आले. त्यामुळे विरोधकांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला. अखेर गुरुवारी जिल्हा प्रशासनाने अंतिम पैसेवारी ४५ टक्के घोषित करून संपूर्ण जिल्ह्यातील दुष्काळावर शिक्कामोर्तब केले. जिल्ह्यात दोन हजार १५८ गावांपैकी दोन हजार ५३ गावांमध्ये पीक पैसेवारी ही ५० टक्क्यापेक्षा कमी आहे. ५० टक्क्यापेक्षा अधिक पीक पैसेवारी असल्यास त्या जिल्ह्यातील स्थिती उत्तम समजली जाते. शेतकऱ्यांना कुठल्याही शासकीय योजनेचा लाभ मिळत नाही. त्या पेक्षा कमी पीक पैसेवारी असल्यास तेथे दुष्काळी स्थिती आहे, अशी नोंद शासनाच्या लेखी घेतली जाते. यंदा सोयाबीन, कापूस ही रोख पिके शेतकऱ्यांच्या हातून निसटली आहे. खरिपातील ज्वारी व तुरीचाही भरोसा नाही. त्यामुळे खरिपाची पीक पैसेवारी ही ५० टक्के पेक्षा कमीच जाहीर करावी, अशी मागणी सर्व स्तरातून होत होती. सुरुवातीला जाहीर झालेल्या नजरअंदाज व सुधारित पैसेवारीच्या आकड्यावर आक्षेप घेण्यात आला. पहिल्यांदा पैसेवारी कशी काढली जाते याचा उहापोह झाला. जिल्हा परिषदेत पैसेवारीवरून चांगलेच घमासाम झाले. पैसेवारीच्या मुद्यावर राजकीय वातावरण तापत असतानाच जिल्हा प्रशासनानेही सावध भूमिका घेऊन सर्व तहसीलदारांंना तातडीच्या नोटीस बजावल्या. मंडळ अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेत पैसेवारी काढणाऱ्या समितीची सभा प्रत्येक गावात व्हावी, असे निर्देश देण्यात आले. त्यानंतर पीक पैसेवारीतील तफावत आज दिसून येत आहे. दुष्काळी स्थितीवर अंतिम पैसेवारीनेही शिक्कामोर्तब केले आहे. (कार्यालय प्रतिनिधी)