शहरं
Join us  
Trending Stories
1
आता सर्व पवार कुटुंब तुम्हाला भेटायला लागले, ओळख दाखवायला लागले; बारामतीकरांसमोर अजितदादांची तुफान फटकेबाजी
2
इंदापुरात बंड अटळ?; पाटलांच्या प्रवेशानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील नेत्यांची मोठी घोषणा
3
सहानुभूतीवर नाही, मविआचं जागावाटप मेरिटवरच होणार; नाना पटोलेंची रोखठोक भूमिका
4
ऑटोचा धक्का लागल्यावरून वाद अन् नंतर तुफान दगडफेक; अकोल्यात नेमकं काय घडलं?
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थनार्थ इलॉन मस्क मैदानात उतरले; त्यांचा काय फायदा होणार? पाहा...
6
PDP सोबत युती करणार का? निवडणूक निकालापूर्वी फारुक अब्दुल्लांचे सूचक वक्तव्य; म्हणाले...
7
"रामराजेंनी मला फोन केला, उद्या त्यांच्याशी..."; अजित पवारांनी सोडलं मौन
8
अमेरिकेने शेख हसिनांचं सरकार कसं उलथवलं? गोपनीय रिपोर्टमधून धक्कादायक गौप्यस्फोट
9
'डॉली चायवाला' विसरा; आता आली 'मॉडेल चायवाली', सोशल मीडियावर घातलाय धुमाकूळ
10
पाक बॅटरला खुन्नस देणं पडलं महागात; Arundhati Reddy वर झाली 'ही' कारवाई
11
"महाराष्ट्रात 'खोके आणि धोके' सरकार"; प्रियंका गांधींचं टीकास्त्र, व्हिडीओ केला शेअर
12
आमचं ‘जीना यहां, मरना यहां’, पण हर्षवर्धन पाटलांंचं तसं नाही, चंद्रकांत पाटील यांची खोचक टीका
13
₹15 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड...! लागलं 20% चं अप्पर सर्किट, जबरदस्त आहे कारण
14
"महत्वाच्या टप्प्यावर पोहोचले युद्ध!", इकडे झेलेंस्कींनी घोषणा केली; तिकडे युक्रेननं रशियाचा तेल डेपो उडवला!
15
इस्रायलवर दुहेरी वार! हिज्बुल्ला अन् हमासने एकत्रितपणे केला मिसाईल हल्ला; अनेक जण जखमी
16
मुंबई लुटतच नाहीत तर फुकटात द्यायचं काम होतंय; आदित्य ठाकरेंचा CM शिंदेंवर गंभीर आरोप
17
माओवाद्यांची पुरवठा साखळी तोडण्यात महाराष्ट्राला मोठे यश; मुख्यमंत्री शिंदेंचा दावा
18
धक्कादायक! हिमाचल प्रदेशमध्ये चीनने पाठवले ड्रोन, भारताच्या हद्दीत हेरगिरीचा प्रयत्न?    
19
रिओ ऑलिम्पिकचे पदक थोडक्यात हुकलेली जिम्नॅस्ट दीपा कर्माकरची ३१व्या वर्षी निवृत्तीची घोषणा
20
वैद्यकीय क्षेत्रातील 'नोबेल' जाहीर! अमेरिकन शास्त्रज्ञ व्हिक्टर अम्ब्रोस, गॅरी रुवकुन यांची निवड

जंगलातील पाणवठे कोरडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 09, 2018 10:38 PM

नेर वनपरिक्षेत्रांतर्गत येत असलेल्या मालखेड व सोनखास येथील राखीव जंगलातील पाणवठे कोरडे ठक्क पडले आहे. त्यात पाणी नसल्याने वन्यप्राणी गावांकडे धाव घेत आहे. यात हिंस्त्र श्वापदाचाही समावेश असल्याने ग्रामस्थांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देनेर वनपरिक्षेत्र : सोनखास, मालखेड राखीव वनातील समस्या

पांडुरंग भोयर ।लोकमत न्यूज नेटवर्कसोनखास : नेर वनपरिक्षेत्रांतर्गत येत असलेल्या मालखेड व सोनखास येथील राखीव जंगलातील पाणवठे कोरडे ठक्क पडले आहे. त्यात पाणी नसल्याने वन्यप्राणी गावांकडे धाव घेत आहे. यात हिंस्त्र श्वापदाचाही समावेश असल्याने ग्रामस्थांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.या राखीव जंगलामध्ये बिबटाचाही संचार असल्याची नोंद आहे. आता पाणी नसल्याने बिबट गावशिवारातील पाणवठ्यांवर येत आहे. हरीण, रोही, रानडुक्कर, लांडगे, कोल्हे हे प्राणीसुद्धा पाणवठ्यावर येत आहे. तृणभक्षी प्राण्यांची दबा धरून शिकार केली जात आहे. वन विभागाने लाखो रुपये खर्चून जंगलात पाणवठे तयार केले. या पाणवठ्यांमध्ये टँकरद्वारे पाणी टाकले जात होते. मात्र मागील काही दिवसांपासून वन विभागाचा हा उपक्रम ठप्प आहे. वन्यप्राण्यांना जंगलात पिण्यासाठी पाणी नाही. तहानेने व्याकूळ झालेले प्राणी गलितगात्र अवस्थेत गावशिवारात भरकटताना दिसत आहे. येथे कुत्र्यांकडून हरीण, रानडुक्कर, रोही याची शिकार होत आहे. सोनखास परिसरात गेल्या तीन महिन्यांपासून पाणीटंचाई असून या बाबीकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते.जंगलातील पाणवठ्यासाठी जिल्हा नियोजन समितीकडून तरतूद केली जाते. वार्षिक बजेट असल्यानंतरही स्थानिक वन अधिकारी व सहायक उपवनसंरक्षकाचे या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष आहे. याच तालुक्यातील लोनाडी बीटमध्ये बिबटाने हल्ला करून वगाराची शिकारही केली होती. सातत्याने बिबटाकडून गावशिवारात शिकारी होत आहे. त्याला जेरबंद करण्यासाठीही प्रयत्न केले जात नाही. हा बिबट ट्रॅप कॅमेऱ्यातही चित्रीत झाला आहे. आता तर तापमानात वाढ झाली असून पाणवठा शोधण्यासाठी वन्यप्राणी सैरभैर झाले आहे. रानडुक्कर, लांडगा, कोल्हा, बिबट यासारख्या हिंस्त्र श्वापदापासून शेत शिवारात काम करणाºया मजुरांमध्येही दहशत निर्माण झाली आहे तर काहींनी जंगलातील पाणीटंचाईचा उपयोग शिकारीसाठी केला आहे. गावालगतच्या पाणवठ्यावर शिकारी दबा धरून बसतात. सावज टप्प्यात येताच त्याची शिकार केल्या जाते. रोही, हरीण याच्या मोठ्या प्रमाणात शिकारी होत असून मांसाची विक्री सुरू आहे. एकीकडे वनसंवर्धनासाठी शासकीयस्तरावरून अनेक प्रयत्न सुरू आहेत.स्थानिक अधिकारी व यंत्रणा मात्र अर्थकारणाच व्यस्त असल्याने मुख्य समस्येकडे दुर्लक्ष होत आहे.वन विभागाचा टँकर जंगलात येत नाहीजंगलातील पाणवठ्यांमध्ये पाणी टाकण्यासाठी टँकरची तरतूद केली आहे. यावर आर्थिक खर्च झाल्याचे नियमित दाखविले जाते. प्रत्यक्षात जंगलातील पाणवठ्यांची स्थिती भयावह आहे. वन्यप्राणी याच वेळखाऊ धोरणामुळे धोक्यात आले आहेत. उन्हाळ्याच्या दिवसात पाणवठ्यांमध्ये पाणी सोडण्याचे काम नियमित होत नाही. याचा फटका परिसरातील नागरिकांसह वन्यप्राण्यांना बसत आहे. वरिष्ठांनी राखीव जंगलातील पाणवठ्यांना प्रत्यक्ष भेटी देवून पाहणी करण्याची गरज आहे.