शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राची इच्छा पूर्ण झाली! सूरज चव्हाण 'बिग बॉस मराठी'चा महाविजेता; अभिजीत सावंतचं स्वप्न भंगलं
2
IND vs BAN : फक्त ७१ चेंडूत खेळ खल्लास! Hardik Pandya चा स्वॅग; सिक्सर मारत फिनिश केली मॅच
3
उद्धव ठाकरे यांची मुलावर टीका; एकनाथ शिंदे भडकले, म्हणाले…
4
वायुसेनेच्या एअर शोदरम्यान चेन्नईतील बीचवर चेंगराचेंगरी; ५ मृत्युमुखी, २५० जखमी
5
बारामतीच्या लेकाने बिग बॉस जिंकले! सूरज चव्हाणसाठी अजित पवारांच्या पत्नीची पोस्ट, म्हणाल्या- "पहिल्या दिवसापासून..."
6
Abhishek Sharma २०० + स्ट्राइक रेटनं कुटत होता धावा, पण 'गडबड घोटाळा' झाला (VIDEO) 
7
Bigg Boss 18 : "मी डाकूंच्या खानदानातून आहे, त्यामुळे...", गुणरत्न सदावर्तेंची 'बिग बॉस'च्या घरात एन्ट्री, सलमानलाही हसू आवरेना
8
बेरोजगारी दूर झाली तर आरक्षणाचा एकही प्रश्न उभा राहणार नाही; पृथ्वीराज चव्हाण यांचे मत
9
Bigg Boss 18: ९० च्या दशकातील हिरोईन शिल्पा शिरोडकरची एन्ट्री, सलमान म्हणतो, 'इथे कुठे आली तू...?'
10
Bigg Boss Marathi Season 5: रनर अप ठरल्यानंतर अभिजीत सावंतची पोस्ट, म्हणाला...
11
"8 ऑक्टोबरनंतर बिहारमध्ये राजकीय भूकंप"! NDA संदर्भात आरजेडी नेत्याची मोठी भविष्यवाणी 
12
३ वर्षांनी कमबॅक! आधी Varun Chakravarthy च्या नावे लाजिरवाणा विक्रम; मग सोडली छाप
13
INDW vs PAKW : पाक विरुद्ध विजयी जल्लोष! हरमनप्रीत ब्रिगेडनं पुन्हा मारलं मैदान
14
भारतीय महिलांनी पाकिस्तानला दिला 'जोर का झटका'; क्रिकेटच्या देवाने केलं 'नारीशक्ती'चे कौतुक
15
रामराजेंनी घेतली शरद पवारांची भेट?; रणजीतसिंह निंबाळकरांचा खळबळजनक दावा
16
नवा फास्टर किंग Mayank Yadav ची दाबात एन्ट्री; असा पराक्रम करणारा तिसरा गोलंदाज
17
बंगालमध्ये पुन्हा बलात्कार अन् हत्या; आरोपीला 3 महिन्यांत फाशीची शिक्षा, ममतांचा अल्टिमेटम
18
9 चिमुकल्यांची शिकार करणाऱ्या लांडग्यांची दहशत संपली; शेवटचा लांडका मृतावस्थेत आढळला
19
हरियाणात कसं स्थापन होणार भाजप सरकार? नायब सैनी यांनी सांगितला पुढचा प्लॅन, म्हणाले...
20
पाकिस्तानात काहीही होऊ शकतं... आता थेट मुख्यमंत्रीच झाले बेपत्ता, नक्की प्रकरण काय?

अभयारण्यात वणव्यामुळे वन्यप्राण्यांचे जीव धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 04, 2018 9:50 PM

टिपेश्वर अभयारण्यात आगी लागण्याच्या घटनेत वाढ होत असून या आगी लागतात की लावल्या जातात, याबाबत उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली जात आहे.

ठळक मुद्देटिपेश्वरमध्ये आगीचे प्रमाण वाढले : उच्चस्तरीय चौकशीची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कपांढरकवडा : टिपेश्वर अभयारण्यात आगी लागण्याच्या घटनेत वाढ होत असून या आगी लागतात की लावल्या जातात, याबाबत उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली जात आहे.गेल्या आठवड्यातसुद्धा टिपेश्वर अभयारण्यातील गणेरी बिटमध्ये आग लागली होती. आगीची माहिती बाहेर येऊ नये, यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पुरेपूर प्रयत्न केला. २५ मार्च रोजी गणेरी बिट परिसरात आग लागून गणेरी बिट व भिमकुंडमधील मौल्यवान वनसंपदा आगीच्या भक्ष्यस्थानी सापडली होती. जवळपास ९०० ते हजार हेक्टरमधील वनसंपदा जळाल्याची माहिती आहे. ही आग कशामुळे लागली, याबाबत सर्वच अनभिज्ञ आहेत. या अभयारण्याला नेहमीच लहान-मोठ्या आगी लागत असून लाखो रूपयांची मौल्यवान वनसंपदा व प्राणी आगीच्या भक्ष्यस्थानी पडतात. अभयारण्यात आगीच्या घटना घडत असल्यामुळे अनेक प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पाच वर्षांपूर्वी २०१३ मध्ये पिटापुंगरी परिसरात आग लागल्याने तीन निष्पाप मजुरांचा या आगीत होरपळून मृत्यू झाला होता. तेव्हापासून सतत आगीची लहान-मोठी घटना घडत आहे. पिटापुंगरी परिसरात लागलेल्या आगीची अद्यापही चौकशी झाली नाही. ही आग कशामुळे लागली, याचा तपास पेंच प्रकल्पाच्या अधिकाºयांकडून अद्यापही होऊ शकला नाही. त्यानंतर तीन वर्षानंतर टिपेश्वर अभयारण्याला पुन्हा मोठी आग लागली. यावेळी जवळपास १३०० ते १४०० हेक्टरमधील मौल्यवान वनसंपदा व अनेक प्राणी आगीच्या भक्ष्यस्थानी पडले होते. याप्रकरणात वनपरीक्षेत्राधिकारी लांबाडे यांना या निलंबित करण्यात आले होते. २५ मार्च रोजी लागलेल्या आगीतसुद्धा वनसंपदेचे नुकसान झाले आहे.