शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीला धक्का! एकनाथ शिंदे समर्थक अपक्ष आमदार शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार
2
"महाविकास आघाडी फुटणार"; शिवसेना नेत्याचा मोठा दावा, म्हणाले, " २४ तासांत उद्धव ठाकरे..."
3
जुन्नरमध्ये पुन्हा मोठा ट्विस्ट: शेरकरांच्या एंट्रीला तुतारीच्या पदाधिकाऱ्यांचा विरोध; उमेदवारीच्या स्पर्धेत २ निष्ठावंत आघाडीवर!
4
यमुना एक्सप्रेस वेववरून जात होती कार, पोलिसांना आला संशय, तपाणसी केली असता सापडला सोन्याचा खजिना
5
"ही चूक हरयाणात झालीये, महाराष्ट्रातही होतेय", पृथ्वीराज चव्हाणांनी ठेवलं मुद्द्यावर बोट
6
"दिल्लीत गुन्हेगारी वाढतेय, लोकांच्या मनात भीती असते की..."; आप नेत्याचा भाजपावर निशाणा
7
"बंटेंगे तो कटेंगे", मुंबईत योगींचे फोटो असलेले बॅनर्स; काय म्हणाले मुख्तार अब्बास नकवी?
8
चीनच्या जीडीपी एवढे झाले गोल्डचे मार्केट कॅप, 5 वर्षात व्हॅल्यू डबल; चेक करा देशातील सोन्या-चांदीचा लेटेस्ट दर
9
डॅशिंग IAS अधिकारी! वयाच्या ५७व्या वर्षी प्रेमविवाह; आता मंदिरांवरील लाऊडस्पीकरवर 'सवाल'
10
धर्मासाठी सिनेइंडस्ट्रीला केला रामराम, ३ हिट सिनेमात केलं होतं काम, सध्या काय करतेय २४ वर्षीय अभिनेत्री?
11
भाजपातील गटबाजीला कंटाळले, राष्ट्रवादीत गेले, तिथेही दिला राजीनामा; आता ठाकरेंकडे चालले
12
अजित पवार गट विधानसभेच्या किती जागा लढवणार? अजितदादा म्हणाले... 
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : काका विरुद्ध पुतणी! गायत्री शिंगणे घड्याळ हातात बांधणार? अजित पवारांची घेतली भेट
14
कोण म्हणतं भाईजान घाबरला? बिश्नोईच्या धमक्यांदरम्यानच दिसणार सलमान खानचा 'चुलबुल पांडे' अवतार
15
भारत-चीन सीमावाद संपला; चिनी सैन्याची माघार, ड्रॅगनची 'गस्त करार'ला मंजुरी
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : भाजपाला धक्का! मंदा म्हात्रेंविरोधात संदीप नाईक यांनी फुंकली 'तुतारी'
17
'गुडन्यूज कधी देणार?', संभावना सेठला ऐकावे लागताएत टोमणे; म्हणाली, "लग्नात महिलांनी..."
18
"अररियात राहायचे असेल तर हिंदू व्हावे लागेल", भाजप खासदाराचे वादग्रस्त विधान, सोशल मीडियावर व्हायरल
19
बाबा वेंगा आणि नॉस्ट्रॅडॅमसची 2025 साठीची भविष्यवाणी, दिला मोठा इशारा!
20
Defence stocks मध्ये मोठी विक्री, Mazagon Dock, GRSE जोरदार आपटले

भारत जोडो यात्रा काॅंग्रेसला गतवैभव देणार का?

By विशाल सोनटक्के | Published: November 23, 2022 4:51 PM

कार्यकर्ते काँग्रेससोबतच; नेत्यांना हेवेदावे आणि गटबाजी सोडावी लागणार

यवतमाळ : काॅंग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात अपेक्षेपेक्षा जास्त यशस्वी ठरल्याचे अगदी विरोधकही मान्य करीत आहेत. देशातील राजकीय वातावरण बदलू शकते, हा विश्वास१४ दिवसात राज्यातील पाच जिल्ह्यातून ३८२ किमीचा प्रवास केलेल्या या यात्रेने महाराष्ट्रातील काॅंग्रेस कार्यकर्त्यांना दिला आहे. मात्र या यात्रेमुळे जिल्ह्यात काॅंग्रेसला खरेच गतवैभव मिळू शकते का? हा खरा प्रश्न आहे. जिल्ह्यातील नेत्यांना सर्वसामान्य कार्यकर्त्यांसोबत तुटलेली नाळ पुन्हा जुळवावी लागणार आहे. या बरोबरच गटातटात विभागलेल्या पक्षाला एकसंघपणे उभे राहावे लागणार आहे. हेच आता जिल्हा काॅंग्रेसपुढे खरे आव्हान आहे.

एकेकाळी यवतमाळ जिल्हा काॅंग्रेसचा बालेकिल्ला होता. काॅंग्रेसमुळेच जिल्ह्याला दोन मुख्यमंत्री मिळाले. एवढेच नव्हे तर काॅंग्रेसने नेहमीच जिल्ह्यातील कार्यकर्त्यांच्या पाठीवर विश्वासाचा हात ठेवत त्यांना राज्य व राष्ट्रीय पातळीवरील पदेही दिली. मात्र या नेत्यांनी जिल्ह्यातील काॅंग्रेसला काय दिले, असा प्रश्न सर्वसामान्य कार्यकर्त्यातून विचारला जात आहे.

१९९५ पर्यंत जिल्ह्यावर काॅंग्रेसचे निर्विवाद वर्चस्व राहिले. १९९५ च्या निवडणुकीत भाजपने काॅंग्रेसला पहिला हादरा दिला. राजाभाऊ ठाकरे यांच्या रूपाने जिल्ह्यात भाजपला पहिला आमदार मिळाला. त्यानंतर माणिकराव ठाकरे यांचाही २००४ च्या निवडणुकीत शिवसेनेच्या संजय राठोड यांनी पराभव केला. याच वेळी दुसरे नेते शिवाजीराव मोघे यांनाही पराभवाचे तोंड पाहावे लागले. त्यानंतर मात्र काॅंग्रेसची जिल्ह्यातील संघटनात्मक पकड सैल होत गेली. दुसरीकडे ही जागा भरून काढत भाजप-शिवसेनेने जिल्ह्यात आपले मजबूत बस्तान बांधले.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत तर जिल्ह्यात काॅंग्रेसचे खातेही उघडले नाही. सातपैकी पाच जागा जिंकत भाजप अव्वल ठरली. तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काॅंग्रेसने प्रत्येकी एक जागा जिंकली. या दारुण पराभवानंतरही जिल्ह्यात कार्यकर्ते मात्र काॅंग्रेस सोबत असल्याचे वारंवार दिसून आले.

जानेवारी महिन्यात झालेल्या नगरपंचायत निवडणुकीत काॅंग्रेसने सर्वाधिक ३९ जागा मिळविल्या. तर त्यानंतर सप्टेंबर महिन्यात झालेल्या ७२ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीतही सर्वाधिक जागा काॅंग्रेसलाच मिळाल्या. मात्र त्यानंतरही गटातटात विभागलेल्या या पक्षाला आगामी काळात कितपत यश मिळेल, याबाबत खुद्द काॅंग्रेस कार्यकर्तेच साशंकता व्यक्त करताना दिसतात. काॅंग्रेसने जिल्ह्यातील नेत्यांना खूप काही दिले. मात्र, या नेत्यांनी काॅंग्रेसला काय दिले, जिल्ह्यातील काॅंग्रेस बळकट करण्यासाठी काय केले, ही खदखद दुसऱ्या व तिसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांमध्ये असल्याचे प्रकर्षाने दिसून येते.

गटबाजीच्या राजकारणातून बाहेर पडण्याची गरज

भाजप सरकारच्या कारभारावर आता हळहूळू का होईना टीकेचा सूर उमटू लागला आहे. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेने पुरोगामी विचारांच्या कार्यकर्ते-नेत्यांना नवे बळ दिले आहे. ‘डरो मत’ असे सांगत लोकांच्या मनातील भीतीला या यात्रेने मोकळी वाट करून दिली आहे. या यात्रेचा आता थेट जमिनीवर लाभ मिळवायचा असेल तर काॅंग्रेस नेत्यांना इमानदारीने सर्वसामान्यांचे प्रश्न समजून घेऊन त्या विरोधात आंदोलनासाठी रस्त्यावर उतरावे लागणार आहे. सरकारच्या कारभाराविरोधात लोक बोलू लागले आहेत. उद्या कदाचित मतपेटीतून उत्तरही देतील. पण त्यावेळी पर्याय म्हणून काॅंग्रेस राहावी, यासाठी तरी जिल्ह्यातील काॅंग्रेस नेत्यांना गटबाजीच्या राजकारणातून बाहेर पडावे लागणार आहे.

यात्रेतून निर्माण झालेले चैतन्य कायम ठेवण्याचे आव्हान

राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेमुळे राज्यातील काॅंग्रेसमध्ये चैतन्याचे वातावरण आहे. या यात्रेला मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादामुळे कार्यकर्त्यांतील मरगळ झटकली गेली आहे. आता या यात्रेतून निर्माण झालेले चैतन्य कायम ठेवण्याचे आव्हान जिल्ह्यातील काॅंग्रेस नेत्यांसमोर उभे आहे. भारत जोडो यात्रेत गैरकाॅंग्रेसी नागरिकही मोठ्या संख्येने सहभागी होते. ही बाब लक्षवेधी असून नागरिक राहुल गांधी यांनी दाखविलेल्या समता-एकात्मता आणि बंधुत्वाच्या मार्गाने जाऊ इच्छितात हे दर्शविणारे आहे. अशा स्थितीत येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा टेम्पो टिकवून ठेवण्याचे खरे आव्हान जिल्ह्यातील काॅंग्रेस नेत्यांपुढे आहे. त्यात ते कितपत यशस्वी होतात, यावरच जिल्ह्यातील काॅंग्रेसचेही भवितव्य अवलंबून असेल.

टॅग्स :PoliticsराजकारणBharat Jodo Yatraभारत जोडो यात्राcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधी