शहरं
Join us  
Trending Stories
1
अंबाबाईच्या चरणी १ कोटी ८४ लाखांचे दान; कोल्हापुरच्या देवस्थान समितीकडून मोजणी
2
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
3
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
4
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
5
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
6
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
7
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
8
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
9
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
10
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
11
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
12
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
13
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
14
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
15
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
16
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
17
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
18
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
19
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
20
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण

वणी शहरात पाण्यासाठी हाहाकार

By admin | Published: June 25, 2017 12:18 AM

शहराची जीवनदायिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निर्गुडा नदीचे पाणी आटल्यामुळे शुक्रवारी काही भागात पाणी पुरवठा झाला नाही,

पुरवठा ठप्प : नागरिकांची तारांबळ, नवरगाव धरणातून पाणी सोडण्यास विलंब लोकमत न्यूज नेटवर्क वणी : शहराची जीवनदायिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निर्गुडा नदीचे पाणी आटल्यामुळे शुक्रवारी काही भागात पाणी पुरवठा झाला नाही, तर शनिवारी संपूर्ण शहरातीलच पाणी पुरवठा ठप्प होता. परिणामी शहरात पाण्यासाठी हाहाकार उडाला आहे. जून महिन्याचा अखेरचा आठवडा सुरू असतानाही अद्याप समाधानकारक पाऊस न झाल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. गंभीर बाब ही की, वणी नगरपालिकेने २१ जून रोजी नवरगाव धरणातील पाणी निर्गुडा नदीत सोडण्याबाबतस पाटबंधारे विभागाला पत्र दिले होते. मात्र २२ जूनला धरणातून पाणी सोडण्यात आल्याने वणी शहरातील पाणी समस्येने उग्ररुप धारण केले. २२ जून रोजी सोडण्यात आलेले पाणी शनिवारी सायंकाळी ४ वाजता वणीतील नदीपात्रात पोहचले. रविवारी सकाळपासून पाणी पुरवठा सुरळीत होईल, असे नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांनी ‘लोकमत’ला सांगितले. मागील वर्षी उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची बिकट स्थिती निर्माण झाली होती. यंदाही हवामान खात्याचे सारे अंदाज चुकवत पावसाने दडी मारली. अद्याप वणी परिसरात समाधानकारक पाऊस झाला नाही. परिणामी निर्गुडा नदीचे पात्र आटले आहे. गरजेनुसार, नवरगाव धरणातून पाणी मागितले जात आहे. नवरगाव धरणातही केवळ २.५६ दलघमी मिटर जलसाठा शिल्लक असल्याने नजिकच्या काळात पाऊस न आल्यास या धरणावर अवलंबून असलेल्या गावांमध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. वणी शहरात शुक्रवारी सकाळी व सायंकाळी काही भागात पाणी पुरवठा झाला. काही भागात हा पुरवठा अल्प होता. मात्र शनिवारी सकाळी नळाद्वारे पाणीच आले नाही आणि घरातील पाणीसाठाही संपुष्टात आल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. अनेक नागरिकांनी आपल्या परिसरातील नगरसेवकांना पकडून याबाबत जाब विचारला. लोकांचे समाधान करता करता नगरसेवकांच्या तोंडाला चांगलाच फेस आला. २४ जून रोजी रोहीणी नक्षत्राला प्रारंभ झाला. त्यानंतर आलेल्या अवकाळी पावसाने अल्पसा दिलासा दिला. आजवर केवळ १०८ मि.मी.पाऊस कोसळला. या पावसाने मारेगाव तालुक्यातील नवरगाव धरणात केवळ एक से.मी. पाण्याची पातळी वाढली. मृग नक्षत्रात मात्र फारसा पाऊस झाला नाही. त्यामुळे स्थिती अधिक बिकट झाली आहे. वाढत्या उन्हामुळे पाण्याचे बाष्पिभवन वेगाने होत असून त्यामुळे जलस्तरात घट होत आहे. वणी नगरपरिषदेने आतापर्यंत नवरगाव धरणातून चार हजार दलघमी पाणी घेतले आहे. आता मोजकेच आरक्षित पाणी शिल्लक आहे. संकटांची मालिका मे महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात वणी परिसरात अवकाळी वादळी पावसाने थैैमान घातले. तेव्हापासून वणीच्या जलशुद्धीकरण केंद्रात संकटांची मालिकाच सुरू झाली आहे. कधी वीज पुरवठा खंडित तर कधी नदीपात्रात पाणीच नाही, अशी स्थिती अनेकदा उद्भवत असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले.