शहरं
Join us  
Trending Stories
1
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
2
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
3
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
4
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
5
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
6
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
7
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
8
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
9
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
10
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
11
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण
12
दिल्लीला मिळाल्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
13
काँग्रेस नेते राजभवनावर, घेतली राज्यपाल राधाकृष्णन यांची भेट; पण नेमके कारण काय?
14
जिंकलंस मित्रा! वकील बनून लढला स्वत:च्या किडनॅपिंगची केस, १७ वर्षांनंतर ८ गुन्हेगारांना शिक्षा
15
ENG vs AUS : WHAT A BALL! स्टीव्ह स्मिथ 'क्लिन बोल्ड', ऑस्ट्रेलियन दिग्गजाचाही विश्वास बसेना
16
"म्यानमारमधून ९०० कुकी अतिरेकी मणिपूरमध्ये घुसले", सुरक्षा सल्लागारांनी दिला दुजोरा, चिंता वाढली
17
58 कर्मचाऱ्यांशी शारीरिक संबंध अन्...! कोण आहे चीनची ही 'सुंदर गव्हर्नर'? ठोठावण्यात आली 13 वर्षांची शिक्षा
18
“ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री हे सूत्र मविआत नाही”; संजय राऊत स्पष्टच बोलले
19
हवाई दल प्रमुखपदी एअर मार्शल अमरप्रीत सिंग यांची नियुक्ती; जाणून घ्या, त्यांच्याविषयी...
20
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल

खराब रस्त्याने घेतला बाळ-बाळंतिणीचा बळी; मन हेलावणारी घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2022 4:46 PM

चिंचोली फाट्यानजीक रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे चक्क ऑटो रिक्षातच प्रसूती झाली. मात्र, खड्ड्यांच्या त्रासाने प्रसूतीनंतर काही क्षणातच नवजात बाळ दगावले. त्यानंतर काही वेळातच बाळंतीण नताशानेही जगाचा निरोप घेतला.

ठळक मुद्देबिटरगाव ते ढाणकी रस्त्याची दुरवस्था

ढाणकी (यवतमाळ) : उमरखेड तालुक्यातील बंदी भागातील ढाणकी ते बिटरगाव (बु.) रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. या रस्त्यामुळे ऑटो रिक्षातून प्रसूतीसाठी जाणाऱ्या महिलेची रस्त्यातच प्रसूती झाली. मात्र, खराब रस्त्यामुळे बाळ आणि बाळंतीण या दोघांचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी रात्री घडली.

नताशा अविनाश ठोके (३०, रा. मन्याळी) असे मृत महिलेचे नाव आहे. बंदी भागातील मन्याळी येथील रहिवासी नताशा यांना रविवारी असह्य प्रसूती वेदना सुरू झाल्या. त्यामुळे कुटुंबीयांनी त्यांना ऑटो रिक्षातून ढाणकी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रसूतीसाठी दाखल करण्याचा निर्णय घेतला. सायंकाळच्या सुमारास काही कुटुंबीय व नताशा ऑटोरिक्षाने बिटरगाव येथून ढाणकीकडे निघाल्या. खराब रस्त्यामुळे त्यांना प्रचंड त्रास झाला. ढाणकीपासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावरील चिंचोली फाट्यानजीक रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे चक्क ऑटो रिक्षातच प्रसूती झाली. मात्र, खड्ड्यांच्या त्रासाने प्रसूतीनंतर काही क्षणातच नवजात बाळ दगावले. त्यानंतर काही वेळातच बाळंतीण नताशानेही जगाचा निरोप घेतला.

मन हेलावणाऱ्या या घटनेमुळे सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. ढाणकी ते बिटरगाव रस्त्याच्या दुरुस्तीसाठी अनेकदा नागरिकांनी आंदोलन केले. बांधकाम विभागाकडे रस्ता दुरुस्तीची मागणी केली. मात्र, शासन आणि प्रशासनाच्या उदासीनतेमुळे रस्त्याची दुरुस्ती झालीच नाही. परिणामी, या खड्डेमय रस्त्यामुळे एक विवाहिता आणि तिच्या नवजात बाळाचा बळी गेला. तरीही प्रशासन कुंभकर्णी झोपेत आहे. आणखी किती बळी घेतल्यानंतर या रस्त्याची दुरुस्ती केली जाईल, असा संतप्त प्रश्न विचारला जात आहे. यापूर्वीही अनेकदा अनेक महिलांची खड्ड्यांमुळे रस्त्यातच प्रसूती झाली. रविवारची घटना मात्र सर्वांच्याच मनाला चटका लावून गेली.

वेळेवर उपचार मिळालेच नाही

बंदी भागातील रस्त्यांची प्रचंड दुरवस्था झाली आहे. त्यामुळे नागरिकांना कोणतेही प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा उमरखेड येथील उपजिल्हा रुग्णालयात जाण्यासाठी प्रचंड विलंब लागतो. रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नाही. रविवारी सुद्धा प्रसूतीसाठी ढाणकी प्राथमिक आरोग्य केंद्रात येणाऱ्या नताशा व तिच्या बाळाचा रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे बळी गेला. रस्ते व्यवस्थित असते तर ती पीएचसीमध्ये पोहोचू शकली असती, वेळेवर तिच्यावर उपचार झाले असते. परिणामी, आज ती आणि तिचे बाळ सुखरूप राहिले असते. मात्र, रस्त्याच्या दुर्दशेमुळे दोघांचेही बळी गेल्याने समाजमन सुन्न झाले. या घटनेने बंदी भागातील नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. या घटनेवरून बोध घेऊन शासनाने या भागातील रस्त्यांची तातडीने किमान दुरुस्ती करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. नताशा व तिच्या नवजात बाळाच्या मृत्यूमुळे मन्याळी गावात शोकाकुल वातावरण आहे.

टॅग्स :Accidentअपघातpregnant womanगर्भवती महिलाDeathमृत्यूPotholeखड्डे